शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

१९ हजार कृषीपंपधारकांनी भरले बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:16 IST

परभणी : कृषीपंपधारकांकडे असलेल्या थकबाकी वसुलीसाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत जिल्ह्यातील १९ हजार १५७ शेतकऱ्यांनी ७ ...

परभणी : कृषीपंपधारकांकडे असलेल्या थकबाकी वसुलीसाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत जिल्ह्यातील १९ हजार १५७ शेतकऱ्यांनी ७ कोटी ७४ लाख ९५ हजार रुपयांचा वीजबिल भरणा केला आहे. त्यामुळे या अभियानाला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

परभणी जिल्ह्यात १० उपविभागांतर्गत जिल्ह्यातील ९६ हजार ८०८ कृषीपंपधारकांना वीज पुरवठा केला जातो. या कृषीपंपधारकांना दर तीन महिन्यांनी वीजबिल जनरेट करून वितरित केले जाते. मात्र सततचा दुष्काळ व नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. त्यामुळे विद्युत बिलाचा भरणा वेळेवर करणे बळीराजा शक्य होत नाही. परिणामी जिल्ह्यातील विद्युत बिलाच्या थकबाकीचा डोंगर १३८६ कोटी ८९ हजार रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. वाढत असलेल्या थकबाकीमुळे येथील वीज वितरण कंपनीला शेतकऱ्यांना आलेल्या वीज समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून वसुलीचा तगादा लावला जात आहे. त्यातच आता राज्य शासनाने महाकृषी ऊर्जा अभियान अमलात आणले आहे. या अभियानांतर्गत वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना घसघसीत सूट देण्यात येत आहे. त्याचबरोबर थकबाकीमुक्त शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात येत आहे. या अनुषंगाने येथील वीज वितरण कंपनीच्यावतीने मागील महिन्याभरापासून विशेष वीजबिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील ९६ हजार ८०८ कृषीपंप धारकांपैकी १९ हजार १५७ शेतकऱ्यांनी ७ कोटी ७४ लाख ९५ हजार रुपयांच्या बिलांचा भरणा केला आहे. त्यामुळे महावितरणच्या या महाकृषी ऊर्जा अभियानाला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

तालुकानिहाय भरणा केलेल्या शेतकऱ्यांची संख्या

महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत गंगाखेड तालुक्यातील १ हजार ५५१ शेतकऱ्यांनी ७५ लाख ३७ हजार रुपयांचा भरणा केला आहे. त्याचबरोबर जिंतूर तालुक्यातील ३ हजार ३६२ शेतकऱ्यांनी ९५ लाख ४१ हजार, मानवत तालुक्यातील १ हजार ७३३ शेतकऱ्यांनी ५५ लाख ५ हजार पालम तालुक्यातील १ हजार ४८३ शेतकऱ्यांनी १ कोटी ११ लाख २६ हजार रुपयांचा वीजबिल भरणा केला आहे. तसेच परभणी तालुक्यातील ३ हजार ५६५ शेतकऱ्यांनी १ कोटी ४० लाख ६४ हजार रुपये, पाथरी २ हजार २७९ शेतकऱ्यांनी ८५ लाख ५५ हजार, पूर्णा तालुक्यातील १ हजार ९०९ शेतकऱ्यांनी ८४ लाख २९ हजार, सेलू तालुक्यातील २ हजार २४६ शेतकऱ्यांनी ७७ लाख २ हजार, तर सोनपेठ तालुक्यातील १ हजार २९ शेतकऱ्यांनी ५० लाख ३६ हजार रुपयांचा वीज बिलाचा भरणा केला आहे.