शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
5
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
6
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
7
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
8
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
9
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
10
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
11
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
12
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
13
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
14
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
15
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
16
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
17
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
18
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
19
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
20
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
Daily Top 2Weekly Top 5

संकटाचा कान धराल का?

By admin | Updated: April 2, 2015 18:04 IST

‘द ओन्ली कॉन्स्टण्ट इन अ लाईफ इज अ चेंज!’ हेराक्लायट्स नावाच्या ग्रीक तत्त्ववेत्त्याचं वाक्य आहे.

- सॉफ्ट स्किल्स
 
- समिंदरा हर्डीकर-सावंत
‘द ओन्ली कॉन्स्टण्ट इन अ लाईफ इज अ चेंज!’ हेराक्लायट्स नावाच्या ग्रीक  तत्त्ववेत्त्याचं वाक्य आहे. आपणही मारतोच ना, डायलॉग की परिवर्तन संसार का नियम है!
पण हे बदल कायम आपल्याला सोयीचे आणि सुखाचे असतीलच असं नाही!  काही वेळा प्रतिकूल अशा घटना अगदी अचानक, कोणतीही पूर्वसूचना न देता आपल्या समोर येऊन धडकतात. ध्यानीमनी नसताना एकामागून एक काही ना काही समस्या उभ्या राहतात. त्यालाच आपण संकट किंवा क्रायसिस असं म्हणतो!
कामाच्या ठिकाणी तर हे असं क्रायसिस अनेकदा वाट्याला येतं. ही अशी संकट परिस्थिती हाताळण्याची कला फारच वेगळी असते. त्यात आपल्याकडे खूप विचार करून निर्णय घ्यायला वेळच नसतो, काय करायचं काही सुचत नाही आणि निर्णय तर अगदी  काही क्षणात घ्यावे लागतात.
वेळ फार थोडा असतो, आणि निर्णय घेण्याची जबाबदारी मोठी ! हे निर्णयही तुम्हाला पुरेशी माहिती हाताशी नसताना घ्यावे लागतात. संकटकाळात तुम्ही कसे निर्णय घेता, तुम्ही परिस्थिती कशी हाताळता, किती संयमाने निर्णय घेता, इतरांना सांभाळून घेता यावर बर्‍याच गोष्टी ठरतात!
क्रायसिस मॅनेजमेण्ट जमत नाही, वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील संकटं हाताळता येत नाही, त्यात तोल जातो किंवा सुटतो असं अनेकांचं होतं !
तसं होऊ नये म्हणून हे स्किल आपल्याला शिकायचं आहे हे तरी किमान लक्षात ठेवायलाच हवं!
संकट व्यवस्थापन नेमकं करतात कसं?
१) संकट किती गंभीर आहे, याचा आधी विचार करा. समस्या किती छोटी-मोठी आहे हे तपासा, उगीच अतिटेन्शन न घेता, फक्त आता समोर असलेल्या संकटाचा आपल्या कामावर आणि कंपनीवर  प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम काय होऊ शकतो, याचा विचार करा!
२) पॅनिक होऊ नका. काहीजण घाबरून जाऊन अचानक पॅनिक होतात. वस्तुस्थिती पहा, अशावेळी भावना बाजूला ठेवून वास्तव काय आहे, एवढंच पहा. तेवढाच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. 
३) आपलं आणि आपल्या संस्थेचं कमीत कमी आर्थिक नुकसान होऊन जास्तीत जास्त सेफ कसं राहता येईल, याचा त्याक्षणी विचार करायला हवा. जीव आणि वित्तहानी टाळणं हे प्रथम प्राधान्य.
४) अशावेळी तुमचा सराव, धीर आणि प्रसंगावधान उपयोगी पडेल. तुम्ही इतर सहकार्‍यांची कशी मदत घेता, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गोष्टी करून कसं तरून जाता हे महत्त्वाचं! तुमचं संवादकौशल्य चांगलं असेल तर तुम्ही नक्की तरून जाऊ शकाल!
५) आता भावनांचा विचार करू. हा बदल कुणालाच आवडत नाही. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येणं सर्वांसाठीच अवघड असतं.  कदाचित होणारा बदल तुमच्या मनासारखा नसेल, थोडी अनिश्‍चितता घेऊन येईल, पण तो वाईटच असेल असं मानायचं काही कारण नाही. अनेकांना कुठलाही बदल हा संकटच वाटतो, ही भावना मनातून काढून टाकली की काम सोपं होईल!
६) स्वत: शांत राहून इतरांना शांत ठेवणंसुद्धा तुम्हाला जमलं पाहिजे. परिस्थिती कितीही भयाण असो तुम्ही शांत राहून, आवाज न चढवता, धीरानं काम करायला हवं. ते शिकायलाच हवं.
७) संकट आलं की अनेकदा वाटतं, आपल्या हातात काय आहे? नशीब आपलं. तेच फुटकं. असं म्हणू नका. जेवढं जमेल, जेवढं वास्तव आहे, तेवढं लढाच. प्रयत्न कराच. वादळात तुम्ही तुमचं घर वाचवलं हेच खूप असं म्हणायचं!
८)सगळ्यात महत्त्वाचं संकटातून जो सहीसलामत बाहेर पडून जो नव्यानं लढायला उभा राहतो, तोच खरा सिकंदर. तुम्हाला सिकंदर व्हायचं की नाही, हे ज्यानं त्यानं ठरवायचं!