शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

मुदत संपल्याने लिलाव झालेल्या घाटांतून वाळू उपशाला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:13 IST

दोन वर्षांनंतर जिल्ह्यातील २२ वाळू घाटांचा लिलाव करण्यास राज्य पर्यावरण समितीने परवानगी दिली होती. त्यानुसार हे वाळू घाट लिलावात ...

दोन वर्षांनंतर जिल्ह्यातील २२ वाळू घाटांचा लिलाव करण्यास राज्य पर्यावरण समितीने परवानगी दिली होती. त्यानुसार हे वाळू घाट लिलावात ठेवण्यात आले. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे या २२ वाळू घाटांपैकी केवळ १४ वाळू घाटांचा लिलाव पूर्ण झाला. लिलावाअंती निविदाधारकास घाटामधून वाळू उपसा करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी ठरावीक मुदत देण्यात आली होती. ठरवून दिलेल्या कालावधीची मुदत संपल्याने जिल्हा प्रशासनाने ९ जूनपासून वाळू घाटांमधून वाळूचा उपसा करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील एकाही वाळू घाटातून अधिकृतरीत्या वाळू उपसा करता येणार नाही. विशेष म्हणजे, दोन महिन्यांत झालेल्या पावसामुळे नदीपात्रात पाणीसाठा झाला असून वाळू घाट पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाच्या निर्णयानुसार एकाही वाळू घाटातून आता वाळूचा अधिकृत उपसा करता येणार नाही. असे असले तरी अवैधरीत्या वाळूचा उपसा सुरूच आहे. याविरुद्ध महसूल प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

पुढील वर्षासाठीचे सर्वेक्षण सुरू

पुढील वर्षी वाळू घाटांचे लिलाव करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात वाळू घाटांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तहसील प्रशासनाकडून जिल्हा गौण खनिज विभागाला प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार हे सर्वेक्षण केले जात आहे. जिंतूर तालुक्यातील ५ आणि सेलू तालुक्यातील १५ घाटांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. साधारणतः डिसेंबर महिन्यात हे वाळू घाट लिलावासाठी ठेवले जातील, अशी माहिती जिल्हा गौण खनिज विभागातून देण्यात आली.