शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

प्रकल्पात मुबलक पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:14 IST

रब्बी पेरण्या अंतिम टप्प्यात परभणी : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या असून, आता पेरण्यांना वेग आला आहे. ...

रब्बी पेरण्या अंतिम टप्प्यात

परभणी : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या असून, आता पेरण्यांना वेग आला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी हंगामावरच आहे. त्यामुळे गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी केली जात आहे. १५ डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी करता येईल, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.

वाहनतळाअभावी वाहतुकीची समस्या

परभणी : शहरात बाजारपेठ भागात पुरेशा प्रमाणात वाहनतळाची जागा उपलब्ध नसल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. मध्यंतरी मनपाने वाहनतळाच्या जागा निश्चित करुन दिल्या होत्या. मात्र या जागांवर अतिक्रमणे झाली असून, वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत. त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.

स्वेटर विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा

परभणी : यावर्षी जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली नसल्याने स्वेटर विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. येथील सीटी क्लबच्या मैदानावर विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. मात्र ग्राहकच नसल्याने या विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. आता चार दिवसांपासून थंडीत वाढ झाल्याने ग्राहक खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल होतील, अशी आशा या विक्रेत्यांना आहे.

रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण

परभणी : येथील ममता कॉलनी भागात डांबरी रस्त्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांची अनेक दिवसांची रस्त्यांची समस्या मार्गी लागली आहे. रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

भुयारी गटार योजनेची प्रतीक्षा

परभणी : शहरात अद्यापही भुयारी गटार योजना नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला असून, सांडपाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तेव्हा शहरासाठी भुयारी गटार योजनेच्या प्रस्तावासाठी पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे.

फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा

परभणी : शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या कार्यालयासमोर दररोज ग्राहकांची रांग लागत असून, फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडत आहे. ग्राहक रस्त्याच्या कडेलाच रांग लावून बँकेचे व्यवहार पूर्ण करीत आहेत. विशेष म्हणजे, रांगेत असलेले बहुतांश ग्राहक मास्कचाही वापर करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.