शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

अतिवृष्टीबाधितांना १९ कोटींच्या निधीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:13 IST

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील कापूस, सोयाबीन आणि तूर आदी पिकांचे नुकसान झाले होते. त्यापूर्वी ही मूग ...

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील कापूस, सोयाबीन आणि तूर आदी पिकांचे नुकसान झाले होते. त्यापूर्वी ही मूग तोडणीला आला असताना सलग दहा दिवस संततधार पावसामुळे मुगाचे मातेरे झाले होते. अतिवृष्टीमुळे नदी, नाला आणि ओढ्यालगत असलेल्या शेतात पाणी साचले होते. तर कापसाचे बोंडे सडून झाडा झाला होता. सोयाबीन काढणी वेळी धो धो पाऊस पडला. परिणामी सोयबीनला जागीच कोंब फुटून उर्वरित सोयाबीनची प्रतवारी घसरली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. त्यानंतर महसूल, कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे केले. त्यात तालुक्यातील ९५ गावापैकी ७३ गावातील ३७ हजार ४४१ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल दिला. शासनाने दोनची मर्यादा घालून हेक्टरी दहा हजाराची मदत जाहीर केली. नुकसानीनुसार ७३ गावातील बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी सुमारे ३७ कोटी रुपये वितरित करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. मात्र पहिल्या टप्प्यात शासनाने १८ कोटी ७२ लाख ६ हजार रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु,५२ गावातील २५ हजार ६०१ शेतकऱ्यांना उपलब्ध निधी पुरला आहे. त्यामुळे उर्वरित २१ गावातील २९ हजार १५३ शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत देण्यासाठी आणखी १९ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. संबंधित गावाच्या तलाठ्याकडून आलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्याचे पडताळणी करून महसूल विभागाकडून ५२ गावातील शेतकऱ्यांना मदत वितरणासाठी संबंधित बॅंकेकडे याद्या पाठवल्या.मात्र २१ गावातील शेतकऱ्यांना पुन्हा मदत मिळण्यासाठी निधी वाट पाहवी लागणार आहे.

या गावातील शेतकऱ्यांचा समावेश

पहिल्या टप्प्यात आलेला निधी ५२ गावातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात संपला आहे. त्यामुळे उर्वरित राहिलेल्या देऊळगाव, गुगळी धामणगाव, राधे धामणगाव, डासाळा, मालेटाकळी, शिंदेटाकळी, पिंप्री बु, खु, खादगाव, खुपसा, चिकलठाणा बु, खु, कुपटा, शेलवाडी, सिमणगाव, गव्हा, भांगापूर, राव्हा, पिंपळगाव गोसावी, वाकी आणि सिध्दनाथ बोरगाव या २१ गावातील २९ हजार १५३ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान वाटपासाठी आणखी १८ कोटी ७२ लाख ६०० रूपये निधी लागणार आहे. हा निधी राज्यशासनाकडून प्राप्त झाल्यानंर बळीराज्याच्या बॅक खात्यावर वर्ग केला जाणार आहे.