शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
2
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
3
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
4
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
5
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
6
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
7
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
8
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
9
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
10
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
11
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
12
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
13
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
14
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
15
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
16
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
17
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
18
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
19
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
20
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष

मागणी ६० लाखांची, मिळाले २५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST

परभणी : शहरात उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टचे ठप्प पडलेले काम सुरू करण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या स्थानिक प्रशासनाने ६० लाखांची मागणी केली; ...

परभणी : शहरात उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टचे ठप्प पडलेले काम सुरू करण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या स्थानिक प्रशासनाने ६० लाखांची मागणी केली; मात्र एस.टी. महामंडळाने केवळ २५ लाख रुपयांचा निधीच वितरित केल्याने हे काम पुढे सरकण्याची शक्यता मावळली आहे.

एस.टी. महामंडळाच्या बसस्थानकांना अद्ययावत करण्याच्या उद्देशाने तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून परभणी येथे अद्ययावत बसपोर्ट मंजूर झाले. यासाठी १३ कोटी ४ लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे आता वेळेत बसपोर्टचे काम होणार? असल्याची आशा परभणीकरांना निर्माण झाली. बसस्थानकाची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी बसपोर्टच्या कामाला सुरुवातही झाली. सध्या अर्धवट अवस्थेत हे काम आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे हे काम बंद पडले. मात्र त्यानंतर पुढील काम सुरू करण्यासाठी कंत्राटदाराने आतापर्यंत केलेल्या कामाचे ६० लाख रुपयांचे देयक अदा करावे, अशी मागणी केली. कंत्राटदाराच्या मागणी प्रमाणे स्थानिक प्रशासनाने एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे या देयकाची मागणी नोंदविली. चार महिन्यानंतर एस.टी. महामंडळ प्रशासनाने केवळ २५ लाख रुपये निधी वितरित केला आहे. त्यामुळे एवढ्या धिम्या गतीने निधीचे वितरण होत असेल तर काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे, विशेष म्हणजे, काम पूर्ण करण्याची मुदत उलटून गेली आहे. तरी देखील केवळ प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे बसपोर्टचे काम सध्या ठप्प आहे. हे काम कधी सुरू होणार? असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे.

असे आहे संकल्पित बसपोर्ट

परभणी येथे उभारण्यात येणारे संकल्पित बसपोर्ट अद्ययावत असे आहे.१८प्लॅटफार्म याठिकाणी तयार केले जाणार असून, ३६४४ चौरस मीटर क्षेत्रावर बसपोर्टचे बांधकाम होणार आहे. अद्ययावत असे प्रतीक्षालय, आरक्षण कक्ष, ए.टी.एम. केंद्र, नियंत्रण कार्यालय, वाहनतळ अशा सर्व सुविधांनीयुक्त असलेले बसपोर्ट उभारण्याचा हा प्रकल्प आहे;मात्र त्यासाठी वेळेत निधी उपलब्ध होत नसल्याने सध्या काम थांबले आहे.

जुनी इमारत पाडल्याने गैरसोय

बसपोर्टची उभारणी करण्यासाठी या ठिकाणी असलेली बसस्थानकाची जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या शहरात तात्पुरत्या जागेत बसस्थानकाचा कारभार चालविला जात आहे. या ठिकाणी प्रवाशांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे जागाही अपुरी पडत आहे. तर दुसरीकडे बसपोर्ट उभारणीसाठी फारसे प्रयत्न होत नसल्याने प्रवाशांना अशी गैरसोय आणखी किती वर्षे सहन करावी लागणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.