शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
3
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
4
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
5
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
6
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
7
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
8
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
9
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
10
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
11
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
12
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
13
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
14
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
15
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
16
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
17
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
18
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
19
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
20
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

परभणीत १२७५ फेरफार प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:21 IST

परभणी शहरातील महसूल मंडळांतर्गत गेल्या काही महिन्यांपासून फेरफार करण्यासाठी आलेल्या फायली प्रलंबित ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी तहसील कार्यालयात करण्यात ...

परभणी शहरातील महसूल मंडळांतर्गत गेल्या काही महिन्यांपासून फेरफार करण्यासाठी आलेल्या फायली प्रलंबित ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी तहसील कार्यालयात करण्यात येत आहेत. याअनुषंगाने अधिक माहिती घेतली असता शहरांतर्गत २०१८ पासून जवळपास १२७५ जणांचे फेरफार प्रलंबित असल्याचे पाहावयास मिळाले. प्रत्यक्षात प्रशासनाच्या नियमानुसार फेरफारसाठी अर्ज आल्यानंतर संबंधित मंडळ अधिकारी यांनी तपासणी करून याबाबत १५ दिवसांत निर्णय घ्यायचा असतो. त्यावेळी तो मंजूर किंवा रद्द करण्याचा अधिकार मंडळ अधिकाऱ्यांना आहे; परंतु परभणी महसूल मंडळांतर्गत याबाबत निर्णय न घेताच सदरील फेरफार प्रलंबित ठेवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सदरील बाब ऑनलाइनच्या माध्यमातून दिसत असतानाही तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांकडून याबाबत कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी परभणी शहराचे मंडळ अधिकारी मनोहर दशरथे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या स्तरावर एकही फेरफार प्रलंबित नसल्याचे सांगितले. याबाबत तहसीलदार संजय बजरादार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. विशेष म्हणजे उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी दरमहा प्रलंबित कामांबाबत संबंधितांची बैठक घेणे आवश्यक असताना त्यांच्याकडूनही सदरील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

सोयीनुसार फेरफार केले मंजूर

अनुक्रमणिकेनुसार फेरफार मंजूर करणे आवश्यक असताना ते मनमानी पद्धतीने मंजूर करण्यात आल्याचे यासंदर्भातील यादी पाहिल्यानंतर दिसून येते. शहरातील सर्व्हे नंबर ४० मधील प्लॉट नंबर ९२ चा फेरफार क्रमांक ९९८२ मंजूर केला आहे; परंतु ९९८१ मंजूर केला नाही. त्यानंतर ९९८२ ते ९९९२ पर्यंतचे सर्व फेरफार मंजूर आहेत; परंतु ९९९३, ९९९४ मंजूर नाहीत. त्यापुढील काही फेरफार मंजूर आहेत तर काही मंजूर नाहीत. फेरफार क्रमांक ८१०५ हा २८ सप्टेंबर २०१८ पासून प्रलंबित आहे. त्यानंतरचे आतापर्यंत एकूण १२७५ फेरफार प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यासाठी घेतलेली सोयीची भूमिका अनेक प्रश्न उपस्थित करीत आहे. याबाबत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

एक फेरफार केला रद्द

शहरातील सर्व्हे नंबर ४० मधील प्लॉट नंबर ९२ चा फेरफार क्रमांक ९९८२ हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करून मंजूर केल्याची बाब तक्रारीअंती समोर आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या काळात हा फेरफार मंजूर केला होता. याबाबत तक्रारी करूनही उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी हा फेरफार रद्द केला नव्हता; परंतु आंचल गोयल यांनी ३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतला. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी डॉ. संजय कुंडेटकर यांनी तोच फेरफार रद्द केल्याचा आदेश काढला. त्यामुळे मुगळीकरांच्या काळात न घेतलेला निर्णय गोयल रुजू होताच कसा काय झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.