शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

तरुण लव्हस्टोरीत कोण आहेत आजचे सुपरव्हिलन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 07:00 IST

प्रेम करायला कुठली कागदपत्रं लागत नाहीत की दाखला लागत नाही. दोन लोकांचा मामला. ते दोन जीव बिचारे फुलपाखरासारखे बागडत असतात. पण काही कडवट लोक असतात, दुनियेत कुणाचं चांगलं झालेलं न बघवण्यासाठीच या लोकांचा जन्म झालेला असतो. ते तयारच असतात या फुलपाखरांना झोडपण्यासाठी.

ठळक मुद्देत्या सार्‍यांना पुरून उरतं, एवढय़ा सार्‍या आघाडय़ांवर लढून यशस्वी ठरलेल्यांबद्दल नितांत आदर वाटतो. खरंच!

-श्रेणिक नरदे

प्रेम ही आंधळी गोष्ट असल्याने ती कधीही, कुणावरही होऊ शकते, प्रेम करायला कुठली कागदपत्रं लागत नाहीत की दाखला लागत नाही. हा दोन लोकांचा मामला असतो. मग ते दोन जीव बिचारे फुलपाखरासारखे बागडत असतात. फुलांसारखे भिडत असतात. काही चांगले लोक असतात ते निरागसपणे या फुलांकडे, फुलपाखरांकडे बघत असतात, मात्र काही कडवट लोक असतात. दुनियेत काही कुणाचं चांगलं झालेलं न बघवण्यासाठीच या लोकांचा जन्म झालेला असतो. असे काही लोक या फुलपाखरांना झोडपण्यासाठी हाताच्या बाह्या सरसावून बसलेले असतात.या अशा देखण्या प्रवृत्तीचे लोक कोण असतात ? त्यांच्या कलागुणांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. आपलं प्रेम जुळणं. हे आधी आपल्याला कळतं आणि आपल्या आधी आपल्या दोस्त, मित्रमैत्रिणींना कळतं. कधीकधी या लोकांनीच आपल्याला खांद्यावर बसवून किंवा उचलून प्रेमात पाडलेलं असतं. म्हणजे प्रेमात माणूस पडत असतो पडत असताना हे लोक धक्का मारतात आणि पाडतात मग आपण प्रेमात पडतो. आता यांचं सगळं त्यातल्या त्यात बरं चाललेलं असताना या बिचार्‍यांना कुठून तरी कसला तर त्रास व्हायला सुरुवात होते. मग ते आरे ते सगळं खरं हाय पण तिची हिश्ट्री काढली का हिश्ट्री ? असा एवढाच प्रश्न विचारून अंडीतून बाहेर आलेला बारीक साप सोडून देतात. हा साप बारीक जरी असला तरी तो वळवळतो. आणि हा किंवा ही तिची/त्याची हिश्ट्री काढतात. मग हा पूर्ण सव्र्हे असतो. त्यांच्या घराशेजारचा दोस्त, मैत्रिणींना विचार, त्यांच्या पाहुण्यांना विचार, त्यांच्या जुन्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना विचारून कुठं काही इतिहासात एखादी ऐतिहासिक घडामोड घडलीय का याचा आढावा घेण्यासंबधी आपले जवळचे मित्रमैत्रिणी प्रेरणा देत असतात आणि यातून शंका, संशयकल्लोळ अशा टाइपचं वातावरण निर्मिती करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. आताच्या काळात प्रेम हे केवळ दोन लोकांचं कधीही नसतं. हे जर खोटं वाटत असेल तर कुठलाही शिनमा काढून बघा गाण्यात दोघं न नाचता अख्खा गाव नाचत असतो त्या प्रेमवीरांबरोबर.   घर, कॉलेज, शिक्षक, नातेवाईक याआधी आपल्या दिवटय़ा मित्रमैत्रिणींनाच हे कळलेलं असतं. तिथूनच या ष्टोर्‍या लिक होतात. आपल्याला वाटतं कुणाला काहीच माहीत नाही पण अख्ख्या दुनियेला आपली कथा माहिती झालेली असते आणि याचं सारं श्रेय आपल्या मित्रमैत्रिणींना जातं. आपण सारे लोक भारतातले बांधवबिंधव असतो. पहिली ते दहावी रोज सकाळी आपण भारतमातेची लेकरं प्रतिज्ञा घेत असतो. मग नंतरून आपल्याला जातधर्म वगैरे श्रेष्ठ असल्याची जाणीव होते. त्या श्रेष्ठ असण्यानसण्यातून