शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

सहा दिवसांत २९२ रुग्ण; उपचार घेणारे मात्र ११७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:16 IST

परभणी : मागील सहा दिवसांमध्ये जिल्ह्यात २९२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, सध्या ११७ रुग्णच उपचार घेत असल्याची नोंद ...

परभणी : मागील सहा दिवसांमध्ये जिल्ह्यात २९२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, सध्या ११७ रुग्णच उपचार घेत असल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. त्यामुळे उर्वरित रुग्ण गेले कुठे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मागील तीन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला असून, रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही अधिक असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण केले जात आहे. मात्र मागील सहा दिवसांतील रुग्णांची संख्या आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता, सहा दिवसांत २९२ नवीन रुग्ण नोंद होत असतील, तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही तेवढीच किंवा त्यापेक्षा अधिक असणे अपेक्षित आहे. आरोग्य विभागाने मात्र जिल्ह्यात केवळ ११७ रुग्ण उपचार घेत असल्याची नोंद घेतली आहे. त्यामुळे उर्वरित १७५ रुग्ण गेले कुठे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. मात्र नव्याने नोंद झालेल्या रुग्णांना १४ दिवसांनंतर कोरोनामुक्त जाहीर केले जाते. त्यामुळे सहा दिवसांत जर २९२ नवीन रुग्णांची नोंद होत असेल, तर चौदा दिवसांचा कालावधी संपलेला नसताना रुग्णांची संख्या घटली कशी? असा सवालही उपस्थित होत आहे. त्यामुळे एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मात्र उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी दाखविली जात असल्याचा संशय निर्माण होत आहे.

सहा दिवसांत ३६४ रुग्ण कोरोनामुक्त

मागील सहा दिवसांच्या काळात तब्बल ३६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. प्रशासनाच्या अहवालानुसार १ मार्च रोजी १५४ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत होते. त्यात दररोज नवीन रुग्णांची भर पडत गेली. मात्र दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक राहिली. ३ मार्च रोजी सर्वाधिक ८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचप्रमाणे १ मार्च रोजी ६८, २ रोजी ४३, ४ मार्च रोजी ६४, ५ रोजी ४५ आणि ६ मार्च रोजी ६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

१४ दिवसांनी होते रुग्णांची सुटी

एखाद्या रुग्णास कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याच्यावर १४ दिवस उपचार केले जातात. या काळात त्याची दोनवेळा पुन्हा कोरोना चाचणी केली जाते. मात्र प्रत्यक्षात १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच त्यास कोरोनामुक्त ठरविले जाते. मात्र जिल्ह्यात सहा दिवसांत २९८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे १ ते६ मार्च या कालावधीतील १४ दिवसांच्या टप्प्यात हे रुग्ण कोरोनामुक्त होणे आवश्यक आहे. मात्र प्रशासनाच्या यादीत ६ मार्च रोजीच्या यादीतच केवळ ११७ रुग्ण उपचार घेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.