शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

सहा दिवसांत २९२ रुग्ण; उपचार घेणारे मात्र ११७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:16 IST

परभणी : मागील सहा दिवसांमध्ये जिल्ह्यात २९२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, सध्या ११७ रुग्णच उपचार घेत असल्याची नोंद ...

परभणी : मागील सहा दिवसांमध्ये जिल्ह्यात २९२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, सध्या ११७ रुग्णच उपचार घेत असल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. त्यामुळे उर्वरित रुग्ण गेले कुठे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मागील तीन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला असून, रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही अधिक असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण केले जात आहे. मात्र मागील सहा दिवसांतील रुग्णांची संख्या आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता, सहा दिवसांत २९२ नवीन रुग्ण नोंद होत असतील, तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही तेवढीच किंवा त्यापेक्षा अधिक असणे अपेक्षित आहे. आरोग्य विभागाने मात्र जिल्ह्यात केवळ ११७ रुग्ण उपचार घेत असल्याची नोंद घेतली आहे. त्यामुळे उर्वरित १७५ रुग्ण गेले कुठे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. मात्र नव्याने नोंद झालेल्या रुग्णांना १४ दिवसांनंतर कोरोनामुक्त जाहीर केले जाते. त्यामुळे सहा दिवसांत जर २९२ नवीन रुग्णांची नोंद होत असेल, तर चौदा दिवसांचा कालावधी संपलेला नसताना रुग्णांची संख्या घटली कशी? असा सवालही उपस्थित होत आहे. त्यामुळे एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मात्र उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी दाखविली जात असल्याचा संशय निर्माण होत आहे.

सहा दिवसांत ३६४ रुग्ण कोरोनामुक्त

मागील सहा दिवसांच्या काळात तब्बल ३६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. प्रशासनाच्या अहवालानुसार १ मार्च रोजी १५४ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत होते. त्यात दररोज नवीन रुग्णांची भर पडत गेली. मात्र दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक राहिली. ३ मार्च रोजी सर्वाधिक ८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचप्रमाणे १ मार्च रोजी ६८, २ रोजी ४३, ४ मार्च रोजी ६४, ५ रोजी ४५ आणि ६ मार्च रोजी ६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

१४ दिवसांनी होते रुग्णांची सुटी

एखाद्या रुग्णास कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याच्यावर १४ दिवस उपचार केले जातात. या काळात त्याची दोनवेळा पुन्हा कोरोना चाचणी केली जाते. मात्र प्रत्यक्षात १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच त्यास कोरोनामुक्त ठरविले जाते. मात्र जिल्ह्यात सहा दिवसांत २९८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे १ ते६ मार्च या कालावधीतील १४ दिवसांच्या टप्प्यात हे रुग्ण कोरोनामुक्त होणे आवश्यक आहे. मात्र प्रशासनाच्या यादीत ६ मार्च रोजीच्या यादीतच केवळ ११७ रुग्ण उपचार घेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.