शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या रणधुमाळीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:14 IST

परभणी : गावपातळीवरील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, २३ डिसेंबरपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज ...

परभणी : गावपातळीवरील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, २३ डिसेंबरपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्याने गावा-गावात निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने ग्रामीण भागात वातावरण तापू लागले आहे.

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जातात. मागील काही वर्षांपासून राजकीय पक्षांनीही या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले असून, जास्तीत जास्त ग्रामपंचायती पक्षाच्या ताब्यात घेऊन पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे या निवडणुकांच्या माध्यमातून गावपुढाऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये सरपंच पदाचे आरक्षण मतदानानंतर जाहीर केले जाणार असल्याने काही प्रमाणात पॅनलप्रमुखांची गोची झाली आहे. मात्र संभाव्य आरक्षण लक्षात घेऊन पॅनलची रचना केली जात आहे. या निवडणुकीत २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. शक्यतो पॅनलच्या सर्व सदस्यांचे अर्ज एकाच वेळी दाखल केले जातात. त्यामुळे पॅनलमधील सदस्यांच्या कागदपत्रांची जमावा-जमव करणे, आरक्षित जागांवरील सदस्यांचे जात प्रमाणपत्र मिळवण्याचे काम सध्या केले जात आहे.

आजपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्याने सोमवारपासूनच ग्रामीण भागात वातावरण तापले आहे. गट तयार करण्यापासून ते गावातील मतदारांंची संख्या, वॉर्डातील संभाव्य उमेदवार यांची गणिते जुळविली जात आहेत. गावातील या राजकारणात राजकीय पक्षांनीही चाचपणी सुरू केली असून, पॅनल प्रमुखांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी गावा-गावात सुरू असून, प्रत्यक्ष अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतरच प्रचारात खरी रंगत येणार आहे.

असा आहे ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम

२३ डिसेंबर : उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

३० डिसेंबर : उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक

३१ डिसेंबर : उमेदवारी अर्जांची छाननी

४ जानेवारी : अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध

१५ जानेवारी : मतदान

१८ जानेवारी : मतमोजणी

चार हजार सदस्यांसाठी निवडणूक जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींमधील ४ हजार सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. परभणी तालुक्यात ८८ ग्रामपंचायतींत २८३ सदस्य निवडले जाणार आहेत. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यात १०१ ग्रामपंचायतींत ८०९, गंगाखेड ७० ग्रामपंचायतींमध्ये ५९०, मानवत ४१ ग्रामपंचायतींमध्ये ३३९, सेलू ६७ ग्रामपंचायतीमध्ये ५१९, सोनपेठ ३९ ग्रामपंचायतींत ३२९, पूर्णा ६५ ग्रामपंचायतीत ५४१, पाथरी ४२ ग्रामपंचायतींत ३७० आणि पालम तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांची निवड केली जाणार आहे.