शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चाऱ्या दुरुस्तीवर ४ कोटींचा खर्च, स्थिती मात्र जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:32 IST

जिल्ह्यात जायकवाडी प्रकल्पाच्या पैठण डावा कालव्याअंतर्गत चाऱ्यांची कामे निकृष्ट दर्जाची केली असून, कालव्यातील झाडेझुडपे काढण्यात न आल्याने शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत ...

जिल्ह्यात जायकवाडी प्रकल्पाच्या पैठण डावा कालव्याअंतर्गत चाऱ्यांची कामे निकृष्ट दर्जाची केली असून, कालव्यातील झाडेझुडपे काढण्यात न आल्याने शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत जानेवारी २०२० मध्ये विभागीय आयुक्तांकडे शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे, अशी तक्रार आ. बाबाजानी दुर्राणी यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती. याप्रकरणी गेल्या ३ वर्षांत चाऱ्या दुरुस्तीवर ६४ कोटी रुपयांहून अधिकचा खर्च होवूनही कॅनॉलची सुस्थिती नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदार, अधिकारी व इतर यंत्रणेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आ.दुर्राणी यांनी पाटील यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आ. दुर्राणी यांना लेखी स्वरुपात उत्तर दिले आहे. त्यामध्ये जायकवाडी प्रकल्पाचा पैठण डावा कालवा १२२ ते २०८ कि.मी. परभणी जिल्ह्यात येत असून, २०१९-२० मध्ये यांत्रिक विभागाकडून एकूण २० सयंत्रे मागवून कालवा व त्याच्या वितरिकेतील गाळ काढणे, झाडेझुडपे काढणे ही कामे करण्यात येवून मागणीप्रमाणे शेवटच्या भागातील शेतकऱ्यांसह सर्व लाभधारकांना पाणी पुरवठा करण्यात आला आहे. २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षांच्या कालावधीत पैठण डावा कालवा कि.मी. १२२ ते २०८ मधील नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी पाणीपट्टी वसुलीच्या निधीतून ३ कोटी ८७ लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे मंत्री पाटील यांच्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

प्रत्यक्ष पाहणीत दुरुस्तीला खो

जायकवाडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी कागदी मेळ बसवून चाऱ्या दुरुस्त केल्याची माहिती मंत्र्यांसमोर मांडली असली तरी प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील चाऱ्यांची दुरुस्तीच केली नसल्याची बाब ११ डिसेंबर रोजी सदरील प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत समोर आली होती. १२ डिसेंबर रोजीही दुपारी ४ च्या सुमारास पूर्णा तालुक्यातील ताडकळस परिसरातील चाऱ्यांची पाहणी केली असता तेथेही चाऱ्यांची दुरुस्ती केली नसल्याचे समोर आले आहे.