शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

५५ सिंचन विहिरींच्या कामांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:43 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींचा लाभ मिळावा, यासाठी तालुक्यातील १०५ शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर ...

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींचा लाभ मिळावा, यासाठी तालुक्यातील १०५ शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले होते. पं. स. कार्यालयाने या प्रस्तावांची छाननी करून ते मंजुरीसाठी छाननी समितीकडे पाठविले. छाननी समितीने हे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. या प्रस्तावांवर दोन्ही अधिकाऱ्यांच्या सह्या झाल्या होत्या. मात्र, ५ जानेवारी २०१९ रोजी राज्य शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तत्कालीन दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन अपूर्ण असलेल्या विहिरींचे कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, एका ग्रामपंचायतीत एका वेळेस फक्त पाच विहिरींची कामे पूर्ण करण्याच्या सूचना होत्या. ही कामे पूर्ण होईपर्यंत नवीन प्रस्तावांना मान्यता देऊ नये, असे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्याचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे १०५ प्रस्तावांपैकी केवळ ५५ प्रस्तावांना तातडीने मान्यता मिळाली होती. ही मान्यता मिळून सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरीही विहिरींची कामे पुढे सरकत नव्हती. अखेर उर्वरित २८ विहिरींच्या कामांना मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

२७ ग्रा.पं. अंतर्गत कामे

तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींअंतर्गत सिंचन विहिरींची कामे सुरू झाली आहेत. त्यात आंबेगाव ५, देवलगाव आवचार १, इरळद ४, हमदापूर ४, हटकरवाडी १, जंगमवाडी १, करंजी ४, केकरजवळा ४, खडकवाडी १, किन्हाेळा ४, कोल्हा ३, मांडे वडगाव ४, मानवत रोड ३, नरळद १, पिंपळा ५, पोहंडूळ ३, रत्नापूर १, सारंगपूर २, सोमठाणा ३, सोनुळा २ आणि वझुर बु. ग्रामपंचायतीमध्ये एका सिंचन विहिरीच्या कामाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती पंचायत समितीच्या सूत्रांनी दिली.