शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

१९ हजार कृषीपंपधारकांनी भरले बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:16 IST

परभणी : कृषीपंपधारकांकडे असलेल्या थकबाकी वसुलीसाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत जिल्ह्यातील १९ हजार १५७ शेतकऱ्यांनी ७ ...

परभणी : कृषीपंपधारकांकडे असलेल्या थकबाकी वसुलीसाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत जिल्ह्यातील १९ हजार १५७ शेतकऱ्यांनी ७ कोटी ७४ लाख ९५ हजार रुपयांचा वीजबिल भरणा केला आहे. त्यामुळे या अभियानाला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

परभणी जिल्ह्यात १० उपविभागांतर्गत जिल्ह्यातील ९६ हजार ८०८ कृषीपंपधारकांना वीज पुरवठा केला जातो. या कृषीपंपधारकांना दर तीन महिन्यांनी वीजबिल जनरेट करून वितरित केले जाते. मात्र सततचा दुष्काळ व नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. त्यामुळे विद्युत बिलाचा भरणा वेळेवर करणे बळीराजा शक्य होत नाही. परिणामी जिल्ह्यातील विद्युत बिलाच्या थकबाकीचा डोंगर १३८६ कोटी ८९ हजार रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. वाढत असलेल्या थकबाकीमुळे येथील वीज वितरण कंपनीला शेतकऱ्यांना आलेल्या वीज समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून वसुलीचा तगादा लावला जात आहे. त्यातच आता राज्य शासनाने महाकृषी ऊर्जा अभियान अमलात आणले आहे. या अभियानांतर्गत वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना घसघसीत सूट देण्यात येत आहे. त्याचबरोबर थकबाकीमुक्त शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात येत आहे. या अनुषंगाने येथील वीज वितरण कंपनीच्यावतीने मागील महिन्याभरापासून विशेष वीजबिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील ९६ हजार ८०८ कृषीपंप धारकांपैकी १९ हजार १५७ शेतकऱ्यांनी ७ कोटी ७४ लाख ९५ हजार रुपयांच्या बिलांचा भरणा केला आहे. त्यामुळे महावितरणच्या या महाकृषी ऊर्जा अभियानाला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

तालुकानिहाय भरणा केलेल्या शेतकऱ्यांची संख्या

महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत गंगाखेड तालुक्यातील १ हजार ५५१ शेतकऱ्यांनी ७५ लाख ३७ हजार रुपयांचा भरणा केला आहे. त्याचबरोबर जिंतूर तालुक्यातील ३ हजार ३६२ शेतकऱ्यांनी ९५ लाख ४१ हजार, मानवत तालुक्यातील १ हजार ७३३ शेतकऱ्यांनी ५५ लाख ५ हजार पालम तालुक्यातील १ हजार ४८३ शेतकऱ्यांनी १ कोटी ११ लाख २६ हजार रुपयांचा वीजबिल भरणा केला आहे. तसेच परभणी तालुक्यातील ३ हजार ५६५ शेतकऱ्यांनी १ कोटी ४० लाख ६४ हजार रुपये, पाथरी २ हजार २७९ शेतकऱ्यांनी ८५ लाख ५५ हजार, पूर्णा तालुक्यातील १ हजार ९०९ शेतकऱ्यांनी ८४ लाख २९ हजार, सेलू तालुक्यातील २ हजार २४६ शेतकऱ्यांनी ७७ लाख २ हजार, तर सोनपेठ तालुक्यातील १ हजार २९ शेतकऱ्यांनी ५० लाख ३६ हजार रुपयांचा वीज बिलाचा भरणा केला आहे.