शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

तरुण लव्हस्टोरीत कोण आहेत आजचे सुपरव्हिलन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 07:00 IST

प्रेम करायला कुठली कागदपत्रं लागत नाहीत की दाखला लागत नाही. दोन लोकांचा मामला. ते दोन जीव बिचारे फुलपाखरासारखे बागडत असतात. पण काही कडवट लोक असतात, दुनियेत कुणाचं चांगलं झालेलं न बघवण्यासाठीच या लोकांचा जन्म झालेला असतो. ते तयारच असतात या फुलपाखरांना झोडपण्यासाठी.

ठळक मुद्देत्या सार्‍यांना पुरून उरतं, एवढय़ा सार्‍या आघाडय़ांवर लढून यशस्वी ठरलेल्यांबद्दल नितांत आदर वाटतो. खरंच!

-श्रेणिक नरदे

प्रेम ही आंधळी गोष्ट असल्याने ती कधीही, कुणावरही होऊ शकते, प्रेम करायला कुठली कागदपत्रं लागत नाहीत की दाखला लागत नाही. हा दोन लोकांचा मामला असतो. मग ते दोन जीव बिचारे फुलपाखरासारखे बागडत असतात. फुलांसारखे भिडत असतात. काही चांगले लोक असतात ते निरागसपणे या फुलांकडे, फुलपाखरांकडे बघत असतात, मात्र काही कडवट लोक असतात. दुनियेत काही कुणाचं चांगलं झालेलं न बघवण्यासाठीच या लोकांचा जन्म झालेला असतो. असे काही लोक या फुलपाखरांना झोडपण्यासाठी हाताच्या बाह्या सरसावून बसलेले असतात.या अशा देखण्या प्रवृत्तीचे लोक कोण असतात ? त्यांच्या कलागुणांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. आपलं प्रेम जुळणं. हे आधी आपल्याला कळतं आणि आपल्या आधी आपल्या दोस्त, मित्रमैत्रिणींना कळतं. कधीकधी या लोकांनीच आपल्याला खांद्यावर बसवून किंवा उचलून प्रेमात पाडलेलं असतं. म्हणजे प्रेमात माणूस पडत असतो पडत असताना हे लोक धक्का मारतात आणि पाडतात मग आपण प्रेमात पडतो. आता यांचं सगळं त्यातल्या त्यात बरं चाललेलं असताना या बिचार्‍यांना कुठून तरी कसला तर त्रास व्हायला सुरुवात होते. मग ते आरे ते सगळं खरं हाय पण तिची हिश्ट्री काढली का हिश्ट्री ? असा एवढाच प्रश्न विचारून अंडीतून बाहेर आलेला बारीक साप सोडून देतात. हा साप बारीक जरी असला तरी तो वळवळतो. आणि हा किंवा ही तिची/त्याची हिश्ट्री काढतात. मग हा पूर्ण सव्र्हे असतो. त्यांच्या घराशेजारचा दोस्त, मैत्रिणींना विचार, त्यांच्या पाहुण्यांना विचार, त्यांच्या जुन्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना विचारून कुठं काही इतिहासात एखादी ऐतिहासिक घडामोड घडलीय का याचा आढावा घेण्यासंबधी आपले जवळचे मित्रमैत्रिणी प्रेरणा देत असतात आणि यातून शंका, संशयकल्लोळ अशा टाइपचं वातावरण निर्मिती करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. आताच्या काळात प्रेम हे केवळ दोन लोकांचं कधीही नसतं. हे जर खोटं वाटत असेल तर कुठलाही शिनमा काढून बघा गाण्यात दोघं न नाचता अख्खा गाव नाचत असतो त्या प्रेमवीरांबरोबर.   घर, कॉलेज, शिक्षक, नातेवाईक याआधी आपल्या दिवटय़ा मित्रमैत्रिणींनाच हे कळलेलं असतं. तिथूनच या ष्टोर्‍या लिक होतात. आपल्याला वाटतं कुणाला काहीच माहीत नाही पण अख्ख्या दुनियेला आपली कथा माहिती झालेली असते आणि याचं सारं श्रेय आपल्या मित्रमैत्रिणींना जातं. आपण सारे लोक भारतातले बांधवबिंधव असतो. पहिली ते दहावी रोज सकाळी आपण भारतमातेची लेकरं प्रतिज्ञा घेत असतो. मग नंतरून आपल्याला जातधर्म वगैरे श्रेष्ठ असल्याची जाणीव होते. त्या श्रेष्ठ असण्यानसण्यातून