शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

मुदत संपल्याने लिलाव झालेल्या घाटांतून वाळू उपशाला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:13 IST

दोन वर्षांनंतर जिल्ह्यातील २२ वाळू घाटांचा लिलाव करण्यास राज्य पर्यावरण समितीने परवानगी दिली होती. त्यानुसार हे वाळू घाट लिलावात ...

दोन वर्षांनंतर जिल्ह्यातील २२ वाळू घाटांचा लिलाव करण्यास राज्य पर्यावरण समितीने परवानगी दिली होती. त्यानुसार हे वाळू घाट लिलावात ठेवण्यात आले. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे या २२ वाळू घाटांपैकी केवळ १४ वाळू घाटांचा लिलाव पूर्ण झाला. लिलावाअंती निविदाधारकास घाटामधून वाळू उपसा करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी ठरावीक मुदत देण्यात आली होती. ठरवून दिलेल्या कालावधीची मुदत संपल्याने जिल्हा प्रशासनाने ९ जूनपासून वाळू घाटांमधून वाळूचा उपसा करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील एकाही वाळू घाटातून अधिकृतरीत्या वाळू उपसा करता येणार नाही. विशेष म्हणजे, दोन महिन्यांत झालेल्या पावसामुळे नदीपात्रात पाणीसाठा झाला असून वाळू घाट पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाच्या निर्णयानुसार एकाही वाळू घाटातून आता वाळूचा अधिकृत उपसा करता येणार नाही. असे असले तरी अवैधरीत्या वाळूचा उपसा सुरूच आहे. याविरुद्ध महसूल प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

पुढील वर्षासाठीचे सर्वेक्षण सुरू

पुढील वर्षी वाळू घाटांचे लिलाव करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात वाळू घाटांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तहसील प्रशासनाकडून जिल्हा गौण खनिज विभागाला प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार हे सर्वेक्षण केले जात आहे. जिंतूर तालुक्यातील ५ आणि सेलू तालुक्यातील १५ घाटांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. साधारणतः डिसेंबर महिन्यात हे वाळू घाट लिलावासाठी ठेवले जातील, अशी माहिती जिल्हा गौण खनिज विभागातून देण्यात आली.