शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

स्ट्रेस येतो, तो नक्की कशाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 14:22 IST

आपण नक्की काय शोधतो? कशाच्या मागे पळतो?

ठळक मुद्देआपल्याला 1, 2 आणि 4 क्रमांकाच्या मेंढय़ा मिळाल्या हे आपण विसरून जातो.

- रवींद्र पुरी

सोमवारची सकाळ होती. आठवडय़ाचा पहिला दिवस, त्यामुळे ऑफिसला वेळेवर पोहोचायची घाई. ऑस्ट्रेलियामध्ये वेळेला तसं फार महत्त्व. मला घरातून निघायला थोडा वेळच झाला; पण मुंबईमध्ये ज्याला ट्रेन पकडायची सवय तो जगात कुठेही ट्रेन पकडू शकतो. मी धावत पळत आलो आणि शिस्तीत ट्रेन पकडली. बाहेर तापमान 6 डिग्री सेल्सिअस होतं; पण तरीही मी घामाघूम झालेलो. एक दोन स्टेशन गेल्यानंतर वाटलं मनामध्ये थोडं चलबिचल होतंय. थंडीमध्ये धावल्यामुळे होत असेल असं वाटलं. लक्ष विचलित करण्यासाठी बॅगमधील पुस्तक काढलं आणि वाचायचा प्रयत्न केला. एक पान वाचल्यानंतर जाणवलं की आज वाचायची इच्छा नाही. पुस्तक बंद केलं आणि डोळे मिटून पडलो. कदाचित 15-20 मिनिटे झाली असतील. थोडंसं मळमळल्यासारखं वाटलं. परत डोळे मिटले. अचानक चक्कर आल्यासारखं वाटलं म्हणून डोळे उघडले. ट्रेन कुठल्यातरी स्टेशनवर थांबलेली. मला फक्त लोकांचे पाय दिसत होते आणि क्षणार्धात छातीमध्ये डाव्या बाजूला काहीतरी टोचल्यासारखे झाले. डोळे उघडले तेव्हा स्ट्रेचरवर होतो. हिरव्या कपडय़ातील पॅरामेडिक  माझ्याशी बोलत होता.  त्याने विचारले, हाऊ आर यू फिलिंग नाऊ? मी आय एम गुड म्हणायचा प्रयत्न केला; पण जाणवलं की ओठ व्यवस्थित हालत नव्हते. आजूबाजूला बघितले. मी प्लॅटफॉर्मवर स्ट्रेचरवर होतो आणि बाजूला दोन पॅरामेडिकल होते. छातीला हाताला पायाला इसीजीसाठीचे लेबल लावलेले होते.काहीतरी झाले हे जाणवत होतं. मला अ‍ॅम्बुलन्समधून जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टर आले.  इसीजी बघितला. पुढचे 3-4 तास मी हॉस्पिटलमध्ये होतो. त्यांनी काही टेस्ट केल्या. चार तासानंतर नर्सने सांगितले की सगळं व्यवस्थित आहे. घरी आलो. दिवसभर आराम केला त्रास असा काहीच नव्हता. फक्त माझे रिपोर्ट बघून डॉक्टरांनी सांगितल की, स्ट्रेस रिलेटेड अटॅक होता. दुसर्‍या दिवशी पुन्हा ऑफिसला गेलो. नशीब अटॅक हार्ट अटॅक नव्हता. घरच्यांची आठवण येऊन डोळ्यात पाणी आले. ऑफिसमध्ये पोहोचल्याबरोबर माझा जवळचा मित्र लगबगीचे माझ्याकडे आला. मी त्याला काल मेसेज टाकला होता.माझा हा मित्र मूळचा हाँगकाँगचा. दुपारी बोलणं झालं, जे झालं ते त्याला सांगितलं. तो थोडा हसला आणि म्हणाला, तुला एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट अशी होती. आमच्या दोघांसारखे दोन मित्र होते. लहान होते. खोडकर. त्यांना शाळेमध्ये खोडी करावीशी वाटली. त्या रात्री त्यांनी तीन मेंढय़ा पकडल्या. त्यांच्यावर 1, 2 आणि 4 असे नंबर टाकले. त्या तीन मेंढय़ा त्यांनी त्यांच्या शाळेच्या आतमध्ये सोडल्या आणि गेट बंद केले.दुसर्‍या दिवशी सकाळी नेहमीच्या वेळेनुसार शाळा उघडली. शिक्षकांना सर्वत्र मेंढय़ांच्या लेंडय़ा दिसल्या. आवाज आला. त्यांनी मेंढय़ा शोधल्या. त्यांना 1, 2 आणि 4 नंबर असलेल्या तीन मेंढय़ा मिळाल्या. त्या नंबरकडे बघून सगळ्यांनी असा निष्कर्ष काढला की शाळेमध्ये एकूण चार मेंढय़ा आहेत. त्यातील तिसरी मेंढी अजून सापडलेली नाही. ती शोधायची म्हणून त्यांनी शाळेलाच सुटी दिली.आयुष्यातही असंच होतं. आपल्याला 1, 2 आणि 4 क्रमांकाच्या मेंढय़ा मिळाल्या हे आपण विसरून जातो. तिसरी का मिळाली नाही म्हणत तीच शोधत राहतो.  बर्‍याचवेळी तिसरी मेंढी अस्तित्वातही नसते. पण आपण तीच शोधतो.’मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा केव्हा तुमच्या डोक्यात विचारांचं वादळ येईल किंवा स्ट्रेस वाढेल तेव्हा विचारा स्वतर्‍ला आपण कितवी मेंढी शोधतोय.