शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

जिल्ह्याला मिळाला १३३ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:43 IST

कोरोनामुळे थांबलेल्या अर्थचक्रास चालना मिळावी, राज्यात रोजगार निर्मिती व्हावी आणि अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या नियोजन विभागाने ...

कोरोनामुळे थांबलेल्या अर्थचक्रास चालना मिळावी, राज्यात रोजगार निर्मिती व्हावी आणि अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या नियोजन विभागाने जिल्हा वार्षिक योजनांना १०० टक्के निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ८ डिसेंबर रोजी जिल्हानिहाय निधी वितरित करण्यात आला आहे.

परभणी जिल्हा वार्षिक नियोजन समितीने २०० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार यापूर्वी ३३ टक्के प्रमाणे ६५ कोटी ९९ लाख ९९ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, उर्वरित १३३ कोटी ९९ लाख ९९ हजार रुपयांचा निधी जिल्ह्याला वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे आठ महिन्यांपासून रखडलेल्या जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यास चालना मिळणार आहे.

३३ कोटी कोरोनासाठी

राज्यात कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने त्यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने एकूण तरतुदीच्या ३३ टक्के निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. या ३३ टक्क्यांच्या ५० टक्के निधी कोरोनासाठी खर्च करण्याचे निर्देश त्यावेळी देण्यात आले होते. त्यानुसार एकूण तरतुदीच्या ३३ टक्के प्रमाणे जिल्ह्याला ६५ कोटी ९९ लाख ९९ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीच्या ५० टक्के म्हणजे ३२ कोटी ९९ लाख ९९ हजार रुपये कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

चार महिन्यांत खर्चाची कसरत

वेगवेगळ्या विकासकामांसाठी राज्य शासनाने १३३ कोटी रुपये जिल्ह्याला वितरित केले असले तरी हा निधी खर्च करण्याची कसरत आता यंत्रणांना करावी लागणार आहे. आतापर्यंत निधी नसल्याने ठप्प असलेल्या प्रशासकीय कामकाजांना गती द्यावी लागणार आहे. विकासकामांचे प्रस्ताव तयार करणे, त्यास मंजुरी घेणे आणि प्रत्यक्ष काम पूर्ण करणे, ही कसरत अधिकाऱ्यांना करावी लागणार असून, अंगझटकून काम केले तरच या निधीचा योग्य विनियोग लागणार आहे.