शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

चाऱ्या दुरुस्तीवर ४ कोटींचा खर्च, स्थिती मात्र जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:32 IST

जिल्ह्यात जायकवाडी प्रकल्पाच्या पैठण डावा कालव्याअंतर्गत चाऱ्यांची कामे निकृष्ट दर्जाची केली असून, कालव्यातील झाडेझुडपे काढण्यात न आल्याने शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत ...

जिल्ह्यात जायकवाडी प्रकल्पाच्या पैठण डावा कालव्याअंतर्गत चाऱ्यांची कामे निकृष्ट दर्जाची केली असून, कालव्यातील झाडेझुडपे काढण्यात न आल्याने शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत जानेवारी २०२० मध्ये विभागीय आयुक्तांकडे शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे, अशी तक्रार आ. बाबाजानी दुर्राणी यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती. याप्रकरणी गेल्या ३ वर्षांत चाऱ्या दुरुस्तीवर ६४ कोटी रुपयांहून अधिकचा खर्च होवूनही कॅनॉलची सुस्थिती नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदार, अधिकारी व इतर यंत्रणेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आ.दुर्राणी यांनी पाटील यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आ. दुर्राणी यांना लेखी स्वरुपात उत्तर दिले आहे. त्यामध्ये जायकवाडी प्रकल्पाचा पैठण डावा कालवा १२२ ते २०८ कि.मी. परभणी जिल्ह्यात येत असून, २०१९-२० मध्ये यांत्रिक विभागाकडून एकूण २० सयंत्रे मागवून कालवा व त्याच्या वितरिकेतील गाळ काढणे, झाडेझुडपे काढणे ही कामे करण्यात येवून मागणीप्रमाणे शेवटच्या भागातील शेतकऱ्यांसह सर्व लाभधारकांना पाणी पुरवठा करण्यात आला आहे. २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षांच्या कालावधीत पैठण डावा कालवा कि.मी. १२२ ते २०८ मधील नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी पाणीपट्टी वसुलीच्या निधीतून ३ कोटी ८७ लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे मंत्री पाटील यांच्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

प्रत्यक्ष पाहणीत दुरुस्तीला खो

जायकवाडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी कागदी मेळ बसवून चाऱ्या दुरुस्त केल्याची माहिती मंत्र्यांसमोर मांडली असली तरी प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील चाऱ्यांची दुरुस्तीच केली नसल्याची बाब ११ डिसेंबर रोजी सदरील प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत समोर आली होती. १२ डिसेंबर रोजीही दुपारी ४ च्या सुमारास पूर्णा तालुक्यातील ताडकळस परिसरातील चाऱ्यांची पाहणी केली असता तेथेही चाऱ्यांची दुरुस्ती केली नसल्याचे समोर आले आहे.