शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

अप्रिय, अवघड निर्णय घ्याच!

By admin | Updated: July 23, 2015 17:54 IST

कॉलेजमधे अभ्यास असतो, तो करावाच लागतो.

  - रतन टाटा

(श्री. टाटा यांनी चेन्नईच्या ग्रेट लेक मॅनेजमेण्ट इन्स्टिटय़ूटच्या पदवीदान सोहळ्यात केलेल्या भाषणाचा संपादित अनुवाद.)
 
कॉलेजमधे अभ्यास असतो,
तो करावाच लागतो.
हे सगळं आपण का शिकतो आहोत, असा प्रश्न कॉलेजमधे असताना पडतोच!
मात्र एकदा पदवी घेऊन तुम्ही जगाच्या मोठय़ा पसा:यात बाहेर पडलात की, तुम्हाला इथे शिकलेल्या गोष्टींचं महत्त्व पटेल!
कारण त्याच टप्प्यावर तुमचं खरं शिक्षण सुरू होतं. ते शिक्षण अनुभवातून मिळतं, आपल्या कामातून मिळतं, सभोवतालच्या जगातून मिळतं.
मात्र ते शिकताना, नव्या जगाचा भाग होतानाही हे जग आपल्याला बदलायचं आहे, गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत ही जी इच्छा कॉलेजमधे असताना मनात असते, ती कायम जागी ठेवा. त्या इच्छेच्या जोरावर जे बदलावंसं वाटतं ते आपल्या कृतीतून बदला. जगाच्या सोयीसाठी बदलू नका. जसे आहात तसेच राहा. सच्चे, उत्साही आणि आपल्या मनासारखं करून पाहण्याचा प्रयत्न करणारे!
त्यातून तुम्ही आयुष्यात काय करता याचा प्रवास आता सुरू होईल. तुमच्याकडे ज्ञान आहे, माहिती आहे, तंत्र आहे त्यातून तुम्ही काय घडवणार हे तुमच्यासमोरचं खरं आव्हान आहे!
या टप्प्यानंतर तुमच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतील, की आपण जो निर्णय घेतो आहोत तो योग्य की अयोग्य असा पेच पडेल. काही अवघड निर्णय घ्यावेच लागतील. ते निर्णय इतरांसाठी अप्रियही असतील!
मात्र जर तुम्हाला ते निर्णय योग्य वाटत असतील तर ते निर्णय घ्या. ते अवघड आहेत, इतरांना अप्रिय आहेत, आपल्याला त्रस होईल असा विचार करून कच खाऊ नका.
त्यापेक्षा ठाम राहा, स्वत:च्या योग्य निर्णयावर. बदल घडायचे असतील तर असेच घडतील!
आणि ते तुम्हीच घडवू शकता!