शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST

कोरोनाचे लसीकरण केल्यानंतर प्रत्येक नागरिकाला केंद्रावर अर्धा तास थांबणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी केंद्रांच्या परिसरात स्वतंत्र खोलीही ...

कोरोनाचे लसीकरण केल्यानंतर प्रत्येक नागरिकाला केंद्रावर अर्धा तास थांबणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी केंद्रांच्या परिसरात स्वतंत्र खोलीही तयार केली आहे. मात्र, अनेक नागरिक मला काही होत नाही, या आविर्भावात केंद्रावर न थांबता लस घेतल्यानंतर थेट निघून जातात. अशा नागरिकांना घरी गेल्यानंतर काही त्रास झाला तर तो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने लस घेतल्यानंतर केंद्रावर किमान अर्धा तास थांबणे बंधनकारक आहे.

लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी

लस घेतल्यानंतर काही जणांमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता असते. ही शक्यता खूप कमी असली तरी अशी काही लक्षणे आढळल्यास लस घेतलेल्या नागरिकास आरोग्य कर्मचाऱ्यांकडून अद्रीनॅलिन हे इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे लस घेतलेल्या नागरिकाचा जीव वाचू शकतो.

लस हेच औषध

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. लस हेच कोरोनावर औषध आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली तरी त्या नागरिकास धोका कमी असतो. त्यामुळे लसीशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रांवर तीन कक्ष केले आहेत. त्यातील एक कक्ष लस घेतल्यानंतर नागरिकास थांबण्यासाठीचा आहे. याठिकाणी प्रत्येकाला अर्धा तास आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली थांबणे आवश्यक आहे. त्याचे पालनही करणे गरजेचे आहे.

डॉ. रावजी सोनवणे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी.