शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

घरकुल लाभार्थींची दीड लाखावर बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:17 IST

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबांना पक्के घर मिळावे, यासाठी रमाई आवास योजना राबविली जाते. घर बांधकामासाठी अत्यल्प उत्पन्न ...

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबांना पक्के घर मिळावे, यासाठी रमाई आवास योजना राबविली जाते. घर बांधकामासाठी अत्यल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो. त्यामुळे अनेक गोरगरिबांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार झाले आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना, आदिवासी समाजातील लाभार्थींसाठी शबरी आवास, पारधी आवास व भटक्या प्रवर्गातील लाभार्थींसाठी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. एकीकडे हे सुखद असले तरी या योजनेची अंमलबजावणी करताना मात्र राज्य शासनाच्या वतीने शहरी व ग्रामीण असा भेदभाव करण्यात येत आहे. वास्तविक घरकुल बांधकाम करताना शहरी व ग्रामीण भागात चटई क्षेत्र समानच आहे. याशिवाय ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थींना बांधकामासाठी लागणारे साहित्य हे एकाच दरात घ्यावे लागते, असे असतानाही राज्य शासनाच्या वतीने मात्र ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थींना दीड लाख रुपये तर शहरी भागातील लाभार्थींना अडीच लाख रुपयांचे अनुदान घरकुल बांधकामासाठी देण्यात येते. त्यामुळे याकडे राज्य शासनाने लक्ष देऊन शहरी व ग्रामीण हा भेदभाव दूर करून ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थींनाही अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी सोनपेठ तालुक्यातील घरकुल लाभार्थींना मधून होत आहे.

मोफत वाळू उपलब्ध करून द्या

रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर झालेले झालेल्या अनेक घरकुलांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. जिल्हा प्रशासनाने काही वाळू धक्क्यांचे लिलाव केले असले तरी घरकुल लाभार्थींना मात्र माफक दरात वाळू मिळत नाही. त्यामुळे या घराची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे या घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी तालुका प्रशासनाने घरकुल लाभार्थींना पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लाभार्थींतून होत आहे.