आंतरजातीयधर्मीय जे लोक प्रेम करत असतात त्यांना प्रचंड त्रास होतो. त्या दोघांना आपल्या जातिधर्माविषयी काही आक्षेप नसताना दुनियेला मात्र असतो. प्रियकराच्या, प्रेयसीच्या जातीवरून दोस्त लोक टोमणे मारण्याचा सपाटा लावतात. ही गोष्ट अशी न तशी घरादारापर्यंत पोहचते. आता अलीकडे चांगले मोबाइल आल्यानं त्यात छान फोटो काढता येतात. कुठूनतरी फोटो काढून ते गावभर फिरवण्याचा अतिरेकी इंट्रेस्टही काही लोकांना असतो. ही प्रवृत्ती आणि काही दिवसांपूर्वी जालन्यातील एका जोडप्याला मारहाण करणार्‍या लोकांची प्रवृत्ती यात काडीचाही फरक नसतो. तोड देंगे बदण का कोना कोनाजहाँ दिखेंगे बाबू शोना असा मजकूर असलेले आणि जोडप्यांना पळवून पळवून मारणारे काही व्हिडीओही व्हॅलेंटाइन सप्ताहात व्हायरल झाले. तसं अनेकांना पळवून लावलंच त्यांनी या ही व्हॅलेंटाइन्सला. ही दहशतीच्या प्रवृत्तीची अनेक उदाहरणं आपण बघतोय. एकतर सार्‍या सार्वजनिक जागांवर लोकांचा कायमचा जागता पहारा असतो, निर्मनुष्य आणि वर्दळ नसलेली ठिकाणं कमी असतात. यासाठी बहुतांशी लोक हे बाहेर फिरायला जात असतात. तिथं काही टोळकी येतात, ते या दोघांना पकडतात, त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतात. हातात लाठय़ाकाठय़ा घेऊन हे लोक कुठल्या संस्कृतीचे नेमकं रक्षण करतात हे न उलगडलेलं कोडंच. ही अशी जी जमात असते, मुळात या लोकांना कुणी हिंग लावून विचारत नसतं. त्या निराशेतून हे लोक दुसर्‍या जोडप्यांशी कितीतरी क्रुरतेनं वागत असल्याचं पाहायला मिळतं. याहून भयानक गोष्ट म्हणजे या जमातीला समाजाचाही पाठिंबा असतो. ही खरी शरमेची बाब असते. मध्यंतरी एक बातमी वाचायला मिळाली, एका उद्यानात प्रेमीयुगुल येऊन बसतात म्हणून तिथल्या बाकडय़ांवर जळकं ऑइल कुणीतरी आणून टाकलंत. आता पूर्वीच्या प्रमाणात कुठेतरी थोडाफार समंजसपणा समाजात येऊ लागला हे दिसताच अशा काही बातम्या येतात ज्यातून काळजाचा थरकाप उडतो अक्षरशर्‍. दोनचार दिवसांपूर्वी आलेली अशीच एक बातमी. एका मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने तिच्या कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. ती आत्महत्या ही प्रत्यक्षदर्शनी जरी दिसत असली तरी ती अप्रत्यक्षपणे समाजाने केलेली हत्याच आहे हे नाकारून चालणार नाही. आपल्या कुटुंबातील मुलीने पळून जाऊन लग्न करणं ही गोष्ट नक्कीच आत्महत्या करण्याइतपत मोठ्ठी नव्हती. पण समाजाने जो त्यांच्या कुटुंबीयांवर सामाजिक दबाव टाकलाय त्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल मजबुरीने उचललं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे सारे प्रकार बघितल्यानंतर यात त्या प्रेम या भावनेचा दोष तरी नेमका काय असा प्रश्न पडतो. इथली जातव्यवस्था, अर्थव्यवस्था, वर्णव्यवस्था यांनी आपल्या समाजाभोवती एक अदृश्य नैतिकतेचं कुंपण टाकून त्यात सर्वांना जखडून ठेवण्याचा उद्योग केला आहे. या सर्व गोष्टींना माणसाचा अडाणीपणा जबाबदार आहे. जोवर साक्षर, सुशिक्षित यांच्या पलीकडे जाऊन आपला समाज संवेदनशील होईल तेव्हाच काहीतरी भल्याचं होईल. तोवर आहेतच, प्यार के दुश्मन हजार काय लाख!त्या सार्‍यांना पुरून उरतं, एवढय़ा सार्‍या आघाडय़ांवर लढून यशस्वी ठरलेल्यांबद्दल नितांत आदर वाटतो. खरंच!

( श्रेणिक प्रगतशील शेतकरी आणि लेखक आहे.)