शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कनिष्ठ अभियंत्यांची राज्यात १,५१४ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:14 IST

राज्यातील ३४ जिल्हा परिषदेतील बांधकाम,जलसंधारण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ अभियंत्यांची एकूण ४ हजार १३६ पदे मंजूर असून त्यातील ...

राज्यातील ३४ जिल्हा परिषदेतील बांधकाम,जलसंधारण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ अभियंत्यांची एकूण ४ हजार १३६ पदे मंजूर असून त्यातील १ हजार ५१४ रिक्त आहेत. रिक्त पदांचे सरासरी प्रमाण जवळपास ३६.६१ टक्के इतके आहे. त्यातही सिंधुदुर्ग जि.प. त ५३.०३ टक्के , वाशिम जि.प.त ४६.६७ टक्के, अकोला जि.प. त ४०.२० टक्के तर जि. प. त वर्धा ३४.२० टक्के कनिष्ठ अभियंता संवर्गाच्या रिक्त पदांचे प्रमाण चिंताजनक आहे. १९९० नंतर किरकोळ अपवाद वगळता कोणत्याही जिल्हा परिषदेत अभियंत्यांची मोठ्या प्रमाणावर भरती झालेली नाही. व सदरचे अभियंते आता सेवानिवृत्तीकडे वाटचाल करिता असल्याने, येत्या अडीच वर्षात म्हणजेच डिसेंबर २०२३ पर्यंत केवळ सेवानिवृत्तीमुळे संवर्गाची ५४ टक्के पदे रिक्त होणार आहेत. या व्यतिरिक्त नियमित पदोन्नती व इतर कारणांमुळे रिक्त होणाऱ्या ७ टक्के जागांसह येत्या अडीच वर्षात कनिष्ठ अभियंता संवर्गाच्या जवळपास ६१ टक्के जागा रिक्त राहणार आहेत. सद्यस्थितीत सर्वच अभियंत्यांकडे शासन निकषांपेक्षा चार ते पाच पट जादा कार्यभार असून विखुरलेल्या स्वरुपाची हजारोंच्या संख्येने असलेली कामे करण्यासाठी पुरेसा अभियंता वर्ग उपलब्ध नाही. त्यामुळे कार्यरत अभियंत्यावर कामाचा ताण येत आहे. याशिवाय स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गाच्या मंजूर ४ हजार १३६ पदांपैकी २ हजार ५८२ पदे रिक्त आहेत. शिवाय ग्रामपंचायतीकडील वाढलेल्या कामांची संख्या लक्षात घेता प्रत्येक जिल्हा परिषदेस किमान एक विद्युत उपविभाग निर्माण करणे आवश्यक आहे. परभणी, वाशिम, सिंधुदुर्ग,नंदुरबार,धुळे, नाशिक, नांदेड,जालना, भंडारा, बीड, गोंदिया, जळगाव, बुलडाणा, पालघर, उस्मानाबाद या १५ जिल्हा परिषदांमध्ये आज मितीस एकही कनिष्ठ अभियंता (विद्युत) उपलब्ध नाही. त्यामुळे या सर्व रिक्त पदांच्या जागा तातडीने भरण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे महासचिव सुहास धारासूरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.