शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांना मिळतेय शहरवासियांना पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:17 IST

परभणी : शहरातील नागरिकांना पाणी वितरित करण्याचे नियोजन विस्कळीत झाले असून, अनेक भागात १० ते ११ दिवसांतून एक वेळ ...

परभणी : शहरातील नागरिकांना पाणी वितरित करण्याचे नियोजन विस्कळीत झाले असून, अनेक भागात १० ते ११ दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मागील वर्षी येलदरी येथून नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे शहराला मुबलक पाणी उपलब्ध होईल, अशी नागरिकांची आशा होती. मात्र, ही योजना कार्यान्वित होण्यापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यात फारसा फरक नाही. येलदरी जलाशयात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र ८ ते ११ दिवसांपर्यंत पाणीपुरवठा होत नाही. शहरातील विविध भागांमध्ये जलकुंभ उभारण्यात आले आहेत. नवीन व्हॉल्व्ह टाकले आहेत. परंतु, तरीही पाण्याचे नियोजन होत नसल्याने शहरवासियांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

कारेगाव रोड भागात १० दिवसानंतर शहरवासियांना पाणीपुरवठा झाला. त्याचप्रमाणे काही भागांमध्ये ८ दिवसांतून एक वेळा पाणी उपलब्ध होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून खासगी बोअर आटले आहेत. त्यामुळे नागरिकांना नळाच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागते. परंतु, हे पाणी आठ दिवस मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणी वितरणाचे नियोजन करून शहरवासियांना किमान ४ दिवसांआड पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

पाणी वितरणासाठी खासगी कंत्राट

शहरातील नागरिकांना पाण्याचे वितरण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने १५ दिवसांपूर्वीच खासगी एजन्सीला कंत्राट दिले आहे. या एजन्सीने शहरातील व्हॉल्व्हची देखभाल करणे, पाण्याचे वितरण करणे आदी कामे करावयाची आहेत. त्याचप्रमाणे येलदरी ते धर्मापुरी या अंतरातील व्हॉल्व्ह आणि जलवाहिनीची देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठीही एक एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. खासगी एजन्सीची नियुक्ती केल्यानंतरही शहराला मात्र सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

जलकुंभ उभारल्यानंतरही परिस्थिती जैसे थे

येथील राजगोपालाचारी उद्यानात नवीन जलकुंभ उभारण्यात आला आहे. त्यामुळे ममता कॉलनी येथील पाण्याच्या टाकीवरील पाणी वितरणाचा ताण बऱ्याच अंशी कमी झाला आहे. राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभ उभारणीचे काम पूर्ण झाल्याने ममता कॉलनी येथील पाण्याच्या टाकीवरून या भागातील वसाहतींना ४ ते ५ दिवसांआड पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, जलकुंभाची उभारणी झाल्यानंतरही या भागातील पाणी वितरणाची परिस्थिती जैसे थे आहे.