शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:16 IST

जिल्हा कचेरीत वाहनांचा गराडा परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अस्ताव्यस्त वाहने लावले जात असून, वाहनांचा गराड्यातून नागरिकांना मार्ग काढावा ...

जिल्हा कचेरीत वाहनांचा गराडा

परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अस्ताव्यस्त वाहने लावले जात असून, वाहनांचा गराड्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे. विशेष म्हणजे, कार्यालयाच्या परिसरात स्वतंत्र वाहनतळाची सुविधा केली असतानाही बहुतांश नागरिक आपली वाहने कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत नेत आहेत. नागरिकांना या वाहनांचा त्रास सहन करावा लागत आहे.

किरकोळ अतिक्रमणांचा वाहतुकीस अडथळा

परभणी : शहरातील स्टेशन रोड भागात किरकोळ अतिक्रमणे वाढली आहेत. त्यातच अनेक वाहनधारक रस्त्यावरच वाहने उभी करतात. या अतिक्रमणांचा वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ही वाहने हटविल्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ होत असल्याने वाहतुकीची समस्या कायम आहे.

रस्त्याचे काम संथगतीने सुरू

परभणी : जिंतूर रस्त्याच्या निर्मितीचे काम अत्यंत संथ गतीने होत असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. साधारणत: ४० किमी अंतराचा रस्ता असून मागील दोन वर्षांपासून काम रखडलेले आहे. अर्धवट काम झाल्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

नारायण चाळ रस्त्यावर वाढले खड्डे

परभणी : शहरातील नारायणचाळ भागातील रस्त्यावर मोठे खड्डे झाले असून, वाहनधारकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. जागोजागी हा रस्ता उखडला असल्याने किरकोळ अपघात होत आहेत. मनपा प्रशासनाने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

परभणीत आठ दिवसाआड पाणीपुरवठा

परभणी : शहरातील नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीने आठ दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा केला जात आहे. वाढीव लोकसंख्येसाठी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतरही शहराचा पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. भविष्यातील उन्हाळा लक्षात घेता महानगरपालिकेने पाण्याचे नियोजन करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

वाळूचे भाव गगनाला भिडलेले

परभणी : जिल्ह्यात वाळू घाटांचा लिलाव प्रक्रिया सुरू झाली असली तरी प्रत्यक्षात वाळू घाटांतून अधिकृत वाळू उपसा सुरू झाला नाही. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना खाजगी बाजारात चढ्या दराने वाळू खरेदी करावी लागत आहे. खुल्या बाजारपेठेत वाळू नसल्याने रात्रीच्या वेळी चोरून वाळू विक्रीचा गोरखधंदा सुरू झाला आहे. याविरुद्ध महसूल प्रशासन मात्र कारवाई करीत नसल्याने वाळूमाफयांचे फावरत आहे.

निधी नसल्याने लाभार्थी अडचणीत

परभणी : रमाई आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे घराचे बांधकाम करताना लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाकडूनच निधी उपलब्ध नसल्याचे कारण स्थानिक अधिकारी देत आहेत. लाभार्थ्यांना तातडीने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी होत आहे.