शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

अतिवृष्टीबाधितांना १९ कोटींच्या निधीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:13 IST

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील कापूस, सोयाबीन आणि तूर आदी पिकांचे नुकसान झाले होते. त्यापूर्वी ही मूग ...

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील कापूस, सोयाबीन आणि तूर आदी पिकांचे नुकसान झाले होते. त्यापूर्वी ही मूग तोडणीला आला असताना सलग दहा दिवस संततधार पावसामुळे मुगाचे मातेरे झाले होते. अतिवृष्टीमुळे नदी, नाला आणि ओढ्यालगत असलेल्या शेतात पाणी साचले होते. तर कापसाचे बोंडे सडून झाडा झाला होता. सोयाबीन काढणी वेळी धो धो पाऊस पडला. परिणामी सोयबीनला जागीच कोंब फुटून उर्वरित सोयाबीनची प्रतवारी घसरली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. त्यानंतर महसूल, कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे केले. त्यात तालुक्यातील ९५ गावापैकी ७३ गावातील ३७ हजार ४४१ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल दिला. शासनाने दोनची मर्यादा घालून हेक्टरी दहा हजाराची मदत जाहीर केली. नुकसानीनुसार ७३ गावातील बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी सुमारे ३७ कोटी रुपये वितरित करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. मात्र पहिल्या टप्प्यात शासनाने १८ कोटी ७२ लाख ६ हजार रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु,५२ गावातील २५ हजार ६०१ शेतकऱ्यांना उपलब्ध निधी पुरला आहे. त्यामुळे उर्वरित २१ गावातील २९ हजार १५३ शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत देण्यासाठी आणखी १९ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. संबंधित गावाच्या तलाठ्याकडून आलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्याचे पडताळणी करून महसूल विभागाकडून ५२ गावातील शेतकऱ्यांना मदत वितरणासाठी संबंधित बॅंकेकडे याद्या पाठवल्या.मात्र २१ गावातील शेतकऱ्यांना पुन्हा मदत मिळण्यासाठी निधी वाट पाहवी लागणार आहे.

या गावातील शेतकऱ्यांचा समावेश

पहिल्या टप्प्यात आलेला निधी ५२ गावातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात संपला आहे. त्यामुळे उर्वरित राहिलेल्या देऊळगाव, गुगळी धामणगाव, राधे धामणगाव, डासाळा, मालेटाकळी, शिंदेटाकळी, पिंप्री बु, खु, खादगाव, खुपसा, चिकलठाणा बु, खु, कुपटा, शेलवाडी, सिमणगाव, गव्हा, भांगापूर, राव्हा, पिंपळगाव गोसावी, वाकी आणि सिध्दनाथ बोरगाव या २१ गावातील २९ हजार १५३ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान वाटपासाठी आणखी १८ कोटी ७२ लाख ६०० रूपये निधी लागणार आहे. हा निधी राज्यशासनाकडून प्राप्त झाल्यानंर बळीराज्याच्या बॅक खात्यावर वर्ग केला जाणार आहे.