शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी व्हायचंय? मागे हटू नका!

By अमेय गोगटे | Updated: September 28, 2018 17:10 IST

‘मी एकच सांगेन, ध्येय निश्चित असेल, मेहनतीची तयारी असेल तर कुणालाही घाबरू नका आणि सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे जाता येतं, हे लक्षात ठेवा! मग यश दूर नाही.’ बालाजी वेफर्सचे संचालक चंदूभाई विरानी यांचा तरुणांना यशाचा मंत्र

ठळक मुद्देमन स्वच्छ असलं की यश मिळतंच

- अमेय गोगटे

आपल्याला सगळ्यांना शेतकर्‍याच्या चार मुलांची ‘एकीचे बळ’ ही गोष्ट माहीत आहे. लहानपणी ऐकलीये की, कसे चारही भाऊ एकत्र येतात आणि त्यातून उत्तम शेत पिकवतात. पण, ही बोधकथा ऐकत मोठय़ा झालेल्या शेतकर्‍याच्या तीन मुलांची यशोगाथा आजच्या स्टार्ट-अपच्या काळातल्या तरु णांनाही नक्कीच प्रेरणादायी ठरू शकते. थिएटरमध्ये वेफर्स विकणार्‍या तीन भावांनी स्वतर्‍ची वेफर्स कंपनी सुरू केली आणि 20 हजार रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेला प्रवास आज 1800 कोटी रुपयांच्या ‘टर्न ओव्हर’र्पयत पोहोचलाय. 

जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अर्थातच एकीचं बळ. या सार्‍याची ही एक कल्पक आणि अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे.

वेफर्स तर आपण सगळेच खातो. त्यातही अत्यंत ओळखीचा ब्रॅण्ड म्हणजे बालाजी वेफर्स. रेल्वे स्टेशनांवरील स्टॉल्सपासून सुपर मार्केट्सपर्यंत आणि आपल्या घरापासून ते मनार्पयत बालाजीच्या उत्पादनांनी हक्काचं स्थान मिळवलंय. ग्राहकांना जे द्यायचं ते उत्तम दर्जाचं आणि रास्त किमतीत, हे तत्त्व ठरवून भिकूभाई, चंदूभाई आणि कनूभाई विरानी या त्रिकुटाने राजकोटमध्ये ‘बालाजी’चं बीज रोवलं होतं. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. या वाटचालीमागची गोष्ट चंदूभाईंकडून ऐकताना विरानी कुटुंबाची तपश्चर्या सहज जाणवते.

गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील धुन धोराजी हे विरानी कुटुंबाचं मूळ गाव. शेती हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय. पण, दुष्काळाचे ढग कायमच दाटलेले. ही अनिश्चितता दरवर्षी वाढतच चालल्याचं पाहून पोपटभाई विरानी यांनी आपली जमीन विकली आणि तीन मुलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 हजार रु पये दिले. शेती बघतच मोठय़ा झालेल्या तिघा भावंडांनी खतांचा व्यवसाय सुरू केला. पण, तो निर्णय साफ चुकला. तिथेही दुष्काळाची दृष्ट लागली. आता गाव सोडून बाहेर पडणं अपरिहार्य होतं. भिकूभाई, चंदूभाई आणि  कनूभाईंनी राजकोट गाठलं. एका बोर्डिग मेसमध्ये कामाला लागले. साधारण दोन वर्षानंतर त्यांना अ‍ॅस्ट्रॉन थिएटरमध्ये नोकरी मिळाली. तिथेही पडेल ते काम त्यांनी अगदी इमाने-इतबारे केलं. त्याचं त्यांना मोठं बक्षीस मिळालं. थिएटर मालकाने त्यांना नफ्यातील वाटा दिला आणि कॅन्टीन चालवण्याची जबाबदारी सोपवली. तिथे ग्राहकांना वेफर्स विकताना त्यांना या व्यवसायाची अगदी खडान् खडा माहिती झाली. त्यामुळे तयार वेफर्स आणून विकणारे भाऊ स्वतर्‍च वेफर्स तयार करू लागले आणि थिएटरमधील बालाजीच्या आशीर्वादाने 1994 साली बालाजी वेफर्स कंपनीची मुहूर्तमेढ रोवली गेली.

चंदूभाई सांगतात, ‘आधी आम्ही आमचे वेफर्स फक्त थिएटरमध्ये विकत होतो. हळूहळू ते राजकोट शहरात आणि आसपासच्या गावांमध्येही जाऊ लागले. ग्राहकांना एकेक पॅकेट विकलेलं असल्यानं त्यांना नेमकं काय हवं असतं, हे आम्हाला ठाऊक होतं. पण, सिम्बा वेफर्स, हॅलो, अंकल चिप्स यांसारख्या अनेक कंपन्या बाजारात होत्या. त्यांच्यापेक्षा वेगळं आणि चांगलं देऊन ‘बालाजी’बद्दल विश्वास निर्माण केल्यानंच आज चार दशकांहून अधिक काळ आम्ही बाजारात टिकून आहोत!’

अर्थात ते सांगतात तेवढा हा प्रवास सोपा नव्हताच. पहिली 20 वर्षे खूप कठीण होती. कारण, पॅकबंद पदार्थावर ग्राहकांचा विश्वास नसायचा. कधी पॅक केलं असेल, कसं बनवलं असेल, ही भीती सगळ्यांनाच असायची. त्याकाळी बाहेरचं खाण्यासही फार पसंती नव्हती. मात्र तरी वेफर्सची ही चटकदार वाटचाल कशी जमवली असं विचारलं तर चंदूभाई सांगतात, ‘हळूहळू लोकांची मानसिकता बदलली, चवी बदलल्या आणि आम्ही पोटातून त्यांच्या मनात घर केलं. राजकोट, वलसाड आणि इंदूरमध्ये आज बालाजीचे मोठे प्लाण्ट आहेत. त्यात पाच हजार कर्मचारी काम करतात. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील शेतकरीही ‘बालाजी’शी जोडलेले आहेत. हे नातं फक्त व्यावसायिक नसून कौटुंबिक आहे ! विश्वास वाढत गेला.’   आज वेफर्ससोबत बच्चेकंपनीसाठी व्हील्स, पॉप रिंग्स, तरुणांसाठी पिझ्झी मसाला, चटका पटकासारखे चटकदार पदार्थ, तर कुटुंबासाठी शेव, फरसाण, मसाला शेंगदाणे, मूग डाळ अशी अनेक उत्पादनं बालाजी तयार करतं. तिघं भाऊ आणि आता त्यांची पुढची पिढी हातात हात घालून हा व्यवसाय सांभाळतेय. व्यक्ती तितक्या प्रकृती असल्यानं सगळ्यांना सोबत घेऊन काम करत रहायचं असतं. काही मतभेद असले तरी ते किती ताणायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. जे असेल ते समोरासमोर बसून सोडवलं की मनात राग राहत नाही आणि मन स्वच्छ असलं की यश मिळतंच, असा मंत्र   चंदूभाई देतात. 

नव्यानं व्यवसाय करू पाहणार्‍या धडपड्या तरुणांना काय सांगाल असं विचारलं तर चंदूभाई म्हणतात, ‘मी एकच सांगेन, ध्येय निश्चित असेल, मेहनतीची तयारी असेल तर मागे हटू नका. कुणालाही घाबरू नका आणि सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे जाता येतं, हे लक्षात ठेवा ! मग यश दूर नाही.’