शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
2
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
3
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
4
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
5
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
6
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
7
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
8
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
9
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
10
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
11
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
12
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
14
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
15
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
16
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
17
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
18
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
19
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
20
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

एका वर्षात ७ मृत्यू, तर शेकडो जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

मानवत : मानवत रोड ते पाथरीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची संख्या वाढली असून, शहराजवळ असलेल्या रत्नापूर येथे नागमोडी वळणामुळे ...

मानवत : मानवत रोड ते पाथरीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची संख्या वाढली असून, शहराजवळ असलेल्या रत्नापूर येथे नागमोडी वळणामुळे वाहन चालविणे धोकादायक झाले असून, मागील वर्षभरात ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, शेकडो प्रवासी जायबंदी झाले आहेत.

तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग ६१ जातो. तीन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील गढी ते मानवत रोडपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग हैदराबाद, नांदेड, परभणी शहरासह पुणे, मुंबई मार्गाला जोडणारा आहे. त्यामुळे वाहन चालक या रस्त्याला प्राधान्य देत असल्याने या रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. पाथरी ते मानवत रस्त्यावर रत्नापूर गावाजवळ या राष्ट्रीय महामार्गावर नागमोडी वळण आहे. हे वळण अपघात प्रवण क्षेत्र झाले असून, २६ जुलै २०१९ रोजी याच ठिकाणी दुचाकीवरून जात असलेल्या मिहलेला ट्रकने चिरडल्याने मृत्यू झाला होता. जून २०१९ मध्ये चालत्या ट्रॅव्हल्समधून पडून एका मुलीचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर २०१८ मध्ये बसने धडक दिल्याने एका तलाठ्याचा मृत्यू झाला होता. गतवर्षी रत्नापूर येथे लग्न सोहळा सुरू असताना खाजगी बस लग्न सोहळ्यात घुसल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले होते. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. त्याचबरोबर मानवत येथे लग्नासाठी जात असताना पोहेटाकळीवरून आलेल्या वऱ्हाडाचे वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात जखमींची संख्या जास्त होती. हे सर्व अपघात रत्नापूरजवळ ५०० मीटर अंतरावर घडले आहे. ११ डिसेंबर रोजी शहरातील बुद्धनगर येथील ३७ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. त्यामुळे हा गुळगुळीत रस्ता मृत्यूस्थळ बनत आहे.

ट्राॅमा केअरची गरज

पाथरी ते कोल्हा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी अपघाताची संख्या वाढली आहे. मात्र पुरेशा वैद्यकीय सुविधांअभावी या अपघातांमधील जखमींची हेळसांड होत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना नाहक जीवही गमवावा लागतो. त्यामुळे मानवत येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात ट्रॉमा केअर सेंटर उभारणीची मागणी जोर धरू लागली आहे.

स्पीड ब्रेकर्सची आवश्यकता

पाथरी ते मानवत रस्त्यावर कुठेही स्पीड ब्रेकर्स उभारण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवणे अवघड झाले आहे. रत्नापूरजवळ स्पीड ब्रेकर्स उभारावेत, अशी मागणी अनेक वेळा ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, मागणीकडे दुर्लक्ष होत असून, अपघाताची संख्या वाढल्याने ग्रामस्थांसह या रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.