शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

१३ कोटी ९६ लाखांची पाणीपट्टी थकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:16 IST

पूर्णा पाटबंधारे विभागांतर्गत येलदरी धरणातील वेगवेगळ्या शहरांना, गावांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा करीत असताना नगरपालिका, महानगरपालिका व ...

पूर्णा पाटबंधारे विभागांतर्गत येलदरी धरणातील वेगवेगळ्या शहरांना, गावांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा करीत असताना नगरपालिका, महानगरपालिका व ग्रामपंचायतीने वेळेवर पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे; मात्र हे विभाग पाणीपट्टी वेळेवर भरत नाहीत. परिणामी, विभागाला मिळणारी रक्कम वेळेत मिळत नसल्याने कठोर कारवाई करण्यास या विभागांना भाग पाडत आहेत. परभणी शहरातील जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत २२ लाख ८१ हजार रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव काजळे २३ गाव पाणी पुरवठा योजनेचे १५ लाख ७६ हजार रुपये पाणीपट्टी थकीत असून, या योजनेचा लाभ २३ गावांपैकी केवळ ३ ते ४ गावांना झाला आहे. ही योजना म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे. शिवाय २३ गाव सिद्धेश्वर पाणी पुरवठा योजनेची ३३ लाख ६९ हजार रुपये पाणीपट्टी थकीत असून, पूरजवळ २० गाव पाणी पुरवठा योजनेचे २४ लाख ५ हजार रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. जिंतूर तालुक्यातील वस्सा बारा गाव पाणी पुरवठा योजनेची १२ लाख ११ हजार रुपये थकले आहेत. या ग्रामीण भागातील योजनांसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याची एकूण पाणीपट्टी १ कोटी ८ लाख ४२ हजार रुपयांच्या घरात थकली आहे. दुसरीकडे पूर्णा पाटबंधारे विभागाची सर्वाधिक पाणीपट्टी थकीत परभणी मनपाकडे असून, १२ कोटी २ लाख १ हजार रुपये थकले आहेत. त्या खालोखाल हिंगेाली नगर परिषदेकडे ५८ लाख १२ हजार तर जिंतूर नगरपालिकेकडे २०लाख २६ हजार रुपयांची बाकी आहे. वसमत नगरपालिकेकडे ७ लाख ७४ हजार थकबाकी असून, पाटबंधारे विभागाचे एकूण १३ कोटी ९६ लाख ५५ हजार रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे.

१५ मार्चपासून खंडित होणार पाणी पुरवठा

या संदर्भात पूर्णा पाटबंधारे विभागाने सर्व थकबाकीदार विभागांना १५ मार्चपर्यंत थकीत पाणीपट्टी भरण्यास मुदत दिली आहे. या काळात रक्कम न भरल्यास पाणी पुरवठा खंडित करण्याची तंबी देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये परभणी, हिंगोली, वसमत व जिंतूर शहरांसह या तालुक्यातील गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

पाटबंधारे विभाग अडचणीत

मागील अनेक दिवसांपासून पाटबंधारे विभागाची सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी वसुली मोठ्या प्रमाणात थकली आहे. प्रकल्पाच्या सिंचन व्यवस्थापनाचा खर्च याच रकमेतून भागविला जातो. शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने या विभागाचे कामकाज कोलमडले असून, पाणीपट्टी वसुली झाली तरच सिंचन प्रकल्पाचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने चालते; परंतु वसुलीच्या थकबाकीमुळे हा विभाग अडचणीत सापडला आहे.