शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

महसूलच्या दुर्लक्षामुळे २० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:14 IST

गौण खनिज वसुलीतून दरवर्षी जिल्ह्याला मोठा महसूल प्राप्त होतो. त्यासाठी दरवर्षी जिल्हा प्रशासनाला उद्दिष्टही निश्चित करून दिले जाते. २०२०-२१ ...

गौण खनिज वसुलीतून दरवर्षी जिल्ह्याला मोठा महसूल प्राप्त होतो. त्यासाठी दरवर्षी जिल्हा प्रशासनाला उद्दिष्टही निश्चित करून दिले जाते. २०२०-२१ या वर्षासाठी जिल्ह्याला ७३ कोटी ५० लाख रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. गौण खनिज उपश्यातून मिळणारी रॉयल्टी, गौण खनिज उपश्याचे लिलावाद्वारे सोडलेले धक्के आणि अवैध गौण खनिज उपसा करणाऱ्यांविरुद्ध केलेल्या दंडात्मक कारवाईतून ही रक्कम वसूल केली जाते.

जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावांमधून मोठ्या प्रमाणात महसूल प्रशासनाला प्राप्त होतो. मात्र यावर्षी वाळू घाटांचे लिलाव रखडले. जिल्ह्यातील २२ वाळू घाटांचे लिलाव करण्याचे परवानगी राज्यस्तरावरून मिळाली होती. मात्र त्यातील केवळ १४ वाळू घाटच लिलावात गेले. जिल्हा प्रशासनाला काही वाळू घाटांची अपसेट प्राईजही कमी करावी लागली होती. त्यामुळे वाळू घाटांच्या लिलावातून मिळणाऱ्या मोठ्या महसुलावर पाणी सोडावे लागले. २०२०-२१ या वर्षासाठी जिल्हा प्रशासनाला ७३ कोटी ५० लाख रुपयांची गौण खनिज वसुली करण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र मार्च महिन्याअखेर केवळ ५३ कोटी ४७ लाख ४१ हजार ९६९ रुपयांचीच गौण खनिज वसुली झाली आहे. त्यामुळे यावर्षी प्रशासनाला ७२.७५ टक्के वसुलीवरच समाधान मानावे लागले. वर्षभरात २० कोटी २ लाख रुपयांची वसुली कमी झाल्याने महसूलचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दुसरीकडे वाळू घाटांचे लिलाव झाले नसताना या वाळू घाटांमधून होणारा वाळू उपसा रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. दररोज लाखो रुपयांच्या वाळूचा उपसा होत असताना महसूल प्रशासनाकडून मोठ्या प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या नाहीत. त्याच वेळी पोलिसांनी मात्र वेळोवेळी कारवाया करून अवैध वाळू उपसा रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अवैध वाळू उपश्यातून कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले. कोरोनाच्या संसर्गामुळे वसुली कमी होऊ शकते. मात्र अवैध गौण खनिज उपसाही थांबविण्याचे काम प्रशासनाकडून होणे अपेक्षित होते. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने जिल्ह्याला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

नदी काठांवरील तालुक्यातच सर्वात कमी वसुली

गोदावरी, पूर्णा आणि दुधना या नद्यांचे मोठे कार्यक्षेत्र असणाऱ्या तालुक्यांतच यावर्षी कमी वसुली झाली आहे. याउलट नद्यांचे कमी कार्यक्षेत्र असणाऱ्या तालुक्यांत मात्र वसुलीचे प्रमाण अधिक आहे. गंगाखेड तालुक्यात गोदावरी नदीचे मोठे क्षेत्र आहे. या तालुक्याला मागील वर्षी ८ कोटी ५०लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. मात्र तालुक्यात केवळ १ कोटी ६० लाख २३ हजार २९१ रुपयांची (१८.८५ टक्के) वसुली झाली. पालम तालुक्याला ८ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते. या तालुक्यात १ कोटी ५६ लाख २ हजार ७९७ (१९.५० टक्के) आणि सोनपेठ तालुक्यात १ कोटी १२ लाख ४२ हजार ८८८(१३.२३ टक्के) वसुली झाली. याउलट नद्यांचे क्षेत्र कमी असलेल्या परभणी तालुक्याने ५ कोटी ५ लाख ४६ हजार ९६९(५३.२१ टक्के) वसुली केली आहे.

तालुकानिहाय झालेली वसुली

परभणी : ५३.२१

गंगाखेड : १८.८५

पूर्णा : २७.२०

पालम : १९.५०

पाथरी : २९.९१

सोनपेठ : १३.२३

मानवत : ४०.२४

जिंतूर : २५.५६