शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

कोरोना मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यानेही त्यांना नाकारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:21 IST

परभणी : कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर रक्ताच्या नात्यातील व्यक्तीनीच जन्मदात्यांना नाकारल्याने मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम परभणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच ...

परभणी : कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर रक्ताच्या नात्यातील व्यक्तीनीच जन्मदात्यांना नाकारल्याने मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम परभणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच केल्याच्या तब्बल ४० घटना आतापर्यंत शहरात घडल्या आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या एकीकडे वाढत असताना उपचारादरम्यान या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ८७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मयत व्यक्तींच्या पार्थिवावर शहरात मनपा कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यानुसार गुरूवारपर्यंत ८६५ जनांच्या पार्थिवावर मनपा कमर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. अंत्यसंस्काराच्या वेळी मयताच्या कुटुंबातील ५ व्यक्तींना पीपीई किट घालून अंत्यविधीस उपस्थित राहण्याची परवनगी आहे; परंतु तब्बल ४० मयतांच्या अंत्यसंस्कारसाठी त्यांचे नातेवाईक आले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. मनपा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नातेवाइकांना निरोप देऊनही त्यांनी तुम्हीच अंत्यविधी उरकून घ्या, असा निरोप या कर्मचाऱ्यांना दिला गेला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनीच त्यांच्या पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत. दोन दिवसांपूर्वी तर शहरातील वसमत रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात मयत झालेल्या व्यक्तीच्या मुलांनी डॉक्टरांना आपणच अंत्यसंस्कार करा, आम्ही अंत्यसंस्कार करून शकत नाही, असे लिहून दिले. त्यामुळे या डॉक्टरांनी मनपा कर्मचाऱ्यांना बोलावून मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन जाण्यास सांगितले. मनपा कर्मचाऱ्यांनीही या डॉक्टरांकडून लेखी घेऊन संबधित व्यक्तीचा अंत्यविधी केला. कोरोनाच्या या काळात नात्यातील जिव्हाळा किती रूक्ष झाला आहे, याचा प्रत्यक्ष या मनपा कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून येत आहे.

मयत आईचे दागिणे काढून ३ भाऊ गायब

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील एका महिलेचे काही दिवसांपूर्वी परभणी शहरातील बसस्थानक परिसरातील एका खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले. त्यानंतर मृतदेह घेऊन जाण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले. कर्मचारी आल्यानंतर मयत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने त्यांच्या नातेवाइकांनी काढून घेतले. त्यानंतर मनपा कर्मचाऱ्यास मृतदेह अंत्यविधीसाठी पुढे घेऊन चला, आम्ही पाठीमागून आलोच, असा निरोप दिला. कर्मचारी स्मशानभूमीत गेल्यानंतर या तिन्ही भावांची वाट पाहू लागले. बऱ्याच वेळेनंतरही ते आले नाहीत, म्हणून त्यांना फोन केला असता, आमची तिकडं येण्याची हिम्मत होत नाही. आम्ही टाकळीच्या पुढे आलो आहोत, तुम्हीच आता अंत्यविधी करून घ्या, असा निरोप दिला. त्यानंतर मनपा कर्मचाऱ्यांनीच या माऊलीच्या पार्थिवावर अंत्यसस्कार केले.

८ महिन्यांच्या बाळावर अंत्यसंस्कार

१० दिवसांपूर्वी मानवत तालुक्यातील एका ८ महिन्याच्या बाळाचा कोरोनाने मृत्यू झाला. या बाळावर अंत्यसंस्कार करताना उपस्थित कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले होते.

कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करताना मन खिन्न करणारे अनेक अनुभव आले आहेत; पण जनसेवेचा वसा घेऊन नातेवाईक आला नाही तरी आम्ही आमचे कर्तव्य सक्षमपणे पार पाडत आहोत. कारण आमची बांधिलकी सामाजिक जबाबदारीशी आहे.

-करण गायकवाड

कोरोनाबाधित मयत व्यक्तींच्या पार्थिवावर प्रशासकीय नियमानुसार आम्ही सर्व सोपस्कार पार पाडून अंत्यसंस्कार करीत आहोत. काही नातेवाइकांनी दुर्लक्ष केले तरी आम्ही मात्र आमची जबाबदारी समजून हे काम करीत आहोत.

- किरण गायकवाड