शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

दिव्यांगांच्या तक्रारीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ हा कायदा १७ एप्रिल २०१७ पासून देशभर लागू केला आहे. त्यानुसार पंचायतराज ...

केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ हा कायदा १७ एप्रिल २०१७ पासून देशभर लागू केला आहे. त्यानुसार पंचायतराज संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातून ५ टक्के निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी राबवायच्या योजनांवर खर्च करण्याच्या सूचना २५ जून २०१८ रोजी शासनाने दिल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेनुसार दिव्यांगांचे हक्क, त्यांच्यासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या योजना, अंमलबजावणी व तक्रारींची नोंद घेण्यासाठी राज्य शासनाने विविध विभागांची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार विभागीयस्तरावर विकास विभागाच्या उपायुक्तांकडे, तर जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे, तसेच तालुकास्तरावर गटविकास अधिकारी आणि जिल्हास्तरावर ग्रामसेवकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याच अधिकाऱ्यांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

यासंदर्भातील आदेश ग्रामविकास विभागाने १० डिसेंबर रोजी काढला आहे. त्यामध्ये तक्रार निवारण अधिकाऱ्यांनी विहित पद्धतीचा अवलंब करून शासनाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दिरंगाई केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.