शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
4
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
5
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
6
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
7
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
8
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
9
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
10
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
11
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
12
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
13
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
14
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
15
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
16
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
17
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
18
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
19
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
20
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

योजनेच्या उद्देशाला हारताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:12 IST

लघु बंधाऱ्याला गेट बसवा लिंबा : पाथरी तालुक्यातील लिंबा येथील एका ओढ्यावर १० वर्षांपूर्वी लघु सिंचन विभागाने उभारलेल्या लघु ...

लघु बंधाऱ्याला गेट बसवा

लिंबा : पाथरी तालुक्यातील लिंबा येथील एका ओढ्यावर १० वर्षांपूर्वी लघु सिंचन विभागाने उभारलेल्या लघु बंधाऱ्याला १० वर्षांपासून गेट बसविण्यात आले नाही. त्यामुळे ५० एकरवरील सिंचन रखडले आहे. याकडे जि.प. प्रशासनाने लक्ष देऊन तात्काळ या बंधाऱ्याला गेट बसवावेत, अशी मागणी आहे.

जिल्ह्यातील क्रीडा संघटना नावालाच

परभणी : जिल्ह्यातील खेळाडूंना भौतिक सुविधांसह वेगवेगळ्या खेळांचे प्रशिक्षण व त्यांच्या अडीअडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी क्रीडा संघटनांची, असोसिएशनची उभारणी केली जाते. परभणी जिल्ह्यात जवळपास ७१ संघटना, असोसिएशन कार्यरत आहेत. मात्र, नऊही तालुक्यांत अद्यापपर्यंत क्रीडांगण नाही, याबाबत या संघटना चुप्पी साधून आहेत.

तक्रारदार वाऱ्यावर

परभणी : निकृष्ट दर्जाचे सोयाबीनचे बियाणे दिल्याच्या जिल्ह्यात १२ हजार ५०० शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असून त्यातील ११ हजार ५०० शेतकऱ्यांच्या तक्रारींचे पंचनामे कृषी विभागाने केले आहेत. असे असले तरी अद्याप त्यांना मोबदला देण्याच्या अनुषंगाने कुठलाही धोरणात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे.

देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष

परभणी : दुष्काळाच्या अनुषंगाने महत्त्वाची असलेली पिकांची आणेवारी ठरवीत असताना पडलेल्या पावसाची नोंद ज्या पर्जन्यमानक यंत्राद्वारे घेतली जाते. त्या पर्जन्यमानक यंत्राकडेच महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.

शस्त्रक्रिया थांबल्या

परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रिया थांबल्या असल्याने रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गरीबच नाही तर सर्वसामान्यांसाठी आधार ठरलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या वतीने नेत्र विभागासाठी स्वतंत्र इमारत शहरातील शनिवार बाजार परिसरात उभारण्यात आली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेत्र शस्त्रक्रिया अद्यापही सुरळीत झाल्या नाहीत.

परसबागेतून सेंद्रिय शेती

परभणी : महाराष्ट्र ग्रामीण जीवन ज्योती अभियान (उमेद) अंतर्गत महिला स्वयंसाहाय्यता समूहाच्या माध्यमातून जिल्ह्यात ठिकठिकाणी परसबाग तयार करण्यात आली आहे. या परसबागेमध्ये औषधी वनस्पती, पालेभाज्यांची लागवड केली जाणार आहे. या भाज्यांचा फायदा नागरिकांना होणार आहे.