शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊननंतर जिंतूर तालुक्यात रोजगाराचा प्रश्न बनला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:16 IST

जिंतूर- कोरोना संसर्गामुळे तालुक्यातून मोठ्या शहरांसह परराज्यात रोजगारानिमित्त गेलेले अनेक युवक स्वगृही परतले आहेत. परंतु, आज अनेकांच्या हाताला काम ...

जिंतूर- कोरोना संसर्गामुळे तालुक्यातून मोठ्या शहरांसह परराज्यात रोजगारानिमित्त गेलेले अनेक युवक स्वगृही परतले आहेत. परंतु, आज अनेकांच्या हाताला काम नसल्यामुळे गावोगावी बेरोजगारांची संख्या आणखीनच वाढली अाहे. त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात जवळपास ३० हजार सुशिक्षित युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत असून हे युवक व्यवसाय अथवा नोकरीनिमित्त देशातील महानगर, राज्य किंवा विदेशात गेले होते. मात्र, कोरोना महामारीमुळे त्यांना फटका बसला असून रोजगार संपुष्टात आले आहेत. त्यामुळे गावाची वाट या नवतरुण युवकांना धरावी लागली. हा सर्व प्रकार खरीप हंगामाच्या सुरुवातीस झाल्याने काहींनी शेती करणे पसंत केले तर काही युवक बेरोजगार राहिले. त्यामुळे त्यांचा भार कुटुंबांना सोसावा लागला. तालुक्यात एकही मोठा उद्योगव्यवसाय आजघडीला सुरू नाही. औद्योगिक वसाहतीत परराज्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे तालुक्यातील युवकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध केला जात नाही. त्यात अनेक लघुउद्योग असले तरी स्थानिक मजुरांना मात्र रोजगार उपलब्ध केला जात नाही, अशी ओरड होत असते. तालुक्यात माजी राज्यमंत्री यांचा खत कारखाना तालुक्यातील अनेक युवकांसाठी रोजगाराचे केंद्र ठरला होता. परंतु, राजकीय धुळवडीमुळे मागील कित्येक वर्षांपासून तोही गंजून बंद पडला आहे. तर तालुक्यातील जवळपास १० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माजी आमदारांनी मोठा गाजावाजा करून साखर कारखान्याची पायाभरणी केली. परंतु, अजूनही हे काम पूर्णत्वास गेलेले नाही. तालुक्यात मागील पन्नास वर्षांपासून राजकीय सत्तापालट होऊनही केवळ राजकीय इच्छाशक्तीअभावी तालुक्यातील उद्योग व्यवसायास गती मिळालेली नाही. आजही अनेक तरुणांना रोजगार देणाऱ्या उद्योगांचे काम थंडबस्त्यात आहे. निवडणूक आली की, राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून अनेक आश्वासने दिली जातात. मात्र, पूर्तता होत नसल्यामुळे जिंतूर तालुक्यात रोजगारनिर्मिती दीवास्वप्नच राहत आहे. त्यामुळे रखडलेले उद्योग-व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे. शासनाने स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करावी किंवा लघुउद्योगासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी शासनदरबारी केली आहे.

दारू, गुटखा विक्रीकडे वळले तरुण

मोठ्या शहरात उद्योग व्यवसाय करणारे तरुण मागील सहा महिन्यांपासून गावाकडे परतले आहेत. येथे हाताला काम न मिळाल्यामुळे अनेक तरुण अवैध मार्गाने दारू- गुटखा विक्रीकडे वळले असून त्यामधून रोजगार निर्माण करत आहेत. तालुक्यात उद्योग-व्यवसाय नसल्यामुळे तरुण पिढी या वाममार्गाकडे जात आहे.