शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

आमच्या प्रेमाला नकार देणारे तुम्ही कोण?

By admin | Updated: February 5, 2015 19:19 IST

प्रेम करण्याचा अधिकार मागत पुण्यात तरुण मुला-मुलींनी काढलेल्या रॅलीचा थेट सवाल. वेळ सकाळी अकरा वाजताची.

कलिम अजीम -
प्रेम करण्याचा अधिकार मागत पुण्यात तरुण मुला-मुलींनी काढलेल्या रॅलीचा थेट सवाल.
वेळ सकाळी अकरा वाजताची.
पुण्यातील गुडलक चौकात दोन तरु ण गुलाबी रंगाचा ‘‘राइट टू लव्ह’’ नावाच्या मजकूराचा बॅनर घेऊन उभे आहेत. प्रत्येक बाइकस्वार जरासा पॉज घेऊन या तरुणांना न्याहाळत मजकूरावर नजर फिरवतोय, काहीजण स्मार्ट म्हणवणार्‍या फोनमधून फोटो टिपताहेत, तर काही ‘‘हं’’ म्हणून निघून जाताहेत. सुमारे दहा मिनिटं हिच फ्रे म,अकराव्या मिनिटाला एकजण ‘शेम..’ लिहिलेला ब्लॅक बलून्स घेऊन त्या दोघांजवळ येऊन थांबतो, बघ्याच्या नजरा आता जरा जास्तच खिळत आहेत. पुढच्या काही मिनिटात कॉलेज यंगस्टर्सचे जथ्थे चौकाच्या दिशेने येत चालू लागतात. काहींच्या हातात स्लोगनच्या पाट्या तर काहींच्या हाती गुलाबी-लाल रंगाचे लव्ह मॅसेजेस लिहिलेले मोठ्ठाले फुगे. बघता-बघता जाम गर्दी जमलीय. पंधराव्या मिनिटाला चौक घोषणांनी दुमदुमलाय, जोरदार घोषणांनी चौकात चलबिचल सुरू झालीय,‘आम्हाला हवाय राइट टू लव्ह.’
‘प्रेम आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं..’, ‘आम्ही चालत आहोत, जगत आहोत, मरत आहोत फक्त प्रेमासाठी..’, ‘माझा देह., माझा अधिकार’ 
घोषणा सुरूच. दीडदोनशे तरुण मुलं-मुली. दोनदोनची जोडी करून एका रांगेत उभे. ‘सपोर्ट टू लव्ह, राइट टू लव्ह.’, ‘वुई वॉण्ट राइट टू लव्ह.’, ‘त्यानं प्रेम केलं, तिनं प्रेम केलं, तुमच्या बापाचं काय गेलं.’अशा आशयाचे बॅनर्स घेऊन तरु णींचा एक जथ्था चौकातल्या गर्दीत तेवढय़ात सामील होतो. सुमारे पंधरा मिनिटांत चौकातला ट्रॅफीकचा आवाज नाहीसा करण्यात ही तरुणाई यशस्वी ठरली. घणघणाती घोषणा देत जथ्थ्याचे ‘‘राइट टू लव्ह’’ रॅलीत रूपांतर झाले,आता ही रॅली फग्यरुसन कॉलेजच्या दिशेनं चालू लागली.  
-हे सारं काय होतं? 
 प्रेमात पडलेल्या एका तरु णीला संस्कृती रक्षणाच्या नावानं बेदम मारहाण केल्याचं वृत्त १५ जानेवारीला राज्यातील प्रत्येक न्यूज चॅनलवर दाखवलं गेलं.  त्याचकाळात अनेकांच्या व्हॉट्स अँपवर त्या मुलीला मारहाण होत असल्याचे व्हीडीओ शेअर होत होते. आपापल्या घरात/कट्टय़ांवर अनेक तरुण मुला-मुलींनी ते व्हीडीओ पाहिले चहा-बिस्कीटासोबत निषेधही नोंदवला. लातूर जिल्ह्यातील अकोली गावात दीड महिन्यापूर्वी घडलेली ही घटना. त्यानंतर तो व्हीडीओ व्हायरल झाला. (किंवा करण्यात आला.) त्यावर हळहळ झाली. काही चर्चा झाल्या; पण काही तरुण मुलं मात्र