शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

एका वर्षात ७ मृत्यू, तर शेकडो जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

मानवत : मानवत रोड ते पाथरीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची संख्या वाढली असून, शहराजवळ असलेल्या रत्नापूर येथे नागमोडी वळणामुळे ...

मानवत : मानवत रोड ते पाथरीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची संख्या वाढली असून, शहराजवळ असलेल्या रत्नापूर येथे नागमोडी वळणामुळे वाहन चालविणे धोकादायक झाले असून, मागील वर्षभरात ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, शेकडो प्रवासी जायबंदी झाले आहेत.

तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग ६१ जातो. तीन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील गढी ते मानवत रोडपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग हैदराबाद, नांदेड, परभणी शहरासह पुणे, मुंबई मार्गाला जोडणारा आहे. त्यामुळे वाहन चालक या रस्त्याला प्राधान्य देत असल्याने या रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. पाथरी ते मानवत रस्त्यावर रत्नापूर गावाजवळ या राष्ट्रीय महामार्गावर नागमोडी वळण आहे. हे वळण अपघात प्रवण क्षेत्र झाले असून, २६ जुलै २०१९ रोजी याच ठिकाणी दुचाकीवरून जात असलेल्या मिहलेला ट्रकने चिरडल्याने मृत्यू झाला होता. जून २०१९ मध्ये चालत्या ट्रॅव्हल्समधून पडून एका मुलीचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर २०१८ मध्ये बसने धडक दिल्याने एका तलाठ्याचा मृत्यू झाला होता. गतवर्षी रत्नापूर येथे लग्न सोहळा सुरू असताना खाजगी बस लग्न सोहळ्यात घुसल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले होते. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. त्याचबरोबर मानवत येथे लग्नासाठी जात असताना पोहेटाकळीवरून आलेल्या वऱ्हाडाचे वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात जखमींची संख्या जास्त होती. हे सर्व अपघात रत्नापूरजवळ ५०० मीटर अंतरावर घडले आहे. ११ डिसेंबर रोजी शहरातील बुद्धनगर येथील ३७ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. त्यामुळे हा गुळगुळीत रस्ता मृत्यूस्थळ बनत आहे.

ट्राॅमा केअरची गरज

पाथरी ते कोल्हा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी अपघाताची संख्या वाढली आहे. मात्र पुरेशा वैद्यकीय सुविधांअभावी या अपघातांमधील जखमींची हेळसांड होत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना नाहक जीवही गमवावा लागतो. त्यामुळे मानवत येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात ट्रॉमा केअर सेंटर उभारणीची मागणी जोर धरू लागली आहे.

स्पीड ब्रेकर्सची आवश्यकता

पाथरी ते मानवत रस्त्यावर कुठेही स्पीड ब्रेकर्स उभारण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवणे अवघड झाले आहे. रत्नापूरजवळ स्पीड ब्रेकर्स उभारावेत, अशी मागणी अनेक वेळा ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, मागणीकडे दुर्लक्ष होत असून, अपघाताची संख्या वाढल्याने ग्रामस्थांसह या रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.