शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

९० टक्के नुकसान होऊनही दिले हेक्टरी २८०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:34 IST

पाथरी: खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे ९० टक्के नुकसान होऊनही विमा कंपनीने केवळ हेक्टरी २८०० रुपये मदत दिली आहे. त्यामुळे ...

पाथरी: खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे ९० टक्के नुकसान होऊनही विमा कंपनीने केवळ हेक्टरी २८०० रुपये मदत दिली आहे. त्यामुळे विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरु असल्याची तक्रार पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

खरीप हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाघाळा येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन व कापसाचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन पिकाच्या काढणी पश्चात ९० टक्के नुकसान झाल्याने कंपनीच्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत ऑनलाईन तक्रार रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे केली. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीने तक्रारदार शेतकऱ्यांच्या शेतात येऊन पंचनामा केला. यावेळी ९० टक्के नुकसान झाल्याचे प्रतिनिधीने मान्यही केले. मात्र प्रत्यक्ष खात्यावर मदत देताना विमा कंपनीने सोयाबीन पिकाला प्रति हेक्टरी २८०० रुपयांप्रमाणे नाममात्र पैसे जमा केले आहेत. त्यामुळे या विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरु असल्याची तक्रार वाघाळा येथील शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनावर पद्माकर मोकाशे, इंद्रजीत घुंबरे, बालाप्रसाद मुंदडा, स्नेहल मोकाशे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.