शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शट

By admin | Updated: June 19, 2014 21:38 IST

टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्यातून पूर्णपणे वजा जर करता येणार नसेल तर त्या टेक्नॉलॉजीच्या हातात आपला कण्ट्रोल देण्यापेक्षा आपण स्वत:ला कण्ट्रोल करत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला हवा. स्वत:ला सावरत, कॉम्प्युटर-मोबाइल योग्यवेळी बंद करायला शिकवणारं एक केंद्र

 डॉ. मनोजकुमार शर्मा

टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्यातून पूर्णपणे वजा जर करता येणार नसेल तर त्या टेक्नॉलॉजीच्या 
हातात आपला कण्ट्रोल देण्यापेक्षा आपण स्वत:ला कण्ट्रोल करत तंत्रज्ञानाचा योग्य वापर 
करायला हवा. स्वत:ला सावरत, कॉम्प्युटर-मोबाइल योग्यवेळी बंद करायला शिकवणारं एक केंद्र
----------
ड्रग किंवा दारूची नशा करणार्‍या माणसांचं जे होतं, जसं होतं तेच सेलफोनच्या, इंटरनेटच्या आणि सोशल नेटवर्किंग साईट्सच्या सतत, अती आणि दीर्घकाळ वापरामुळं ‘वापरणार्‍यांचं’ होतं का?
-तर होतं, हे सगळं ‘अँडिक्टिव्ह’च असतं, असा आजवरचा जगभरातला अभ्यास सांगतो. अवतीभोवतीचे अनेक तरुण आणि किशोरवयीन मुलं अस्वस्थ होत, चुळबुळत सतत आपला मोबाइल कसा चेक करतात हे जरी नीट पाहिलं तरी हे अँडिक्शन लक्षात येईल. ते सतत फोन चेक करतात, सतत फोनवर नवीन मेसेज आलाय की नाही चेक करतात, आला नसेल तर जुनाच मेसेज पुन्हा पुन्हा वाचतात, सोशल नेटवर्किंग साईटवरचे स्वत:चेच फोटो पुन्हा पुन्हा बघतात. सतत स्वत:चेच सेल्फी काढतात, टाकतात. पुन्हा त्यावरच्या कमेण्ट एन्जॉय करत, तिथे कमेण्टस् करत राहतात.
हे चक्र सुरूच राहतं आणि मग ही मुलं निद्रानाश, डिप्रेशन आणि एकटेपणासारख्या व्याधींना बळी पडतात. ते टाळायचं म्हणून पुन्हा आपापल्या व्यसनाचा आधार घेतात. आतून इतके पोकळ, भुसभुशीत बनत जातात की त्यांना स्वत:ला कण्ट्रोल करणं अवघड होऊन बसतं.
अशी मुलं सतत एकच तक्रार करतात, मला ‘बोअर होतंय’, काही जण अटेन्शन सिकिंग करतात, लोकांनी आपल्याकडे लक्ष द्यावं म्हणून मुद्दाम चुकीचंसुद्धा वागतात. फेसबुकवरच्या तमाम फोटोत ते हसरे दिसतात, पार्टी करत असतात, एकदम हॅपनिंग असतं त्यांचं जग पण प्रत्यक्षात मात्र ते उदास-एकेकटेच असतात. त्यांचे पालक मुलाच्या वर्तनाविषयी सतत काळजी करतात, पण घरात मुलांशी एकतर ते बोलू शकत नाही किंवा बोललं तरी मुलं त्यांच्या प्रश्नांना नीट उत्तर देत नाहीत.
हे असं सारं का घडतंय यावर आम्ही संशोधन करत होतो. मुळात कुठलीही टेक्नॉलॉजीच घातक ती बंद करायला हवी हा विचार चुकीचा. टेक्नॉलॉजीचा उत्तम-योग्य आणि कण्ट्रोल्ड वापर आयुष्य सोपं करू शकते. पण तसं झालं नाही की गोष्ट बिघडायला लागतात.
सुरुवातीच्या काळात आमच्याकडे मानसिक समस्या घेऊन येणार्‍या तरुण रुग्णांना आम्ही विचारायचो की इंटरनेट वापरतोस का? किती वापरतो? साधारण २५ टक्के रुग्णांमध्ये एक गोष्ट सारखी होती, एकतर त्यांना आधीपासून मानसिक तणाव होता. इंटरनेटच्या अतीव वापरानं तो वाढला.
