शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊननंतर जिंतूर तालुक्यात रोजगाराचा प्रश्न बनला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:16 IST

जिंतूर- कोरोना संसर्गामुळे तालुक्यातून मोठ्या शहरांसह परराज्यात रोजगारानिमित्त गेलेले अनेक युवक स्वगृही परतले आहेत. परंतु, आज अनेकांच्या हाताला काम ...

जिंतूर- कोरोना संसर्गामुळे तालुक्यातून मोठ्या शहरांसह परराज्यात रोजगारानिमित्त गेलेले अनेक युवक स्वगृही परतले आहेत. परंतु, आज अनेकांच्या हाताला काम नसल्यामुळे गावोगावी बेरोजगारांची संख्या आणखीनच वाढली अाहे. त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात जवळपास ३० हजार सुशिक्षित युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत असून हे युवक व्यवसाय अथवा नोकरीनिमित्त देशातील महानगर, राज्य किंवा विदेशात गेले होते. मात्र, कोरोना महामारीमुळे त्यांना फटका बसला असून रोजगार संपुष्टात आले आहेत. त्यामुळे गावाची वाट या नवतरुण युवकांना धरावी लागली. हा सर्व प्रकार खरीप हंगामाच्या सुरुवातीस झाल्याने काहींनी शेती करणे पसंत केले तर काही युवक बेरोजगार राहिले. त्यामुळे त्यांचा भार कुटुंबांना सोसावा लागला. तालुक्यात एकही मोठा उद्योगव्यवसाय आजघडीला सुरू नाही. औद्योगिक वसाहतीत परराज्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे तालुक्यातील युवकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध केला जात नाही. त्यात अनेक लघुउद्योग असले तरी स्थानिक मजुरांना मात्र रोजगार उपलब्ध केला जात नाही, अशी ओरड होत असते. तालुक्यात माजी राज्यमंत्री यांचा खत कारखाना तालुक्यातील अनेक युवकांसाठी रोजगाराचे केंद्र ठरला होता. परंतु, राजकीय धुळवडीमुळे मागील कित्येक वर्षांपासून तोही गंजून बंद पडला आहे. तर तालुक्यातील जवळपास १० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माजी आमदारांनी मोठा गाजावाजा करून साखर कारखान्याची पायाभरणी केली. परंतु, अजूनही हे काम पूर्णत्वास गेलेले नाही. तालुक्यात मागील पन्नास वर्षांपासून राजकीय सत्तापालट होऊनही केवळ राजकीय इच्छाशक्तीअभावी तालुक्यातील उद्योग व्यवसायास गती मिळालेली नाही. आजही अनेक तरुणांना रोजगार देणाऱ्या उद्योगांचे काम थंडबस्त्यात आहे. निवडणूक आली की, राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून अनेक आश्वासने दिली जातात. मात्र, पूर्तता होत नसल्यामुळे जिंतूर तालुक्यात रोजगारनिर्मिती दीवास्वप्नच राहत आहे. त्यामुळे रखडलेले उद्योग-व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे. शासनाने स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करावी किंवा लघुउद्योगासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी शासनदरबारी केली आहे.

दारू, गुटखा विक्रीकडे वळले तरुण

मोठ्या शहरात उद्योग व्यवसाय करणारे तरुण मागील सहा महिन्यांपासून गावाकडे परतले आहेत. येथे हाताला काम न मिळाल्यामुळे अनेक तरुण अवैध मार्गाने दारू- गुटखा विक्रीकडे वळले असून त्यामधून रोजगार निर्माण करत आहेत. तालुक्यात उद्योग-व्यवसाय नसल्यामुळे तरुण पिढी या वाममार्गाकडे जात आहे.