शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

सुमारे ८० हजार हेक्टरवरील पिके बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:22 IST

परभणी : जुलै महिन्यात दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, बाधित ...

परभणी : जुलै महिन्यात दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, बाधित क्षेत्रात थोडाफार बदल होऊन पीक पंचनाम्यांचा अहवाल लवकरच अंतिम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उत्सूकता ताणली गेली आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांत मोठा उत्साह होता. पावसाळी हंगामात होणाऱ्या पावसाच्या ७५ टक्के पाऊस या दोन महिन्यातच झाला. जुलै महिन्यात तर दोन वेळा अतिवृष्टी झाली. ११ जुलै रोजी परभणी व परिसरातील गावांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यानंतर २१ व २२ जुलै रोजी जिल्हाभरात अतिवृष्टीने थैमान घातले. जिल्ह्यातील ३१ मंडळांमध्ये या दोन दिवशी अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. अतिवृष्टी आणि ओढ्या - नाल्यांना आलेल्या पुराने शेतशिवारात ठिकठिकाणी पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले. जमिनी खरडून गेल्या. त्यामुळे ज्या पिकांवर भरोसा ठेवला तीच पिके हातची गेल्याने शेतकरी नाउमेद झाला आहे.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल प्रशासनाने हाती घेतले. अतिवृष्टीग्रस्त गावात प्रत्यक्ष भेटी देऊन नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. जवळपास सर्वच तालुक्यातील पंचनामे पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल एकत्रित करण्याचे काम सध्या सरू आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. हा अहवाल अद्याप अंतिम झाला नसल्याने त्यात थोडाफार बदल होऊ शकतो. मात्र, येत्या एक-दोन दिवसांत अहवाल अंतिम करून बाधित शेतकऱ्यांसाठी मदत मागण्याची तयारी केली जात आहे. ४८ कोटी रुपयांची आवश्यकता

अतिवृष्टीने सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना साधारणत: ६ हजार रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे मदत दिली जाऊ शकते. त्यानुसार जिल्ह्यातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ४८ कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. नुकसानीचा अहवाल अंतिम झाल्यानंतर तो शासनाकडे पाठविला जाणार असून, त्यानंतर मदतीसंदर्भातील निर्णय होणार आहे.

चार तालुक्यात सर्वाधिक नुकसान ११ जुलै रोजी परभणी तालुक्यातच अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर मात्र संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार परभणी, पालम, परभणी आणि पूर्णा या चार तालुक्यांमध्ये बाधित क्षेत्र अधिक आहे. जिल्ह्यातील बाधित क्षेत्राचा तालुकानिहाय आकडा स्पष्ट झाला नाही.