शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

सहा दिवसांत २९२ रुग्ण; उपचार घेणारे मात्र ११७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:16 IST

परभणी : मागील सहा दिवसांमध्ये जिल्ह्यात २९२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, सध्या ११७ रुग्णच उपचार घेत असल्याची नोंद ...

परभणी : मागील सहा दिवसांमध्ये जिल्ह्यात २९२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, सध्या ११७ रुग्णच उपचार घेत असल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. त्यामुळे उर्वरित रुग्ण गेले कुठे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मागील तीन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला असून, रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही अधिक असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण केले जात आहे. मात्र मागील सहा दिवसांतील रुग्णांची संख्या आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता, सहा दिवसांत २९२ नवीन रुग्ण नोंद होत असतील, तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही तेवढीच किंवा त्यापेक्षा अधिक असणे अपेक्षित आहे. आरोग्य विभागाने मात्र जिल्ह्यात केवळ ११७ रुग्ण उपचार घेत असल्याची नोंद घेतली आहे. त्यामुळे उर्वरित १७५ रुग्ण गेले कुठे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. मात्र नव्याने नोंद झालेल्या रुग्णांना १४ दिवसांनंतर कोरोनामुक्त जाहीर केले जाते. त्यामुळे सहा दिवसांत जर २९२ नवीन रुग्णांची नोंद होत असेल, तर चौदा दिवसांचा कालावधी संपलेला नसताना रुग्णांची संख्या घटली कशी? असा सवालही उपस्थित होत आहे. त्यामुळे एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मात्र उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी दाखविली जात असल्याचा संशय निर्माण होत आहे.

सहा दिवसांत ३६४ रुग्ण कोरोनामुक्त

मागील सहा दिवसांच्या काळात तब्बल ३६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. प्रशासनाच्या अहवालानुसार १ मार्च रोजी १५४ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत होते. त्यात दररोज नवीन रुग्णांची भर पडत गेली. मात्र दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक राहिली. ३ मार्च रोजी सर्वाधिक ८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचप्रमाणे १ मार्च रोजी ६८, २ रोजी ४३, ४ मार्च रोजी ६४, ५ रोजी ४५ आणि ६ मार्च रोजी ६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

१४ दिवसांनी होते रुग्णांची सुटी

एखाद्या रुग्णास कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याच्यावर १४ दिवस उपचार केले जातात. या काळात त्याची दोनवेळा पुन्हा कोरोना चाचणी केली जाते. मात्र प्रत्यक्षात १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच त्यास कोरोनामुक्त ठरविले जाते. मात्र जिल्ह्यात सहा दिवसांत २९८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे १ ते६ मार्च या कालावधीतील १४ दिवसांच्या टप्प्यात हे रुग्ण कोरोनामुक्त होणे आवश्यक आहे. मात्र प्रशासनाच्या यादीत ६ मार्च रोजीच्या यादीतच केवळ ११७ रुग्ण उपचार घेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.