शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

जिल्ह्याला मिळाला १३३ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:43 IST

कोरोनामुळे थांबलेल्या अर्थचक्रास चालना मिळावी, राज्यात रोजगार निर्मिती व्हावी आणि अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या नियोजन विभागाने ...

कोरोनामुळे थांबलेल्या अर्थचक्रास चालना मिळावी, राज्यात रोजगार निर्मिती व्हावी आणि अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या नियोजन विभागाने जिल्हा वार्षिक योजनांना १०० टक्के निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ८ डिसेंबर रोजी जिल्हानिहाय निधी वितरित करण्यात आला आहे.

परभणी जिल्हा वार्षिक नियोजन समितीने २०० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार यापूर्वी ३३ टक्के प्रमाणे ६५ कोटी ९९ लाख ९९ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, उर्वरित १३३ कोटी ९९ लाख ९९ हजार रुपयांचा निधी जिल्ह्याला वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे आठ महिन्यांपासून रखडलेल्या जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यास चालना मिळणार आहे.

३३ कोटी कोरोनासाठी

राज्यात कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने त्यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने एकूण तरतुदीच्या ३३ टक्के निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. या ३३ टक्क्यांच्या ५० टक्के निधी कोरोनासाठी खर्च करण्याचे निर्देश त्यावेळी देण्यात आले होते. त्यानुसार एकूण तरतुदीच्या ३३ टक्के प्रमाणे जिल्ह्याला ६५ कोटी ९९ लाख ९९ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीच्या ५० टक्के म्हणजे ३२ कोटी ९९ लाख ९९ हजार रुपये कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

चार महिन्यांत खर्चाची कसरत

वेगवेगळ्या विकासकामांसाठी राज्य शासनाने १३३ कोटी रुपये जिल्ह्याला वितरित केले असले तरी हा निधी खर्च करण्याची कसरत आता यंत्रणांना करावी लागणार आहे. आतापर्यंत निधी नसल्याने ठप्प असलेल्या प्रशासकीय कामकाजांना गती द्यावी लागणार आहे. विकासकामांचे प्रस्ताव तयार करणे, त्यास मंजुरी घेणे आणि प्रत्यक्ष काम पूर्ण करणे, ही कसरत अधिकाऱ्यांना करावी लागणार असून, अंगझटकून काम केले तरच या निधीचा योग्य विनियोग लागणार आहे.