हादरलेही आणि संतापलेही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पत्रकारितेचं शिक्षण घेणार्‍या काही तरुणांनी एकत्र येऊन प्रतिकात्मक निषेध नोंदवायचं ठरवलं, आणि तो निषेध म्हणजे ही राइट टू लव्ह रॅली. लातूरच्या घटनेच्या निमित्तानं समाजात प्रेमाच्या अधिकाराची जाणीव व जनजागृती व्हावी, असं या रॅली काढणार्‍यांना अपेक्षित होतं. पण, पुण्यातल्या तरुण मुलांनी प्रचंड संवेदनशीलतेनं या विषयात सहभाग घेतला असं काही झालं नाही. पेशावर हल्ला, चार्ली एब्दो प्रकरणात ‘स्वातंत्र्य’ आणि ‘लोकशाही’ विषयी सोशल नेटवर्किंगवर पोटतिडकीनं बोलणार्‍या तरुण जगाला या आपल्या ‘देशी’ वास्तवाबद्दल काही बोलावं असं वाटलं नाही. 
हे कसले नियम?
गाव-खेड्यात कशाला अनेक शहरातही अनेक प्रेमी युगुलांना उघडपणे भेटता येत नाही, बोलता येत, एखाद्या बागेत, निसर्गरम्य ठिकाणी तरुणांना मारहाण होते, गुंडांचा त्रास होतो, त्याच्या बातम्याही प्रसिद्ध होतात. पण, यासार्‍या संदर्भात तरुण मुलं कधीकाही बोलत नाही. (मुली तर बोलूही शकत नाहीत.)
पुढच्याच येणार्‍या व्हॅलेण्टाइन डे लाही आपल्याकडे एकेकाळी विरोध झालाच होता; पण त्यामागची बाजारपेठीय ताकद वाढली तसा तो विरोध निवळला. शहरात हे असे बदल घडत असताना ग्रामीण आणि निमशहरी भागात मात्र आजही कुणी कुणाच्या प्रेमात पडणं, भेटणं ही आकाशा-पाताळ एक करणारी घटना ठरते. 
 तरुण झालेली दोन माणसं आपल्या मर्जीनं जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही, हे कसले नियम? आपला जोडीदार कसा असावा, तो आपण निवडावा हे मूलभूत स्वातंत्र्य आहे हेदेखील आपल्या समाजाला आजही मान्य नाही हाच या सार्‍याचा अर्थ नव्हे काय? आणि एवढं करूनही कुणी पडलंच प्रेमात तर प्रेमाला घरचे स्वीकारत नाहीत आणि समाज मान्यता देत नाही. एकीकडे पालक आणि दुसरीकडे समाजाच्या वाईट नजरा, कोणा-कोणास स्पष्टीकरण देत फिरायचे?
 जातीव्यवस्थेची दरी कमी करण्यासाठी आंतरजातीय व आंतरधर्मीय लग्न व्हावीत यासाठी शासनाकडून पुरस्कार आणि विविध योजना राबविल्या जातात. मात्र, जातीपातीचे दबाव ग्रामीण भागात आजही इतके जास्त आहे की, परजातीतच कशाला स्वजातीतल्या मुलाच्या प्रेमात पडण्याइतपत स्वातंत्र्य अजूनही ग्रामीण भागातल्या मुला-मुलींना नाही.
आणि म्हणूनच या रॅलीत सहभागी झालेल्या अनेकांचा एकच सवाल होता की, आमच्या प्रेमाला नकार देणारे तुम्ही कोण? प्रेमात पडणार्‍यांना धडा शिकवणारे तुम्ही कोण?’ 
अर्थात असं एका रॅलीनं इतक्या अवघड प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात, मिळणारही नाहीत. पण, निदान तरुण मुलांना आपला जोडीदार निवडायचं स्वातंत्र्य हवं, हा प्रश्न तरी यानिमित्तानं पुन्हा एकदा चर्चेत आला इतकंच!