शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

दहा दिवसांना मिळतेय शहरवासियांना पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:17 IST

परभणी : शहरातील नागरिकांना पाणी वितरित करण्याचे नियोजन विस्कळीत झाले असून, अनेक भागात १० ते ११ दिवसांतून एक वेळ ...

परभणी : शहरातील नागरिकांना पाणी वितरित करण्याचे नियोजन विस्कळीत झाले असून, अनेक भागात १० ते ११ दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मागील वर्षी येलदरी येथून नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे शहराला मुबलक पाणी उपलब्ध होईल, अशी नागरिकांची आशा होती. मात्र, ही योजना कार्यान्वित होण्यापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यात फारसा फरक नाही. येलदरी जलाशयात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र ८ ते ११ दिवसांपर्यंत पाणीपुरवठा होत नाही. शहरातील विविध भागांमध्ये जलकुंभ उभारण्यात आले आहेत. नवीन व्हॉल्व्ह टाकले आहेत. परंतु, तरीही पाण्याचे नियोजन होत नसल्याने शहरवासियांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

कारेगाव रोड भागात १० दिवसानंतर शहरवासियांना पाणीपुरवठा झाला. त्याचप्रमाणे काही भागांमध्ये ८ दिवसांतून एक वेळा पाणी उपलब्ध होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून खासगी बोअर आटले आहेत. त्यामुळे नागरिकांना नळाच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागते. परंतु, हे पाणी आठ दिवस मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणी वितरणाचे नियोजन करून शहरवासियांना किमान ४ दिवसांआड पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

पाणी वितरणासाठी खासगी कंत्राट

शहरातील नागरिकांना पाण्याचे वितरण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने १५ दिवसांपूर्वीच खासगी एजन्सीला कंत्राट दिले आहे. या एजन्सीने शहरातील व्हॉल्व्हची देखभाल करणे, पाण्याचे वितरण करणे आदी कामे करावयाची आहेत. त्याचप्रमाणे येलदरी ते धर्मापुरी या अंतरातील व्हॉल्व्ह आणि जलवाहिनीची देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठीही एक एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. खासगी एजन्सीची नियुक्ती केल्यानंतरही शहराला मात्र सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

जलकुंभ उभारल्यानंतरही परिस्थिती जैसे थे

येथील राजगोपालाचारी उद्यानात नवीन जलकुंभ उभारण्यात आला आहे. त्यामुळे ममता कॉलनी येथील पाण्याच्या टाकीवरील पाणी वितरणाचा ताण बऱ्याच अंशी कमी झाला आहे. राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभ उभारणीचे काम पूर्ण झाल्याने ममता कॉलनी येथील पाण्याच्या टाकीवरून या भागातील वसाहतींना ४ ते ५ दिवसांआड पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, जलकुंभाची उभारणी झाल्यानंतरही या भागातील पाणी वितरणाची परिस्थिती जैसे थे आहे.