शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकनंतर भाजीपाला २० ते २५ टक्क्यांनी महागला; वांगी २० रुपयांनी महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:13 IST

परभणी शहरातील बाजारपेठेत तालुक्यातील विविध गावांमधून तसेच शेजारच्या जिल्ह्यांमधून भाजीपाल्याची आवक होत असते. जिंतूर, मानवत, गंगाखेड येथीलही काही शेतकरी ...

परभणी शहरातील बाजारपेठेत तालुक्यातील विविध गावांमधून तसेच शेजारच्या जिल्ह्यांमधून भाजीपाल्याची आवक होत असते. जिंतूर, मानवत, गंगाखेड येथीलही काही शेतकरी परभणीच्या बाजारात आपला भाजीपाला विक्री करण्यासाठी येत असतात. परभणीत गेल्या काही दिवसांत बाजारात होणारी भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे बहुतांश भाज्यांच्या दरात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजट बिघडले आहे.

पुन्हा वरणावर जोर

बाजारात बटाटे, पानगोबी, वांगी, कोथिंबीर, दोडके, लसून, कांदा आदींच्या दरात वाढ झाली आहे. अगोदरच गॅस महाग झाल्याने घर चालवताना अडचण येत आहे. त्यात भाजीपाला महागल्याने अडचण येत आहे.

- सुनीता कवडे, गृहिणी

गॅस महागला आहे. काही दिवसांपूर्वी गोडेतेल महागले होते. ते थोडे स्वस्त झाल्याने दिलासा मिळाला असताना आता अत्यावश्यक असा भाजीपाला महागला आहे. त्यामुळे पुन्हा दाळच खावी लागणार आहे.

- सुलोचना मस्के, गृहिणी

म्हणून वाढले दर...

मार्च ते एप्रिलदरम्यान लागवड केलेला भाजीपाला आता संपला आहे. त्यामुळे शेतातून होणारी भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. अधिकचा भाजीपाला येण्यास वेळ लागणार आहे.

- एच.एम. वाघमारे, व्यापारी, परभणी

भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. अशात नागरिकांकडून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे टंचाईतून भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. बाजारात नवीन भाजीपाला आल्यास दर कमी होणार आहेत.

- सुरेश मोरे, व्यापारी, परभणी

शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा

शेतात काबाडकष्ट करून आम्ही भाजीपाला पिकवतो; परंतु आम्हाला म्हणावा तसा भाव मिळत नाही अन् बाजारात मात्र चढ्या दराने तो विकला जात आहे, याचे वाईट वाटते. त्यामुळे उत्पादकांना चांगला भाव मिळेल, असे धोरण ठरवणे गरजेचे आहे.

- अंबादास शेळके, शेतकरी

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा भाजीपाला कवडीमोल दराने खरेदी केला जातो आणि शहरात नागरिकांना तो जास्तीच्या दराने विकला जातो. त्यामुळे व्यापारी मालामाल होत आहेत. शेतकरी हिताचा याबाबत निर्णय व्हावा.

- शंकरराव कोल्हे, शेतकरी