शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

१३ कोटी ९६ लाखांची पाणीपट्टी थकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:16 IST

पूर्णा पाटबंधारे विभागांतर्गत येलदरी धरणातील वेगवेगळ्या शहरांना, गावांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा करीत असताना नगरपालिका, महानगरपालिका व ...

पूर्णा पाटबंधारे विभागांतर्गत येलदरी धरणातील वेगवेगळ्या शहरांना, गावांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा करीत असताना नगरपालिका, महानगरपालिका व ग्रामपंचायतीने वेळेवर पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे; मात्र हे विभाग पाणीपट्टी वेळेवर भरत नाहीत. परिणामी, विभागाला मिळणारी रक्कम वेळेत मिळत नसल्याने कठोर कारवाई करण्यास या विभागांना भाग पाडत आहेत. परभणी शहरातील जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत २२ लाख ८१ हजार रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव काजळे २३ गाव पाणी पुरवठा योजनेचे १५ लाख ७६ हजार रुपये पाणीपट्टी थकीत असून, या योजनेचा लाभ २३ गावांपैकी केवळ ३ ते ४ गावांना झाला आहे. ही योजना म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे. शिवाय २३ गाव सिद्धेश्वर पाणी पुरवठा योजनेची ३३ लाख ६९ हजार रुपये पाणीपट्टी थकीत असून, पूरजवळ २० गाव पाणी पुरवठा योजनेचे २४ लाख ५ हजार रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. जिंतूर तालुक्यातील वस्सा बारा गाव पाणी पुरवठा योजनेची १२ लाख ११ हजार रुपये थकले आहेत. या ग्रामीण भागातील योजनांसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याची एकूण पाणीपट्टी १ कोटी ८ लाख ४२ हजार रुपयांच्या घरात थकली आहे. दुसरीकडे पूर्णा पाटबंधारे विभागाची सर्वाधिक पाणीपट्टी थकीत परभणी मनपाकडे असून, १२ कोटी २ लाख १ हजार रुपये थकले आहेत. त्या खालोखाल हिंगेाली नगर परिषदेकडे ५८ लाख १२ हजार तर जिंतूर नगरपालिकेकडे २०लाख २६ हजार रुपयांची बाकी आहे. वसमत नगरपालिकेकडे ७ लाख ७४ हजार थकबाकी असून, पाटबंधारे विभागाचे एकूण १३ कोटी ९६ लाख ५५ हजार रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे.

१५ मार्चपासून खंडित होणार पाणी पुरवठा

या संदर्भात पूर्णा पाटबंधारे विभागाने सर्व थकबाकीदार विभागांना १५ मार्चपर्यंत थकीत पाणीपट्टी भरण्यास मुदत दिली आहे. या काळात रक्कम न भरल्यास पाणी पुरवठा खंडित करण्याची तंबी देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये परभणी, हिंगोली, वसमत व जिंतूर शहरांसह या तालुक्यातील गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

पाटबंधारे विभाग अडचणीत

मागील अनेक दिवसांपासून पाटबंधारे विभागाची सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी वसुली मोठ्या प्रमाणात थकली आहे. प्रकल्पाच्या सिंचन व्यवस्थापनाचा खर्च याच रकमेतून भागविला जातो. शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने या विभागाचे कामकाज कोलमडले असून, पाणीपट्टी वसुली झाली तरच सिंचन प्रकल्पाचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने चालते; परंतु वसुलीच्या थकबाकीमुळे हा विभाग अडचणीत सापडला आहे.