शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

जिल्ह्यातील ७२ महाविद्यालये सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:19 IST

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे बंद असलेली महाविद्यालये तब्बल दहा महिन्यांनंतर सोमवारी सुरू झाली. आतापर्यंत ओसाड असलेला हा परिसर विद्यार्थ्यांच्या ...

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे बंद असलेली महाविद्यालये तब्बल दहा महिन्यांनंतर सोमवारी सुरू झाली. आतापर्यंत ओसाड असलेला हा परिसर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने मात्र प्रथमच गजबजून गेला.

कोरोना संसर्गामुळे राज्यभरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. जानेवारी महिन्यापासून शिक्षण विभागाने टप्प्याटप्प्याने शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली. जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू असले, तरी महाविद्यालये मात्र बंद होती. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १५ फेब्रुवारीपासून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर सोमवारपासून महाविद्यालयातील अध्यापन सुरू झाले आहे. सोमवारी महाविद्यालयात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढलेला होता. अनेक महिन्यांनंतर महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनीही पहिल्या दिवशी उपस्थिती दर्शविली.

जिल्ह्यात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे ७२ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमधून ३० हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेतात. शासनाच्या नियमानुसार ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थितीतच महाविद्यालये सुरू करण्यात आली. सोमवारी मात्र, अनेक महाविद्यालयांमधून सर्वसाधारणपणे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत उपस्थिती दिसून आली.

महाविद्यालयांनी केले प्रतिबंधात्मक उपाय

सोमवारपासून महाविद्यालये सुरू होणार असल्याने महाविद्यालय प्रशासनाने कोरोनाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय केल्याचे दिसून आले. शहरी भागातील सर्वच महाविद्यालयांमध्ये प्रवेशद्वारासमोरच सॅनिटायझर ठेवण्यात आले होते, तसेच महाविद्यालयाच्या परिसरातही फवारणी करण्यात आली होती.

प्राध्यापक, कर्मचारी मास्क परिधान करूनच महाविद्यालयात दाखल झाले होते. या शिवाय काही महाविद्यालयांमध्ये मास्क न घातलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावरच थांबवून मास्कचा वापर बंधनकारक केला होता.

मास्क, सॅनिटायझरचा फाटा

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने नागरिकांमधील भीती दूर झाली आहे. मात्र, महाविद्यालयात दाखल होताना विद्यार्थ्यांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आले असताना, अनेक विद्यार्थी विनामास्क महाविद्यालयात आल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.

पहिल्याच दिवशी सर्व तासिका केल्या. आम्ही सर्व विद्यार्थी गणवेशात उपस्थित होतो. दहा महिन्यांनंतर आमचे शिक्षक, मित्र भेटल्याने आनंद झाला.

भागवत गलांडे, विद्यार्थी

दहा महिन्यांनंतर खऱ्या अर्थाने गुरू-शिष्यांची भेट झाली. त्यामुळे आनंद वाटला. आज प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन तासिका करता आल्याने समाधान वाटत आहे.

संतोष गरुड, विद्यार्थी

कोरोना कधी संपतो आणि कधी मी कॉलेजला जातो, असे वाटत होते. आज तो दिवस समोर आला. कॉलेजमध्ये प्रत्यक्ष वर्ग तासिका केल्याने समाधान वाटले.

ज्ञानेश्वर खराटे, विद्यार्थी