मग आम्ही हेही शोधायला लागलो की इंटरनेटच्या अती वापरानं मानसिक तणाव वाढला की मानसिक तणाव होताच म्हणून इंटरनेटचा वापर वाढला.
मग लक्षात यायला लागलं की, जी माणसं इंटरनेट दीर्घकाळ किंवा जास्त वापरतात ते मुख्यत: एकेकटे किंवा एकलकोंडे असतात. त्यांना आपल्या एकटेपणाचा खूप त्रास होतो म्हणून मग ‘माणसं’-गप्पा आणि आधार शोधत ते या आभासी जगात येतात.
१३ ते १८ या वयोगटातल्या मुलांमध्ये तर हा प्रश्न जरा जास्त गंभीर दिसतो. व्हिडीओ गेम आणि फेसबुक यासाठी होणारं या मुलांचं क्रेव्हिंग जबरदस्त होतं. तर १८ ते २५ या वयोगटातही एकेकटे, अबोल असणारे, कुढे असे सारे तरुण इंटरनेटचा हात चटकन पकडताना दिसतात. त्यांच्यासाठी मात्र सोशल नेटवर्किंगबरोबरच पोर्नोग्राफिक साईट्स, तसले व्हीडीओ आणि त्याचं शेअरिंग हे सारं फार एक्सायटिंग असतं. ती एक्साईटमेण्टच त्यांना या व्यसनाची जास्त चटक लावते. आमच्या शहरात आम्ही घरोघर जात मुलांशी या विषयावर बोललो आणि आमच्या लक्षात आलं की मानसिक तणाव, आत्मविश्‍वास कमी आणि इंटरनेटचा अतीवापर यांचा परस्पर संबंध आहेच.
त्यातून या मुलांचा स्वत:वरचा कण्ट्रोल सुटतो. त्यांना इतकं जबरदस्त इंटरनेटचं जबरदस्त क्रेव्हिंग होतं की, त्याक्षणी ते मिळालं नाही तर ते हिंसक होऊ शकतात. आरडाओरडा करतात, चिडतात, अस्वस्थ होतात आणि स्वत:वरचा ताबा सुटत त्यांना भयंकर त्रास होतो.
त्याक्षणी नेट मिळणं, सोशल नेटवर्किंग साईटवर जाणं, चॅट करणं, मेल पाहणं ही त्यांची गरज उरत नाही तर ते त्यांच्यावर कम्पलशनच होतं.
स्वत:साठीच कम्पलसरी होणारी ही गोष्ट त्यांना काचायला लागते. पण तो फंदा गळ्यातून सुटत नाही, सोडवता येत नाही. त्यामुळे चिडचिडी झालेली, अनेकांना भयंकर राग येतो, आईवडिलांशी शत्रू असल्यासारखी वागणारी, मित्रांपासून स्वत:ला तोडणारी अनेक मुलं आम्हाला मग भेटत राहतात. 
मग प्रश्न येतो की यावर उपाय काय? त्यासाठीच आम्ही निम्हांसमध्ये एक ‘शट’ क्लिनिक सुरू केलं आहे. 
‘शट’ म्हणजे सर्व्हिस फॉर हेल्दी युज ऑफ टेक्नॉलॉजी.
टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्यातून पूर्णपणे वजा जर करता येणार नसेल तर त्या टेक्नॉलॉजीच्या हातात आपला कण्ट्रोल देण्यापेक्षा आपण स्वत:ला कण्ट्रोल करत योग्य वापर करायला हवा. हेच आम्ही इतरांना सांगतो, त्यासाठीचे मार्ग सुचवतो. काही जणांचा मानसिक तणाव कमी करण्यासाठी अन्य औषधोपचार करावे लागतात. पण व्यायाम, आपल्या आवडीचं काम, संगीत ऐकणं, प्रवास हे सारं मदतीला घेत एक उत्तम लाईफस्टाईल चेंज यापलीकडे या प्रश्नावर इलाज नाही.
- खरंतर हा आजार असा आहे की, आपल्याला आजार आहे, तो आपणच बरा करायला पाहिजे हे अनेकांना समजतं, पण त्यांची इच्छाशक्ती कमी पडते. 
ती इच्छाशक्ती वाढवली तरी हे इंटरनेट अँडिक्शन, हे सततच व्यसन आणि ही सततची अस्वस्थता. सारंच संपू शकेल, सुटू शकेल.!
 
(लेखक हे डिपार्टमेण्ट ऑफ क्लिनिकल सायकॉलॉजी,  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ अँण्ड न्युरो सायन्स येथे  असोसिएट प्रोफेसर पदावर कार्यरत आहेत.)