शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

चाचण्या कमी झाल्याने रूग्णसंख्या घटली; पॉझिटिव्हिटी दर ३२ टक्के कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:18 IST

परभणी : जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनासंशयित व्यक्तींच्या चाचण्या घटत असल्या, तरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर जवळपास ३२.५० टक्के आहे. ...

परभणी : जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनासंशयित व्यक्तींच्या चाचण्या घटत असल्या, तरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर जवळपास ३२.५० टक्के आहे. त्यामुळे रूग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्यात दिनांक १ एप्रिल ते ५ मे या कालावधीत ७८ हजार ६९५ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात तब्बल २५ हजार १६० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा पॉझिटिव्हिटी दर जवळपास ३२ टक्के आहे. यापूर्वी संशयितांच्या चाचण्या अधिक प्रमाणात होत होत्या. त्यावेळचा पॉझिटिव्हिटी दर आणि आता चाचण्या कमी होत असतानाचा पॉझिटिव्हिटी दर सारखाच असल्याने बाधितांचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला संशयितांच्या चाचण्या वाढविण्याची आवश्यकता आहे.

ग्रामीण भागात तपासणी कमीच

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना संशयितांच्या चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. आरोग्य विभागाने ३ मेपर्यंत ग्रामीण भागात ७४ हजार २१४ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. त्यात ६ हजार ४८२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे प्रमाण ८.७३ टक्के आहे.

याशिवाय याच कालावधीत ग्रामीण भागात ३६ हजार ३७८ जणांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली. त्यात ४ हजार ३१३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे प्रमाण ११.८५ टक्के आहे.

ग्रामीण भागात मुळातच तपासणीचे प्रमाण खूप कमी आहे. अनेकजण भीतीपोटी किंवा अज्ञानातून आजार अंगावर काढत आहेत.

आरटीपीसीआरचे अहवाल अधिक पॉझिटिव्ह

ॲन्टिजेन चाचणीच्या तुलनेत आरटीपीसीआर चाचणीमध्ये अधिक अचुकता असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळेच राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना या प्रक्रियेला म्हणावा तसा वेग येत नाही.

जिल्ह्यात आत्तापर्यंत १ लाख ६२ हजार ९७४ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात २३ हजार ७१२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १४.५४ टक्के आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याची गरज आहे.

जिल्हाधिकारी म्हणतात...

जिल्ह्यातील ग्रामीण भागात दररोज ५ हजार तर शहरी भागात किमान १ हजार आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे आरोग्य विभागाला आदेश देण्यात आले आहेत. ज्या गावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत, त्या गावांमध्ये १०० टक्के आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत.

- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी