शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जिल्ह्यात १० जण दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:20 IST

परभणी : एकदा कोरोना झाल्यानंतर तो पुन्हा होत नाही, असा समज खोटा ठरत असून, जिल्ह्यात १० जणांना पुन्हा एकदा ...

परभणी : एकदा कोरोना झाल्यानंतर तो पुन्हा होत नाही, असा समज खोटा ठरत असून, जिल्ह्यात १० जणांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांची काळजी आता वाढली आहे.

कोणत्याही संसर्गजन्य आजाराची लागण झाल्यानंतर त्या आजाराचा सामना करणाऱ्या ॲन्टीबॉडीज्‌ शरीरात तयार होतात. त्यामुळे तो आजार पुन्हा होण्याची शक्यता तशी कमी असते. मात्र, कोरोना त्याला अपवाद ठरत आहे. मागील वर्षी कोरोना झालेल्या जिल्ह्यातील १० रुग्णांना पुन्हा कोरोना झाला आहे. त्यामुळे एक तर कोरोनाने त्याची लक्षणे बदलली किंवा ॲन्टीबॉडीज्‌चा प्रभाव कमी झाला, अशी दोन कारणे यात असू शकतात. कारणे काहीही असली तरी कोरोना दुसऱ्यांदा होण्याची शक्यता असल्याने काळजी वाढली आहे.

दुसऱ्यांदा कोरोना झाल्याचे काही उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे या रुग्णांना कोरोना होण्याची नेमकी कारणे शोधली जात आहेत. सध्या तरी रुग्ण कोरोनामुक्त करण्यावरच भर आहे.

डॉ. किशोर सुरवसे

निवासी वैद्यकीय अधिकारी, परभणी

नऊ महिन्यांपर्यंत ॲन्टीबॉडीज्‌चा प्रभाव

एकदा शरीरात कोरोनाचा विषाणू गेल्यानंतर त्याला प्रतिबंध करणाऱ्या ॲन्टीबॉडीज्‌ तयार होतात. या ॲन्टीबॉडीज्‌चा प्रभाव ९ महिन्यांपर्यंत राहतो. मात्र, कोरोनाचा स्ट्रेन बदलला असल्यास ॲन्टीबॉडीज्‌ही काम करीत नाहीत. त्यामुळेच दुसऱ्यांदा कोरोना होण्याची शक्यता असते.

मास्क, सोशल डिस्टन्सिंग हाच उपाय

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी या नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा बऱ्याच अंशी प्रतिबंध होऊ शकतो.

या नियमांचे पालन करावे, अशा सूचना प्रशासन वारंवार देत आहे. मात्र, नागरिकांमध्येच अजूनही फारसी जनजागृती झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून नियमांचे पलान करणे गरजेचे आहे.

घराबाहेर पडताना मास्क वापरणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्वत:चे सॅनिटायझर स्वत:जवळच ठेवून त्याचाही वारंवार वापर केल्यास बऱ्याच अंशी कोरोनाचा संसर्ग कमी होऊ शकतो.