शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

साडेतीन हजार शेतकऱ्यांना अग्रिम देण्याकडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST

गंगाखेड : अतिवृष्टीने बाधित झालेल्या तुरीचा पंचनामा करून अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ३ ...

गंगाखेड : अतिवृष्टीने बाधित झालेल्या तुरीचा पंचनामा करून अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ३ हजार ६९९ शेतकऱ्यांची ३ हजार ५६ हेक्टरवर तूर बाधित झाल्याचा अहवाल विमा कंपनीकडे पाठवला. त्यापैकी ९४८ हेक्टरवरील तूर पिकाचा विमा शेतकऱ्यांनी काढला होता. त्यामुळे या शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम कंपनीने देणे बंधनकारक होती. मात्र, त्याकडे कानाडोळा करण्यात आला.

गंगाखेड तालुक्यात ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टी होऊन तूर पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दखल घेत जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी तूर पिकाच्या बाधित क्षेत्राचा पंचनामा करून अहवाल पाठविण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार तूर पिकाची पाहणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व महसूलच्या अधिकाऱ्यांनी गावनिहाय पथक स्थापन केले होते. या पथकात मंडळ अधिकारी, कृषी सहायक अधिकारी, तलाठी व विमा कंपनीचा अधिकारी, तसेच गावचा शेतकरी किंवा लोकप्रतिनिधी आदींची नियुक्ती केली होती. या पथकाने आपापल्या भागातील नुकसानग्रस्त तुरीचा पंचनामा केला. यामध्ये गंगाखेड मंडळ क्षेेत्रात ४१३ हेक्टरवरील तूर बाधित झाल्याचा अहवाल दिला. त्याचबरोबर राणीसावरगाव मंडळात ४६३ हेक्टर, महातपुरी मंडळात १,०४४ हेक्टर, माखणी मंडळात ६६२, तर पिंपळदरी महसूल मंडळात ४७५ हेक्टरवरील तूर पिकास फटका बसल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला. जिल्हा प्रशासनाने गंगाखेड तालुक्यात ४ हजार ६२६ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला असून, त्यापैकी अतिवृष्टीने ३ हजार ५६ हेक्टरवरील तूर पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे ३ हजार ६९९ शेतकऱ्यांनी ९४८ हेक्टरवरील तूर पिकाचा विमा उतरविला आहे. त्यामुळे हे शेतकरी तूर पिकाच्या अग्रिम रकमेसाठी पात्र आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना २५ दिवसांच्या आत अग्रिम रक्कम देणे बंधनकारक होते. मात्र, त्याकडे या विमा कंपनीने कानाडोळा केला आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप

रिलायन्स जनरल इन्शुरन्स व इतर कंपन्यांकडून नुकसान झालेल्या पिकांचा मोबदला मागील काही वर्षांपासून देताना आखडता हात घेतला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पिके विमा कंपनीकडे संरक्षित करूनही मोबदला देण्यासाठी कंपन्यांकडून कानाडोळा केला जात आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधीही उदासीन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.