शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

सिंचन विहिरींचे ९०६ प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:17 IST

शेतकऱ्यांना शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य शासनाच्या वतीने रोजगार हमी योजना राबविण्यात येते. या योजनेतंर्गत वैयक्तिक लाभाअंतर्गत सिंचन ...

शेतकऱ्यांना शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य शासनाच्या वतीने रोजगार हमी योजना राबविण्यात येते. या योजनेतंर्गत वैयक्तिक लाभाअंतर्गत सिंचन विहिरी देण्यात येतात. या विहिरीला जवळपास ३ लाख रुपयांचा निधी अनुदान स्वरूपात दिला जातो. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांतर्गत १४०८ प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी ९०६ प्रस्तावांना मंजुरी देत ५०२ प्रस्ताव अपात्र ठरविले आहेत. प्राप्त प्रस्तावांना वेळेत निधी मिळत नसल्याने काही ठिकाणी कामे रखडली आहेत. मात्र, काही भागांत शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे पूर्ण करून शाश्वत पाण्याचा साठा निर्माण केला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागांतर्गत ज्या शेतकऱ्यांचे अपात्र प्रस्ताव ठरविण्यात आले आहेत. त्या शेतकऱ्यांनी त्रुटीची पूर्तता करावी, असे आवाहन रोजगार हमी योजना विभागाकडून करण्यात आले आहे. सद्यस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीसाठी एकही सिंचन विहिरीचा प्रस्ताव प्रलंबित नसल्याची माहिती या विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

सर्वाधिक प्रस्ताव मानवत तालुक्यातून प्राप्त

रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींचा लाभ घेण्यासाठी सर्वाधिक प्रस्ताव मानवत तालुक्यातून प्राप्त झाले आहेत. यामध्ये ३०९ प्रस्ताव मानवत तालुक्यातून प्राप्त झाले आहेत.

प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी १५६ प्रस्तावांना रोजगार हमी योजना विभागाच्या वतीने मंजुरी देण्यात आली. विशेषत: प्राप्त प्रस्तावांपैकी निम्मे म्हणजेच, १५३ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अपात्र प्रस्ताव

जिल्ह्यातील नऊही तालुक्यांतून १४०८ प्रस्ताव या विभागाला प्राप्त झाले असताना या विभागाने केवळ ९०६ प्रस्ताव गृहीत धरून त्यांना मंजुरी दिली आहे. मात्र, ५०२ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांची इच्छा असूनही केवळ प्रस्ताव अपात्र ठरविल्याने त्यांना सिंचन विहिरीचा लाभ मिळविताना अडचणी निर्माण झाल्या आहेत.

गंगाखेडमधून सर्वात कमी प्रस्ताव

रोजगार हमी योजनेतंर्गत सिंचन विहिरींचा लाभ घेण्यासाठी पूर्णा तालुक्यातून केवळ १० प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले.

त्याापैकी ७ प्रस्तावांना या विभागाने मंजुरी दिली आहे. यातील काही कामे सुरूही झाली आहेत. मात्र ३ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत.