शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

भगर खाल्ल्याने २१ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:13 IST

पाथरी : उपवासासाठी आणलेली भगर व शाबुदाणा यांचे मिश्रण असलेल्या पिठाची भाकरी खाल्ल्याने शहरातील नामदेवनगर येथील एकाच कुटुंबातील १७ ...

पाथरी : उपवासासाठी आणलेली भगर व शाबुदाणा यांचे मिश्रण असलेल्या पिठाची भाकरी खाल्ल्याने शहरातील नामदेवनगर येथील एकाच कुटुंबातील १७ जणांना आणि कानसूर येथे चारजणांना विषबाधा झाल्याची घटना २० जुलै रोजी घडली आहे. दरम्यान, सर्व रुग्णांवर पाथरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत .

पाथरी शहरातील नामदेवनगर येथील एकाच कुटुंबातील सदस्यांनी बाजारातून शाबुदाणा व भगर यांचे तयार पीठ आणून त्यापासून भाकरी केल्या होत्या. एकादशीनिमित्त या भाकरी खाल्ल्यानंतर या कुटुंबातील काही सदस्य मजुरी कामानिमित्त मानवत तालुक्यातील सावळी, सावरगाव येथे एका शेतात गेले. मात्र, काम सुरू करण्यापूर्वीच त्यांना चक्कर आली. तसेच उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. यावेळीच घरी थांबलेल्या व्यक्तींनाही असाच त्रास सुरू झाला. त्यामुळे या कुटुंबातील १७ जण एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले. तेथून पुढे त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुमंत वाघ यांनी दिली.

दरम्यान, पाथरी तालुक्यातील कानसूर येथेही एकाच कुटुंबातील दोन पुरुष व दोन महिला अशा चौघांना उपवासाची भगर खाल्ल्यानंतर संध्याकाळी उशिरा चक्कर येणे, उलटी होणे असा त्रास सुरू झाला. त्यांच्यावरही पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विषबाधा झालेले रुग्ण

मीरा शिवा कसबे, विजयमाला भारत कसबे, कौसाबाई सुदाम कांबळे, संजीवनी केरबा गवारे, मुक्ता सुरेश कांबळे, शीतल सचिन कांबळे, चंद्रकला संतोष कांबळे, समाधान केरबा गवारे, रेखा बाबासाहेब गोरे, संगीता पांडुरंग आडावे, पूजा हनुमान खंडागळे, तानाबाई वामन कांबळे, सुनीता हनुमान खंडागळे, दीपाली संतोष कांबळे (सर्व रा. नामदेवनगर, पाथरी), पदमीनबाई उत्तमराव कदम, बालासाहेब भगवान शिंदे, अरुणा बालासाहेब शिंदे व श्रीकांत बालासाहेब शिंदे (रा. कानसूर, ता. पाथरी).