शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

मागणी ६० लाखांची, मिळाले २५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST

परभणी : शहरात उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टचे ठप्प पडलेले काम सुरू करण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या स्थानिक प्रशासनाने ६० लाखांची मागणी केली; ...

परभणी : शहरात उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टचे ठप्प पडलेले काम सुरू करण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या स्थानिक प्रशासनाने ६० लाखांची मागणी केली; मात्र एस.टी. महामंडळाने केवळ २५ लाख रुपयांचा निधीच वितरित केल्याने हे काम पुढे सरकण्याची शक्यता मावळली आहे.

एस.टी. महामंडळाच्या बसस्थानकांना अद्ययावत करण्याच्या उद्देशाने तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून परभणी येथे अद्ययावत बसपोर्ट मंजूर झाले. यासाठी १३ कोटी ४ लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे आता वेळेत बसपोर्टचे काम होणार? असल्याची आशा परभणीकरांना निर्माण झाली. बसस्थानकाची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी बसपोर्टच्या कामाला सुरुवातही झाली. सध्या अर्धवट अवस्थेत हे काम आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे हे काम बंद पडले. मात्र त्यानंतर पुढील काम सुरू करण्यासाठी कंत्राटदाराने आतापर्यंत केलेल्या कामाचे ६० लाख रुपयांचे देयक अदा करावे, अशी मागणी केली. कंत्राटदाराच्या मागणी प्रमाणे स्थानिक प्रशासनाने एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे या देयकाची मागणी नोंदविली. चार महिन्यानंतर एस.टी. महामंडळ प्रशासनाने केवळ २५ लाख रुपये निधी वितरित केला आहे. त्यामुळे एवढ्या धिम्या गतीने निधीचे वितरण होत असेल तर काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे, विशेष म्हणजे, काम पूर्ण करण्याची मुदत उलटून गेली आहे. तरी देखील केवळ प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे बसपोर्टचे काम सध्या ठप्प आहे. हे काम कधी सुरू होणार? असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे.

असे आहे संकल्पित बसपोर्ट

परभणी येथे उभारण्यात येणारे संकल्पित बसपोर्ट अद्ययावत असे आहे.१८प्लॅटफार्म याठिकाणी तयार केले जाणार असून, ३६४४ चौरस मीटर क्षेत्रावर बसपोर्टचे बांधकाम होणार आहे. अद्ययावत असे प्रतीक्षालय, आरक्षण कक्ष, ए.टी.एम. केंद्र, नियंत्रण कार्यालय, वाहनतळ अशा सर्व सुविधांनीयुक्त असलेले बसपोर्ट उभारण्याचा हा प्रकल्प आहे;मात्र त्यासाठी वेळेत निधी उपलब्ध होत नसल्याने सध्या काम थांबले आहे.

जुनी इमारत पाडल्याने गैरसोय

बसपोर्टची उभारणी करण्यासाठी या ठिकाणी असलेली बसस्थानकाची जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या शहरात तात्पुरत्या जागेत बसस्थानकाचा कारभार चालविला जात आहे. या ठिकाणी प्रवाशांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे जागाही अपुरी पडत आहे. तर दुसरीकडे बसपोर्ट उभारणीसाठी फारसे प्रयत्न होत नसल्याने प्रवाशांना अशी गैरसोय आणखी किती वर्षे सहन करावी लागणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.