शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

चार दिवसाआड पाणीपुरवठ्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:51 IST

जायकवाडी कालव्यात साचला गाळ परभणी : जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे कालव्यात सोडलेले पाणी ...

जायकवाडी कालव्यात साचला गाळ

परभणी : जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे कालव्यात सोडलेले पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाही. पाटबंधारे विभागाने कालव्यातील गाळ काढावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र, पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

एकेरी वाहतूक सुरू करण्याची मागणी

परभणी : शहरातील सर्वच रस्ते अरुंद असून, या मार्गावरून दोन्ही बाजूने वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अनेक वेळा वाहतुकीचा खोळंबा होतो. बाजारपेठ भागात ही समस्या वारंवार निर्माण होत आहे. त्यामुळे बाजारपेठ भागासह शहरातील सर्वच अरुंद रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू करावी, अशी मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.

शासकीय निवासस्थानांत वाढल्या असुविधा

परभणी : शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. या निवासस्थानांच्या फरशा उखडल्या आहेत. त्याचप्रमाणे दरवाजे, खिडक्यांची तावदाने तुटली आहेत. निवासस्थानांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचले असून, गाजरगवत वाढले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना असुरिक्षत वातावरणात वास्तव्य करावे लागत आहे.

नवीन वसाहतीत मूलभूत सुविधांचा अभाव

परभणी : शहरालगत नवीन वसाहतींची संख्या वाढली असून, या वसाहतींमध्ये महापालिकेकडून मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. रस्ते, वीज, पाणी या सुविधा या भागात उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. मनपाने काही भागांत जलवाहिनी टाकली असली तरी त्यास अद्याप पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.

‘नटराज’च्या दुरुस्तीची मागणी

परभणी : शहरातील नटराज रंगमंदिराची दुरुस्ती करून कलावंतांना या ठिकाणी त्यांची कला सादर करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी कलावंतांमधून केली जात आहे. पाच वर्षांपासून नटराज रंगमंदिर बंद असल्याने सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांची गैरसोय झाली आहे. नटराज रंगमंदिराच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.

भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव रखडला

परभणी : शहरातील भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे पाठविला आहे. मात्र, अद्यापपर्यंत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे शहरातील सांडपाणी वाहून नेण्याचा प्रश्न कायम आहे. या योजनेसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.