शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST

कोरोनाचे लसीकरण केल्यानंतर प्रत्येक नागरिकाला केंद्रावर अर्धा तास थांबणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी केंद्रांच्या परिसरात स्वतंत्र खोलीही ...

कोरोनाचे लसीकरण केल्यानंतर प्रत्येक नागरिकाला केंद्रावर अर्धा तास थांबणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी केंद्रांच्या परिसरात स्वतंत्र खोलीही तयार केली आहे. मात्र, अनेक नागरिक मला काही होत नाही, या आविर्भावात केंद्रावर न थांबता लस घेतल्यानंतर थेट निघून जातात. अशा नागरिकांना घरी गेल्यानंतर काही त्रास झाला तर तो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने लस घेतल्यानंतर केंद्रावर किमान अर्धा तास थांबणे बंधनकारक आहे.

लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी

लस घेतल्यानंतर काही जणांमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता असते. ही शक्यता खूप कमी असली तरी अशी काही लक्षणे आढळल्यास लस घेतलेल्या नागरिकास आरोग्य कर्मचाऱ्यांकडून अद्रीनॅलिन हे इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे लस घेतलेल्या नागरिकाचा जीव वाचू शकतो.

लस हेच औषध

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. लस हेच कोरोनावर औषध आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली तरी त्या नागरिकास धोका कमी असतो. त्यामुळे लसीशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रांवर तीन कक्ष केले आहेत. त्यातील एक कक्ष लस घेतल्यानंतर नागरिकास थांबण्यासाठीचा आहे. याठिकाणी प्रत्येकाला अर्धा तास आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली थांबणे आवश्यक आहे. त्याचे पालनही करणे गरजेचे आहे.

डॉ. रावजी सोनवणे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी.