शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सुमारे ८० हजार हेक्टरवरील पिके बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:22 IST

परभणी : जुलै महिन्यात दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, बाधित ...

परभणी : जुलै महिन्यात दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, बाधित क्षेत्रात थोडाफार बदल होऊन पीक पंचनाम्यांचा अहवाल लवकरच अंतिम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उत्सूकता ताणली गेली आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांत मोठा उत्साह होता. पावसाळी हंगामात होणाऱ्या पावसाच्या ७५ टक्के पाऊस या दोन महिन्यातच झाला. जुलै महिन्यात तर दोन वेळा अतिवृष्टी झाली. ११ जुलै रोजी परभणी व परिसरातील गावांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यानंतर २१ व २२ जुलै रोजी जिल्हाभरात अतिवृष्टीने थैमान घातले. जिल्ह्यातील ३१ मंडळांमध्ये या दोन दिवशी अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. अतिवृष्टी आणि ओढ्या - नाल्यांना आलेल्या पुराने शेतशिवारात ठिकठिकाणी पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले. जमिनी खरडून गेल्या. त्यामुळे ज्या पिकांवर भरोसा ठेवला तीच पिके हातची गेल्याने शेतकरी नाउमेद झाला आहे.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल प्रशासनाने हाती घेतले. अतिवृष्टीग्रस्त गावात प्रत्यक्ष भेटी देऊन नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. जवळपास सर्वच तालुक्यातील पंचनामे पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल एकत्रित करण्याचे काम सध्या सरू आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. हा अहवाल अद्याप अंतिम झाला नसल्याने त्यात थोडाफार बदल होऊ शकतो. मात्र, येत्या एक-दोन दिवसांत अहवाल अंतिम करून बाधित शेतकऱ्यांसाठी मदत मागण्याची तयारी केली जात आहे. ४८ कोटी रुपयांची आवश्यकता

अतिवृष्टीने सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना साधारणत: ६ हजार रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे मदत दिली जाऊ शकते. त्यानुसार जिल्ह्यातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ४८ कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. नुकसानीचा अहवाल अंतिम झाल्यानंतर तो शासनाकडे पाठविला जाणार असून, त्यानंतर मदतीसंदर्भातील निर्णय होणार आहे.

चार तालुक्यात सर्वाधिक नुकसान ११ जुलै रोजी परभणी तालुक्यातच अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर मात्र संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार परभणी, पालम, परभणी आणि पूर्णा या चार तालुक्यांमध्ये बाधित क्षेत्र अधिक आहे. जिल्ह्यातील बाधित क्षेत्राचा तालुकानिहाय आकडा स्पष्ट झाला नाही.