शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

यशस्वी व्हायचंय? मागे हटू नका!

By अमेय गोगटे | Updated: September 28, 2018 17:10 IST

‘मी एकच सांगेन, ध्येय निश्चित असेल, मेहनतीची तयारी असेल तर कुणालाही घाबरू नका आणि सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे जाता येतं, हे लक्षात ठेवा! मग यश दूर नाही.’ बालाजी वेफर्सचे संचालक चंदूभाई विरानी यांचा तरुणांना यशाचा मंत्र

ठळक मुद्देमन स्वच्छ असलं की यश मिळतंच

- अमेय गोगटे

आपल्याला सगळ्यांना शेतकर्‍याच्या चार मुलांची ‘एकीचे बळ’ ही गोष्ट माहीत आहे. लहानपणी ऐकलीये की, कसे चारही भाऊ एकत्र येतात आणि त्यातून उत्तम शेत पिकवतात. पण, ही बोधकथा ऐकत मोठय़ा झालेल्या शेतकर्‍याच्या तीन मुलांची यशोगाथा आजच्या स्टार्ट-अपच्या काळातल्या तरु णांनाही नक्कीच प्रेरणादायी ठरू शकते. थिएटरमध्ये वेफर्स विकणार्‍या तीन भावांनी स्वतर्‍ची वेफर्स कंपनी सुरू केली आणि 20 हजार रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेला प्रवास आज 1800 कोटी रुपयांच्या ‘टर्न ओव्हर’र्पयत पोहोचलाय. 

जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अर्थातच एकीचं बळ. या सार्‍याची ही एक कल्पक आणि अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे.

वेफर्स तर आपण सगळेच खातो. त्यातही अत्यंत ओळखीचा ब्रॅण्ड म्हणजे बालाजी वेफर्स. रेल्वे स्टेशनांवरील स्टॉल्सपासून सुपर मार्केट्सपर्यंत आणि आपल्या घरापासून ते मनार्पयत बालाजीच्या उत्पादनांनी हक्काचं स्थान मिळवलंय. ग्राहकांना जे द्यायचं ते उत्तम दर्जाचं आणि रास्त किमतीत, हे तत्त्व ठरवून भिकूभाई, चंदूभाई आणि कनूभाई विरानी या त्रिकुटाने राजकोटमध्ये ‘बालाजी’चं बीज रोवलं होतं. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. या वाटचालीमागची गोष्ट चंदूभाईंकडून ऐकताना विरानी कुटुंबाची तपश्चर्या सहज जाणवते.

गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील धुन धोराजी हे विरानी कुटुंबाचं मूळ गाव. शेती हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय. पण, दुष्काळाचे ढग कायमच दाटलेले. ही अनिश्चितता दरवर्षी वाढतच चालल्याचं पाहून पोपटभाई विरानी यांनी आपली जमीन विकली आणि तीन मुलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 हजार रु पये दिले. शेती बघतच मोठय़ा झालेल्या तिघा भावंडांनी खतांचा व्यवसाय सुरू केला. पण, तो निर्णय साफ चुकला. तिथेही दुष्काळाची दृष्ट लागली. आता गाव सोडून बाहेर पडणं अपरिहार्य होतं. भिकूभाई, चंदूभाई आणि  कनूभाईंनी राजकोट गाठलं. एका बोर्डिग मेसमध्ये कामाला लागले. साधारण दोन वर्षानंतर त्यांना अ‍ॅस्ट्रॉन थिएटरमध्ये नोकरी मिळाली. तिथेही पडेल ते काम त्यांनी अगदी इमाने-इतबारे केलं. त्याचं त्यांना मोठं बक्षीस मिळालं. थिएटर मालकाने त्यांना नफ्यातील वाटा दिला आणि कॅन्टीन चालवण्याची जबाबदारी सोपवली. तिथे ग्राहकांना वेफर्स विकताना त्यांना या व्यवसायाची अगदी खडान् खडा माहिती झाली. त्यामुळे तयार वेफर्स आणून विकणारे भाऊ स्वतर्‍च वेफर्स तयार करू लागले आणि थिएटरमधील बालाजीच्या आशीर्वादाने 1994 साली बालाजी वेफर्स कंपनीची मुहूर्तमेढ रोवली गेली.

चंदूभाई सांगतात, ‘आधी आम्ही आमचे वेफर्स फक्त थिएटरमध्ये विकत होतो. हळूहळू ते राजकोट शहरात आणि आसपासच्या गावांमध्येही जाऊ लागले. ग्राहकांना एकेक पॅकेट विकलेलं असल्यानं त्यांना नेमकं काय हवं असतं, हे आम्हाला ठाऊक होतं. पण, सिम्बा वेफर्स, हॅलो, अंकल चिप्स यांसारख्या अनेक कंपन्या बाजारात होत्या. त्यांच्यापेक्षा वेगळं आणि चांगलं देऊन ‘बालाजी’बद्दल विश्वास निर्माण केल्यानंच आज चार दशकांहून अधिक काळ आम्ही बाजारात टिकून आहोत!’

अर्थात ते सांगतात तेवढा हा प्रवास सोपा नव्हताच. पहिली 20 वर्षे खूप कठीण होती. कारण, पॅकबंद पदार्थावर ग्राहकांचा विश्वास नसायचा. कधी पॅक केलं असेल, कसं बनवलं असेल, ही भीती सगळ्यांनाच असायची. त्याकाळी बाहेरचं खाण्यासही फार पसंती नव्हती. मात्र तरी वेफर्सची ही चटकदार वाटचाल कशी जमवली असं विचारलं तर चंदूभाई सांगतात, ‘हळूहळू लोकांची मानसिकता बदलली, चवी बदलल्या आणि आम्ही पोटातून त्यांच्या मनात घर केलं. राजकोट, वलसाड आणि इंदूरमध्ये आज बालाजीचे मोठे प्लाण्ट आहेत. त्यात पाच हजार कर्मचारी काम करतात. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील शेतकरीही ‘बालाजी’शी जोडलेले आहेत. हे नातं फक्त व्यावसायिक नसून कौटुंबिक आहे ! विश्वास वाढत गेला.’   आज वेफर्ससोबत बच्चेकंपनीसाठी व्हील्स, पॉप रिंग्स, तरुणांसाठी पिझ्झी मसाला, चटका पटकासारखे चटकदार पदार्थ, तर कुटुंबासाठी शेव, फरसाण, मसाला शेंगदाणे, मूग डाळ अशी अनेक उत्पादनं बालाजी तयार करतं. तिघं भाऊ आणि आता त्यांची पुढची पिढी हातात हात घालून हा व्यवसाय सांभाळतेय. व्यक्ती तितक्या प्रकृती असल्यानं सगळ्यांना सोबत घेऊन काम करत रहायचं असतं. काही मतभेद असले तरी ते किती ताणायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. जे असेल ते समोरासमोर बसून सोडवलं की मनात राग राहत नाही आणि मन स्वच्छ असलं की यश मिळतंच, असा मंत्र   चंदूभाई देतात. 

नव्यानं व्यवसाय करू पाहणार्‍या धडपड्या तरुणांना काय सांगाल असं विचारलं तर चंदूभाई म्हणतात, ‘मी एकच सांगेन, ध्येय निश्चित असेल, मेहनतीची तयारी असेल तर मागे हटू नका. कुणालाही घाबरू नका आणि सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे जाता येतं, हे लक्षात ठेवा ! मग यश दूर नाही.’