शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ग्रामपंचायतींच्या रणधुमाळीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:14 IST

परभणी : गावपातळीवरील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, २३ डिसेंबरपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज ...

परभणी : गावपातळीवरील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, २३ डिसेंबरपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्याने गावा-गावात निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने ग्रामीण भागात वातावरण तापू लागले आहे.

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जातात. मागील काही वर्षांपासून राजकीय पक्षांनीही या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले असून, जास्तीत जास्त ग्रामपंचायती पक्षाच्या ताब्यात घेऊन पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे या निवडणुकांच्या माध्यमातून गावपुढाऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये सरपंच पदाचे आरक्षण मतदानानंतर जाहीर केले जाणार असल्याने काही प्रमाणात पॅनलप्रमुखांची गोची झाली आहे. मात्र संभाव्य आरक्षण लक्षात घेऊन पॅनलची रचना केली जात आहे. या निवडणुकीत २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. शक्यतो पॅनलच्या सर्व सदस्यांचे अर्ज एकाच वेळी दाखल केले जातात. त्यामुळे पॅनलमधील सदस्यांच्या कागदपत्रांची जमावा-जमव करणे, आरक्षित जागांवरील सदस्यांचे जात प्रमाणपत्र मिळवण्याचे काम सध्या केले जात आहे.

आजपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्याने सोमवारपासूनच ग्रामीण भागात वातावरण तापले आहे. गट तयार करण्यापासून ते गावातील मतदारांंची संख्या, वॉर्डातील संभाव्य उमेदवार यांची गणिते जुळविली जात आहेत. गावातील या राजकारणात राजकीय पक्षांनीही चाचपणी सुरू केली असून, पॅनल प्रमुखांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी गावा-गावात सुरू असून, प्रत्यक्ष अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतरच प्रचारात खरी रंगत येणार आहे.

असा आहे ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम

२३ डिसेंबर : उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

३० डिसेंबर : उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक

३१ डिसेंबर : उमेदवारी अर्जांची छाननी

४ जानेवारी : अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध

१५ जानेवारी : मतदान

१८ जानेवारी : मतमोजणी

चार हजार सदस्यांसाठी निवडणूक जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींमधील ४ हजार सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. परभणी तालुक्यात ८८ ग्रामपंचायतींत २८३ सदस्य निवडले जाणार आहेत. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यात १०१ ग्रामपंचायतींत ८०९, गंगाखेड ७० ग्रामपंचायतींमध्ये ५९०, मानवत ४१ ग्रामपंचायतींमध्ये ३३९, सेलू ६७ ग्रामपंचायतीमध्ये ५१९, सोनपेठ ३९ ग्रामपंचायतींत ३२९, पूर्णा ६५ ग्रामपंचायतीत ५४१, पाथरी ४२ ग्रामपंचायतींत ३७० आणि पालम तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांची निवड केली जाणार आहे.