शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

पालमसाठी १५ कोटींची पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST

पालम : शहराला गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ...

पालम : शहराला गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून, आगामी २० वर्ष पुरेल एवढ्या क्षमतेची ही योजना आहे, अशी माहिती भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे यांनी २७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पालम शहराच्या विकासासाठी भाजप सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, येथील नगर पंचायतीच्या माध्यमातून शहराच्या विकासाची विविध कामे मार्गी लागली आहेत. पालम शहरासाठी १५ कोटी रुपयांच्या नळ योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. गेल्या वीस वर्षांपासून पालमच्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. ही भटकंती आता संपणार आहे. शहरातील नागरिकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी संपूर्ण शहरात सिमेंट रस्त्यांची कामे झाली असून, गल्लोगल्लीतील रस्त्यांचा प्रश्‍न आता पूर्णपणे मिटला आहे. विशेष करुन पालमवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी गणेशराव रोकडे यांनी सातत्याने पाठपुरावा करुन तत्कालिन मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून ही योजना मंजूर करुन घेतली. आता या योजनेच्या कामाला सुरुवात होत असून, आगामी २० वर्षे या पाणीपुरवठा योजनेद्वारे पालमकरांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे. तीन नवीन पाण्याच्या टाक्यांद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे.

पालम शहराचा विकास हाच आपला ध्यास असून, शहराच्या विकासासाठी आपण नेहमीच आग्रही राहिलो असून, आपण केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालमकरांना ही पाणीपुरवठा योजना मिळाली असल्याचेही रोकडे यांनी सांगितले. या सर्व कामामध्ये नगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे, अनिताताई हतिअंबीरे, नगरसेवक यांचाही मोलाचा वाटा आहे. या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे, लक्ष्मण रोकडे, नगसेवक असदखाँ पठाण, आजीम पठाण, विजय घोरपडे, ऊबेदखाँ पठाण आदी उपस्थित होते.