शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

प्रकल्पात मुबलक पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:14 IST

रब्बी पेरण्या अंतिम टप्प्यात परभणी : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या असून, आता पेरण्यांना वेग आला आहे. ...

रब्बी पेरण्या अंतिम टप्प्यात

परभणी : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या असून, आता पेरण्यांना वेग आला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी हंगामावरच आहे. त्यामुळे गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी केली जात आहे. १५ डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी करता येईल, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.

वाहनतळाअभावी वाहतुकीची समस्या

परभणी : शहरात बाजारपेठ भागात पुरेशा प्रमाणात वाहनतळाची जागा उपलब्ध नसल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. मध्यंतरी मनपाने वाहनतळाच्या जागा निश्चित करुन दिल्या होत्या. मात्र या जागांवर अतिक्रमणे झाली असून, वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत. त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.

स्वेटर विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा

परभणी : यावर्षी जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली नसल्याने स्वेटर विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. येथील सीटी क्लबच्या मैदानावर विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. मात्र ग्राहकच नसल्याने या विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. आता चार दिवसांपासून थंडीत वाढ झाल्याने ग्राहक खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल होतील, अशी आशा या विक्रेत्यांना आहे.

रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण

परभणी : येथील ममता कॉलनी भागात डांबरी रस्त्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांची अनेक दिवसांची रस्त्यांची समस्या मार्गी लागली आहे. रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

भुयारी गटार योजनेची प्रतीक्षा

परभणी : शहरात अद्यापही भुयारी गटार योजना नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला असून, सांडपाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तेव्हा शहरासाठी भुयारी गटार योजनेच्या प्रस्तावासाठी पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे.

फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा

परभणी : शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या कार्यालयासमोर दररोज ग्राहकांची रांग लागत असून, फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडत आहे. ग्राहक रस्त्याच्या कडेलाच रांग लावून बँकेचे व्यवहार पूर्ण करीत आहेत. विशेष म्हणजे, रांगेत असलेले बहुतांश ग्राहक मास्कचाही वापर करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.