शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

सेलू तालुक्यातील ८० गावांना कोरोनाचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:16 IST

गतवर्षी शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक होती. त्या तुलनेत ग्रामीण भागाने कोरोनाला गावच्या वेशीवर रोखण्यात चांगले यश मिळवले होते. ...

गतवर्षी शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक होती. त्या तुलनेत ग्रामीण भागाने कोरोनाला गावच्या वेशीवर रोखण्यात चांगले यश मिळवले होते. पंरतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत असताना दिसत आहे. मार्चपासून ग्रामीण भागात १ हजार ८४२ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. यात १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात मागील एक वर्षापासून आरोग्य विभागाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे आणि मुलांचे दोन्ही वसतिगृहांत कोरोना केअर सेंटर उभारले आहेत. मात्र, एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दोन्ही १६० खाटांचे सेंटर फुल्ल झाले. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी गृहविलगीकरणावर भर देऊन कोरोना केअर सेंटरवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. परंतु, १५ दिवसांचा कालावधी उलटूनही केवळ १० ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उर्वरित काम कधी पूर्ण होईल, याची खात्री आरोग्य विभागही देऊ शकत नाही. कारण, संबंधित यंत्रणेने केवळ ऑक्सिजन पाइपलाइनचे काम पूर्ण केले. दरम्यान, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडकडून उभारण्यात आलेल्या बळीराजा मोफत कोरोना केअर सेंटरमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सहा गावे बनली हाॅटस्पाॅट

मार्च महिन्यापासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सद्य:स्थितीत मोरेगाव येथे ५०, हट्टा २२, कुपटा २६, धनेगाव १५, लाडनांद्रा २७, देऊळगाव ३१ येथे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ही गावे कोरोनाची हाॅटस्पाॅट बनली आहेत. तसेच ८० गावांमध्ये सद्य:स्थितीत कोरोनाबाधित रुग्ण आहेत. दरम्यान, लक्षणे दिसत असतानादेखील दुर्लक्ष करणे, मास्क आणि फिजिकल डिस्टन्सचा पडलेला विसर, समारंभात गर्दी करणे आदी कारणांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.