शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST

कोरोनाचे लसीकरण केल्यानंतर प्रत्येक नागरिकाला केंद्रावर अर्धा तास थांबणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी केंद्रांच्या परिसरात स्वतंत्र खोलीही ...

कोरोनाचे लसीकरण केल्यानंतर प्रत्येक नागरिकाला केंद्रावर अर्धा तास थांबणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी केंद्रांच्या परिसरात स्वतंत्र खोलीही तयार केली आहे. मात्र, अनेक नागरिक मला काही होत नाही, या आविर्भावात केंद्रावर न थांबता लस घेतल्यानंतर थेट निघून जातात. अशा नागरिकांना घरी गेल्यानंतर काही त्रास झाला तर तो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने लस घेतल्यानंतर केंद्रावर किमान अर्धा तास थांबणे बंधनकारक आहे.

लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी

लस घेतल्यानंतर काही जणांमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता असते. ही शक्यता खूप कमी असली तरी अशी काही लक्षणे आढळल्यास लस घेतलेल्या नागरिकास आरोग्य कर्मचाऱ्यांकडून अद्रीनॅलिन हे इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे लस घेतलेल्या नागरिकाचा जीव वाचू शकतो.

लस हेच औषध

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. लस हेच कोरोनावर औषध आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली तरी त्या नागरिकास धोका कमी असतो. त्यामुळे लसीशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रांवर तीन कक्ष केले आहेत. त्यातील एक कक्ष लस घेतल्यानंतर नागरिकास थांबण्यासाठीचा आहे. याठिकाणी प्रत्येकाला अर्धा तास आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली थांबणे आवश्यक आहे. त्याचे पालनही करणे गरजेचे आहे.

डॉ. रावजी सोनवणे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी.