शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

२ अभियंते, ग्रामसेवकास कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST

बोरी येथे जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निधीतून अंगणवाडी क्रमांक ५ च्या बांधकामासाठी ८ लाख ४९ हजार ८६० ...

बोरी येथे जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निधीतून अंगणवाडी क्रमांक ५ च्या बांधकामासाठी ८ लाख ४९ हजार ८६० रुपयांच्या अंदाजपत्रकास १७ फेब्रुवारी, २०२० रोजी जि.प.ने मंजुरी दिली होती. त्यानुसार, ७ लाख ४७ हजार १८६ रुपयांचे या कामाचे कार्यारंभ आदेश बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी बोरी ग्रामपंचायतीला दिले होते. कनिष्ठ अभियंता बी.आर. पाटील, यांनी सदरील काम प्रत्यक्ष जागेवर नसताना न झालेल्या कामाची मोजमापे नोंदविली. या कामाची शिफारस प्रभारी उपअभियंता तथा शाखा अभियंता एस.एस. मोगरकर यांनी शिफारस करून विभागीय कार्यालयाकडे ५ लाख ९३ हजार १५५ रुपयांची देयके सादर केली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर, आ.मेघना बोर्डीकर यांनी २८ एप्रिल रोजी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती, तसेच यासाठी जि.प. उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी दबाव टाकून हे काम करून घेतल्याचे तक्रारीत म्हटले होते, तसेच त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार, टाकसाळे यांनी या प्रकरणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली चाैकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने आपला अहवाल तातडीने सीईओ टाकसाळे यांना सादर केला. त्यात कनिष्ठ अभियंता पाटील, उपअभियंता मोगरकर आणि ग्रामसेवक प्रल्हाद सोळंके हे पूर्णत: दोषी असल्याचे सिद्ध होत असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्या आधारे सीईओ टाकसाळे यांनी कनिष्ठ अभियंता पाटील, उपअभियंता मोगरकर आणि ग्रामसेवक प्रल्हाद सोळंके या तिघांनाही ३० एप्रिल रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, २४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाटील, सोळंके यांचे निलंबन?

या प्रकरणात कनिष्ठ अभियंता पाटील आणि ग्रामसेवक सोळंके हे पूर्णत: दोषी असल्याचे स्पष्ट झाल्याने, त्यांचे निलंबन अटळ असल्याचे समजते. सोमवारी उशिरा किंवा मंगळवारी याबाबतचे आदेश निघण्याची शक्यता आहे, तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी होण्याचीही शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पैसे ग्रा.पं.च्या खात्यावरच- चौधरी

अंगणवाडीसाठी आलेला निधी अद्यापही ग्रामपंचायतीच्या खात्यावरच आहे. हा निधी उचलून उचलून अपहार झालेला नाही. या प्रकरणी दोषी असेल, त्याच्यावर प्रशासन कारवाई करील, परंतु अधिकाऱ्यांवर सातत्याने दबाव टाकून त्यांना का त्रास दिला जातोय?