शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

१३ कोटी ९६ लाखांची पाणीपट्टी थकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:16 IST

पूर्णा पाटबंधारे विभागांतर्गत येलदरी धरणातील वेगवेगळ्या शहरांना, गावांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा करीत असताना नगरपालिका, महानगरपालिका व ...

पूर्णा पाटबंधारे विभागांतर्गत येलदरी धरणातील वेगवेगळ्या शहरांना, गावांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा करीत असताना नगरपालिका, महानगरपालिका व ग्रामपंचायतीने वेळेवर पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे; मात्र हे विभाग पाणीपट्टी वेळेवर भरत नाहीत. परिणामी, विभागाला मिळणारी रक्कम वेळेत मिळत नसल्याने कठोर कारवाई करण्यास या विभागांना भाग पाडत आहेत. परभणी शहरातील जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत २२ लाख ८१ हजार रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव काजळे २३ गाव पाणी पुरवठा योजनेचे १५ लाख ७६ हजार रुपये पाणीपट्टी थकीत असून, या योजनेचा लाभ २३ गावांपैकी केवळ ३ ते ४ गावांना झाला आहे. ही योजना म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे. शिवाय २३ गाव सिद्धेश्वर पाणी पुरवठा योजनेची ३३ लाख ६९ हजार रुपये पाणीपट्टी थकीत असून, पूरजवळ २० गाव पाणी पुरवठा योजनेचे २४ लाख ५ हजार रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. जिंतूर तालुक्यातील वस्सा बारा गाव पाणी पुरवठा योजनेची १२ लाख ११ हजार रुपये थकले आहेत. या ग्रामीण भागातील योजनांसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याची एकूण पाणीपट्टी १ कोटी ८ लाख ४२ हजार रुपयांच्या घरात थकली आहे. दुसरीकडे पूर्णा पाटबंधारे विभागाची सर्वाधिक पाणीपट्टी थकीत परभणी मनपाकडे असून, १२ कोटी २ लाख १ हजार रुपये थकले आहेत. त्या खालोखाल हिंगेाली नगर परिषदेकडे ५८ लाख १२ हजार तर जिंतूर नगरपालिकेकडे २०लाख २६ हजार रुपयांची बाकी आहे. वसमत नगरपालिकेकडे ७ लाख ७४ हजार थकबाकी असून, पाटबंधारे विभागाचे एकूण १३ कोटी ९६ लाख ५५ हजार रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे.

१५ मार्चपासून खंडित होणार पाणी पुरवठा

या संदर्भात पूर्णा पाटबंधारे विभागाने सर्व थकबाकीदार विभागांना १५ मार्चपर्यंत थकीत पाणीपट्टी भरण्यास मुदत दिली आहे. या काळात रक्कम न भरल्यास पाणी पुरवठा खंडित करण्याची तंबी देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये परभणी, हिंगोली, वसमत व जिंतूर शहरांसह या तालुक्यातील गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

पाटबंधारे विभाग अडचणीत

मागील अनेक दिवसांपासून पाटबंधारे विभागाची सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी वसुली मोठ्या प्रमाणात थकली आहे. प्रकल्पाच्या सिंचन व्यवस्थापनाचा खर्च याच रकमेतून भागविला जातो. शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने या विभागाचे कामकाज कोलमडले असून, पाणीपट्टी वसुली झाली तरच सिंचन प्रकल्पाचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने चालते; परंतु वसुलीच्या थकबाकीमुळे हा विभाग अडचणीत सापडला आहे.