आंतरजातीयधर्मीय जे लोक प्रेम करत असतात त्यांना प्रचंड त्रास होतो. त्या दोघांना आपल्या जातिधर्माविषयी काही आक्षेप नसताना दुनियेला मात्र असतो. प्रियकराच्या, प्रेयसीच्या जातीवरून दोस्त लोक टोमणे मारण्याचा सपाटा लावतात. ही गोष्ट अशी न तशी घरादारापर्यंत पोहचते. आता अलीकडे चांगले मोबाइल आल्यानं त्यात छान फोटो काढता येतात. कुठूनतरी फोटो काढून ते गावभर फिरवण्याचा अतिरेकी इंट्रेस्टही काही लोकांना असतो. ही प्रवृत्ती आणि काही दिवसांपूर्वी जालन्यातील एका जोडप्याला मारहाण करणार्‍या लोकांची प्रवृत्ती यात काडीचाही फरक नसतो. तोड देंगे बदण का कोना कोनाजहाँ दिखेंगे बाबू शोना असा मजकूर असलेले आणि जोडप्यांना पळवून पळवून मारणारे काही व्हिडीओही व्हॅलेंटाइन सप्ताहात व्हायरल झाले. तसं अनेकांना पळवून लावलंच त्यांनी या ही व्हॅलेंटाइन्सला. ही दहशतीच्या प्रवृत्तीची अनेक उदाहरणं आपण बघतोय. एकतर सार्‍या सार्वजनिक जागांवर लोकांचा कायमचा जागता पहारा असतो, निर्मनुष्य आणि वर्दळ नसलेली ठिकाणं कमी असतात. यासाठी बहुतांशी लोक हे बाहेर फिरायला जात असतात. तिथं काही टोळकी येतात, ते या दोघांना पकडतात, त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतात. हातात लाठय़ाकाठय़ा घेऊन हे लोक कुठल्या संस्कृतीचे नेमकं रक्षण करतात हे न उलगडलेलं कोडंच. ही अशी जी जमात असते, मुळात या लोकांना कुणी हिंग लावून विचारत नसतं. त्या निराशेतून हे लोक दुसर्‍या जोडप्यांशी कितीतरी क्रुरतेनं वागत असल्याचं पाहायला मिळतं. याहून भयानक गोष्ट म्हणजे या जमातीला समाजाचाही पाठिंबा असतो. ही खरी शरमेची बाब असते. मध्यंतरी एक बातमी वाचायला मिळाली, एका उद्यानात प्रेमीयुगुल येऊन बसतात म्हणून तिथल्या बाकडय़ांवर जळकं ऑइल कुणीतरी आणून टाकलंत. आता पूर्वीच्या प्रमाणात कुठेतरी थोडाफार समंजसपणा समाजात येऊ लागला हे दिसताच अशा काही बातम्या येतात ज्यातून काळजाचा थरकाप उडतो अक्षरशर्‍. दोनचार दिवसांपूर्वी आलेली अशीच एक बातमी. एका मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने तिच्या कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. ती आत्महत्या ही प्रत्यक्षदर्शनी जरी दिसत असली तरी ती अप्रत्यक्षपणे समाजाने केलेली हत्याच आहे हे नाकारून चालणार नाही. आपल्या कुटुंबातील मुलीने पळून जाऊन लग्न करणं ही गोष्ट नक्कीच आत्महत्या करण्याइतपत मोठ्ठी नव्हती. पण समाजाने जो त्यांच्या कुटुंबीयांवर सामाजिक दबाव टाकलाय त्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल मजबुरीने उचललं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे सारे प्रकार बघितल्यानंतर यात त्या प्रेम या भावनेचा दोष तरी नेमका काय असा प्रश्न पडतो. इथली जातव्यवस्था, अर्थव्यवस्था, वर्णव्यवस्था यांनी आपल्या समाजाभोवती एक अदृश्य नैतिकतेचं कुंपण टाकून त्यात सर्वांना जखडून ठेवण्याचा उद्योग केला आहे. या सर्व गोष्टींना माणसाचा अडाणीपणा जबाबदार आहे. जोवर साक्षर, सुशिक्षित यांच्या पलीकडे जाऊन आपला समाज संवेदनशील होईल तेव्हाच काहीतरी भल्याचं होईल. तोवर आहेतच, प्यार के दुश्मन हजार काय लाख!त्या सार्‍यांना पुरून उरतं, एवढय़ा सार्‍या आघाडय़ांवर लढून यशस्वी ठरलेल्यांबद्दल नितांत आदर वाटतो. खरंच!

( श्रेणिक प्रगतशील शेतकरी आणि लेखक आहे.)