शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

जिल्ह्यात १० जण दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:20 IST

परभणी : एकदा कोरोना झाल्यानंतर तो पुन्हा होत नाही, असा समज खोटा ठरत असून, जिल्ह्यात १० जणांना पुन्हा एकदा ...

परभणी : एकदा कोरोना झाल्यानंतर तो पुन्हा होत नाही, असा समज खोटा ठरत असून, जिल्ह्यात १० जणांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांची काळजी आता वाढली आहे.

कोणत्याही संसर्गजन्य आजाराची लागण झाल्यानंतर त्या आजाराचा सामना करणाऱ्या ॲन्टीबॉडीज्‌ शरीरात तयार होतात. त्यामुळे तो आजार पुन्हा होण्याची शक्यता तशी कमी असते. मात्र, कोरोना त्याला अपवाद ठरत आहे. मागील वर्षी कोरोना झालेल्या जिल्ह्यातील १० रुग्णांना पुन्हा कोरोना झाला आहे. त्यामुळे एक तर कोरोनाने त्याची लक्षणे बदलली किंवा ॲन्टीबॉडीज्‌चा प्रभाव कमी झाला, अशी दोन कारणे यात असू शकतात. कारणे काहीही असली तरी कोरोना दुसऱ्यांदा होण्याची शक्यता असल्याने काळजी वाढली आहे.

दुसऱ्यांदा कोरोना झाल्याचे काही उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे या रुग्णांना कोरोना होण्याची नेमकी कारणे शोधली जात आहेत. सध्या तरी रुग्ण कोरोनामुक्त करण्यावरच भर आहे.

डॉ. किशोर सुरवसे

निवासी वैद्यकीय अधिकारी, परभणी

नऊ महिन्यांपर्यंत ॲन्टीबॉडीज्‌चा प्रभाव

एकदा शरीरात कोरोनाचा विषाणू गेल्यानंतर त्याला प्रतिबंध करणाऱ्या ॲन्टीबॉडीज्‌ तयार होतात. या ॲन्टीबॉडीज्‌चा प्रभाव ९ महिन्यांपर्यंत राहतो. मात्र, कोरोनाचा स्ट्रेन बदलला असल्यास ॲन्टीबॉडीज्‌ही काम करीत नाहीत. त्यामुळेच दुसऱ्यांदा कोरोना होण्याची शक्यता असते.

मास्क, सोशल डिस्टन्सिंग हाच उपाय

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी या नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा बऱ्याच अंशी प्रतिबंध होऊ शकतो.

या नियमांचे पालन करावे, अशा सूचना प्रशासन वारंवार देत आहे. मात्र, नागरिकांमध्येच अजूनही फारसी जनजागृती झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून नियमांचे पलान करणे गरजेचे आहे.

घराबाहेर पडताना मास्क वापरणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्वत:चे सॅनिटायझर स्वत:जवळच ठेवून त्याचाही वारंवार वापर केल्यास बऱ्याच अंशी कोरोनाचा संसर्ग कमी होऊ शकतो.