शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

९० टक्के नुकसान होऊनही दिले हेक्टरी २८०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:34 IST

पाथरी: खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे ९० टक्के नुकसान होऊनही विमा कंपनीने केवळ हेक्टरी २८०० रुपये मदत दिली आहे. त्यामुळे ...

पाथरी: खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे ९० टक्के नुकसान होऊनही विमा कंपनीने केवळ हेक्टरी २८०० रुपये मदत दिली आहे. त्यामुळे विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरु असल्याची तक्रार पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

खरीप हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाघाळा येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन व कापसाचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन पिकाच्या काढणी पश्चात ९० टक्के नुकसान झाल्याने कंपनीच्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत ऑनलाईन तक्रार रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे केली. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीने तक्रारदार शेतकऱ्यांच्या शेतात येऊन पंचनामा केला. यावेळी ९० टक्के नुकसान झाल्याचे प्रतिनिधीने मान्यही केले. मात्र प्रत्यक्ष खात्यावर मदत देताना विमा कंपनीने सोयाबीन पिकाला प्रति हेक्टरी २८०० रुपयांप्रमाणे नाममात्र पैसे जमा केले आहेत. त्यामुळे या विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरु असल्याची तक्रार वाघाळा येथील शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनावर पद्माकर मोकाशे, इंद्रजीत घुंबरे, बालाप्रसाद मुंदडा, स्नेहल मोकाशे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.