शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

२७ हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST

परभणी : राज्यातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली असली तरी वरिष्ठ महाविद्यालये सुरू झाली ...

परभणी : राज्यातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली असली तरी वरिष्ठ महाविद्यालये सुरू झाली नसल्याने या महाविद्यालयांमधील जिल्ह्यातील २७ हजार विद्यार्थ्यांना शासन निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे.

कोरोनानंतर राज्यात हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. या प्रक्रियेअंतर्गत शासनाने प्रारंभी दहावी व बारावी त्यानंतर नववी व अकरावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानंतर २७ जानेवारीपासून जिल्ह्यासह राज्यभरात पाचवी ते आठवीच्या वर्गांना प्रारंभ झाला आहे. १ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहांनाही पूर्ण क्षमतेने परवानगी देण्यात आली असली तरी महाविद्यालये मात्र अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी अस्वस्थ झाले आहेत. जिल्ह्यात अनुदानीत २२, तर विनाअनुदानीत ४२ असे एकूण ६४ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्येे २७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अगोदरच शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाले. अशात ऑनलाइन शिक्षणास अनेक विद्यार्थी गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. अशातच विद्यापीठाने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्याने विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे.

शैक्षणिक नुकसानीत भर

विद्यार्थ्यांचा प्रथम सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. अशात द्वितीय सत्राचाही अभ्यासक्रम ऑनलाइनच्या माध्यमातून अनेक महाविद्यालयांनी सुरू केला आहे. ऑनलाइन शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे त्यांना हे ऑनलाइन शिक्षण नुकसानकारक वाटत आहे. अशातच परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्याने अभ्यास कसा करावा? आणि परीक्षेचा पेपर कसा द्यावा, यासंदर्भात विद्यार्थी सापडले आहेत.

महाविद्यालये सुरू झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ऑनलाइन वर्गासाठी विद्यार्थी थांबत नाहीत. अशातच परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाने अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला का, याची शहानिशा केली पाहिजे.

- बाळासाहेब जाधव, प्राचार्य

शासनाने वरिष्ठ महाविद्यालये तातडीने सुरू करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक व इतर उपक्रम राहिले आहेत. ते आत्मसात करण्यासाठी त्यांना वेळ मिळेल. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी.

- प्रा. संतोष रणखांब,सचिव, स्वामुक्टा संघटना

कोरोनामुळे ११ महिन्यांपासून महाविद्यालये बंद आहेत. अनलॉक प्रक्रियेनंतर पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. पदवी व पदव्युत्तरचे विद्यार्थी सुज्ञ असतानाही महाविद्यालये सुरू केले जात नाहीत. त्यामुळे नुकसान होत आहे.

- गोविंद मानखेडे, विद्यार्थी, सेलू

ऑनलाइन वर्गाच्या वेळी ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे त्रस्त झालो आहोत. शासन महाविद्यालये सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेत नाही. ही भूमिका चुकीची आहे.

- योगेश गायके,विद्यार्थी, सेलू