शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

अकरा लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गहू, तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:18 IST

कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून, या काळात आर्थिक सहाय्य राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार अंत्योदय अन्न योजना ...

कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून, या काळात आर्थिक सहाय्य राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेचे ४२ हजार ४३ कार्डधारकांना ९ हजार ६२० क्विंटल गहू आणि ४ हजार ९२७ क्विंटल तांदूळ प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे प्राधान्य कुटुंब योजनेतील ९ लाख ७६ हजार २२५ लाभार्थ्यांसाठी प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे एकूण ३० हजार ७९१ क्विंटल गहू आणि १७ हजार ९७७ क्विंटल तांदूळ जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. हे धान्य लाभार्थ्यांना मोफत वितरित केले जाणार आहे.

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी मे आणि जून या दोन महिन्यांत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या धान्याव्यतिरिक्त दोन्ही योजनेतील ११ लाख ७६ हजार ९१९ सदस्यांना ८१ हजार ३१७ क्विंटल गहू आणि ५० हजार ८८३ क्विंटल तांदूळ प्रति सदस्य प्रतिमाह पाच किलो याप्रमाणे मोफत वितरित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे स्थलांतरित लाभार्थ्यांनादेखील पोर्टेबिलिटी योजनेचा लाभ घेत अन्नधान्याचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

दुकानदारांचा अंगठा लावून धान्याचे वितरण

ई-पॉस मशीनला लाभार्थ्याचा अंगठा घेऊन धान्य वितरण केले जाते; मात्र प्रत्येक लाभार्थ्याचा अंगठा घेतल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ दुकानदारांचा अंगठा घेऊन धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुगळीकर यांनी दिली.