शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अंकुरलेल्या पिकांची वन्यप्राण्यांकडून नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST

सेलू तालुक्यात सद्य:स्थितीत कापूस, सोयाबीन,उडीद,तूर हे अंकुरली असून शिवारही हिरवेगार दिसत आहे. मात्र अंकुरलेल्या या पिकांची हरीण, काळवीट, रोही, ...

सेलू तालुक्यात सद्य:स्थितीत कापूस, सोयाबीन,उडीद,तूर हे अंकुरली असून शिवारही हिरवेगार दिसत आहे. मात्र अंकुरलेल्या या पिकांची हरीण, काळवीट, रोही, रानडुक्कर,वानरे या वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. देवगांवफाटा शिवारात तर रोही, नीलगाय व हरिणांच्या कळपाच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांसमोर हे नवीन संकट उभे राहिले आहे. हे वन्यप्राणी समूहाने शेतात फिरत असून सकाळ, संध्याकाळ शेतात कोणी नसताना ते कोवळी पिके फस्त करीत आहेत. या वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढल्याने वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

वनविभाग प्रशासन झोपेतच

मागील वर्षात सेलू तालुक्यात शेतकरी मशागतीची कामे करतांना जवळपास १२ शेतकऱ्यांवर रानडुक्कराने हल्ला करून त्यांना जखमी केले होते. त्यापैकी चिकलठाणा बु.शिवारातील एका शेतकऱ्यांचा एक पाय कापावा लागला. सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या या शेतकऱ्याला अपंगत्व आले असे असतानाही वनविभाग प्रशासनाकडून याची ना दखल घेतली गेली. यामुळे वनविभाग प्रशासनाची कुंभकर्ण झोप कधी संपते, अशी मार्मिक प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

खरीप पेरणी नंतर अंकुरलेल्या पिकांची हरीण, रोही या वन्यप्राणी नासधूस करीत आहेत. त्यामुळे शेतात रात्री बराच वेळ थांबून सकाळी लवकर शेतात येणे असा दिनक्रम चालू आहे. विशेषतः हा वन्यप्राणीचा कळप एका शेतकऱ्यांना ऐकत नाही. फटाक्यांचे आवाज करून तर कधी तीन-चार शेतकरी एकत्र येऊन या वन्यप्राण्यांना काढून द्यावे, लागत आहे.

सूर्यकांत होणराव, शेतकरी, देवगांवफाटा