शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

एका वर्षात ७ मृत्यू, तर शेकडो जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

मानवत : मानवत रोड ते पाथरीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची संख्या वाढली असून, शहराजवळ असलेल्या रत्नापूर येथे नागमोडी वळणामुळे ...

मानवत : मानवत रोड ते पाथरीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची संख्या वाढली असून, शहराजवळ असलेल्या रत्नापूर येथे नागमोडी वळणामुळे वाहन चालविणे धोकादायक झाले असून, मागील वर्षभरात ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, शेकडो प्रवासी जायबंदी झाले आहेत.

तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग ६१ जातो. तीन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील गढी ते मानवत रोडपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग हैदराबाद, नांदेड, परभणी शहरासह पुणे, मुंबई मार्गाला जोडणारा आहे. त्यामुळे वाहन चालक या रस्त्याला प्राधान्य देत असल्याने या रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. पाथरी ते मानवत रस्त्यावर रत्नापूर गावाजवळ या राष्ट्रीय महामार्गावर नागमोडी वळण आहे. हे वळण अपघात प्रवण क्षेत्र झाले असून, २६ जुलै २०१९ रोजी याच ठिकाणी दुचाकीवरून जात असलेल्या मिहलेला ट्रकने चिरडल्याने मृत्यू झाला होता. जून २०१९ मध्ये चालत्या ट्रॅव्हल्समधून पडून एका मुलीचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर २०१८ मध्ये बसने धडक दिल्याने एका तलाठ्याचा मृत्यू झाला होता. गतवर्षी रत्नापूर येथे लग्न सोहळा सुरू असताना खाजगी बस लग्न सोहळ्यात घुसल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले होते. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. त्याचबरोबर मानवत येथे लग्नासाठी जात असताना पोहेटाकळीवरून आलेल्या वऱ्हाडाचे वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात जखमींची संख्या जास्त होती. हे सर्व अपघात रत्नापूरजवळ ५०० मीटर अंतरावर घडले आहे. ११ डिसेंबर रोजी शहरातील बुद्धनगर येथील ३७ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. त्यामुळे हा गुळगुळीत रस्ता मृत्यूस्थळ बनत आहे.

ट्राॅमा केअरची गरज

पाथरी ते कोल्हा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी अपघाताची संख्या वाढली आहे. मात्र पुरेशा वैद्यकीय सुविधांअभावी या अपघातांमधील जखमींची हेळसांड होत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना नाहक जीवही गमवावा लागतो. त्यामुळे मानवत येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात ट्रॉमा केअर सेंटर उभारणीची मागणी जोर धरू लागली आहे.

स्पीड ब्रेकर्सची आवश्यकता

पाथरी ते मानवत रस्त्यावर कुठेही स्पीड ब्रेकर्स उभारण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवणे अवघड झाले आहे. रत्नापूरजवळ स्पीड ब्रेकर्स उभारावेत, अशी मागणी अनेक वेळा ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, मागणीकडे दुर्लक्ष होत असून, अपघाताची संख्या वाढल्याने ग्रामस्थांसह या रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.