शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

अंकुरलेल्या पिकांची वन्यप्राण्यांकडून नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST

सेलू तालुक्यात सद्य:स्थितीत कापूस, सोयाबीन,उडीद,तूर हे अंकुरली असून शिवारही हिरवेगार दिसत आहे. मात्र अंकुरलेल्या या पिकांची हरीण, काळवीट, रोही, ...

सेलू तालुक्यात सद्य:स्थितीत कापूस, सोयाबीन,उडीद,तूर हे अंकुरली असून शिवारही हिरवेगार दिसत आहे. मात्र अंकुरलेल्या या पिकांची हरीण, काळवीट, रोही, रानडुक्कर,वानरे या वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. देवगांवफाटा शिवारात तर रोही, नीलगाय व हरिणांच्या कळपाच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांसमोर हे नवीन संकट उभे राहिले आहे. हे वन्यप्राणी समूहाने शेतात फिरत असून सकाळ, संध्याकाळ शेतात कोणी नसताना ते कोवळी पिके फस्त करीत आहेत. या वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढल्याने वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

वनविभाग प्रशासन झोपेतच

मागील वर्षात सेलू तालुक्यात शेतकरी मशागतीची कामे करतांना जवळपास १२ शेतकऱ्यांवर रानडुक्कराने हल्ला करून त्यांना जखमी केले होते. त्यापैकी चिकलठाणा बु.शिवारातील एका शेतकऱ्यांचा एक पाय कापावा लागला. सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या या शेतकऱ्याला अपंगत्व आले असे असतानाही वनविभाग प्रशासनाकडून याची ना दखल घेतली गेली. यामुळे वनविभाग प्रशासनाची कुंभकर्ण झोप कधी संपते, अशी मार्मिक प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

खरीप पेरणी नंतर अंकुरलेल्या पिकांची हरीण, रोही या वन्यप्राणी नासधूस करीत आहेत. त्यामुळे शेतात रात्री बराच वेळ थांबून सकाळी लवकर शेतात येणे असा दिनक्रम चालू आहे. विशेषतः हा वन्यप्राणीचा कळप एका शेतकऱ्यांना ऐकत नाही. फटाक्यांचे आवाज करून तर कधी तीन-चार शेतकरी एकत्र येऊन या वन्यप्राण्यांना काढून द्यावे, लागत आहे.

सूर्यकांत होणराव, शेतकरी, देवगांवफाटा