शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

भटकायची 3 सूत्रं

By admin | Updated: October 15, 2015 17:59 IST

जग पाहण्याची, रुटीन तोडण्याची, प्रवास करायची इच्छा तर आहे, पण कसं जाणार? एकतर जायचं कसं हे माहिती नाही, त्यात पैसे नाही. ट्रॅव्हल कंपन्या दारात उभं करणार नाही. मग प्रवास करणार कसा? आणि तो नाहीच केला तर अनुभवाची पोतडी भरणार कशी?

 
जग पाहण्याची, रुटीन तोडण्याची, प्रवास करायची इच्छा तर आहे, पण कसं जाणार?
एकतर जायचं कसं हे माहिती नाही, त्यात पैसे नाही. ट्रॅव्हल कंपन्या दारात उभं करणार नाही.
मग प्रवास करणार कसा? आणि तो नाहीच केला तर अनुभवाची पोतडी भरणार कशी?
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तरुणपणी प्रवास करून मनमुक्त भटकंती नाही केली, तर म्हातारपणी देवदर्शनाच्या तीर्थयात्र करून तरी काय उपयोग?
त्यामुळे नवीन जग, नवीन माणसं, भाषा, संस्कृती याचं शिक्षण घ्यायचं तर हिंमत करून घराबाहेर पडायला हवं.
एकटय़ानं जायची हिंमत नसेल तर दोघातिघांनी मिळून जावं.
पण घ्यावाच हा अनुभव एकदा.
 
पण कसा? त्यासाठीच ही तीन अगदी सोपी सूत्र.
 
1) प्रवास करायला पैसे नाही तर हिंमत लागते. थोडं डेअरिंग करावं लागतं.
दोन वेळच्या जेवणापुरते आणि  साधं एसटीचं तिकिटं काढता येईल एवढे पैसे हवेत.
फार जग पहायला नाही जाता आलं तरी आपलं शहर, आपल्या जिल्ह्यातली, आसपासची खास गावं तरी पहायला हवीत.
मिळेल ते खायचं, मिळेल तिथे रहायचं. त्यातल्या त्यात काळजी घ्यायची ती आपल्या सुरक्षेची. त्यामुळे मुक्काम करायचा असेल तर सुरुवातीला तरी जागा आणि माणसं माहितीची हवी. एवढी तयार केली तरी प्रवासाला निघता येतं.
2) आपण पर्यटक नाही. त्यामुळे जास्त सामान नको. खरेदी नको. मिनरल वॉटर नको, हॉटेलात रहायची सोय नको. त्यापेक्षा आपण जाऊ तिथलं लोकल फूड खावं. मंदिरं, दर्गा, इथले प्रसाद पोटभर खायचे आणि हवंतसं शक्यतो पायी भटकायचं. हा नियम. पायी भटकूनच माणसं भेटतात. ओळखी होतात.
3) सगळ्यात महत्त्वाचं. प्रवास आपल्याला शिकवतो, अनुभव देतो. चांगले अनुभव येतात तसे वाईटही येऊ शकतात. पण माणसं आणि जग समजून घ्यायच्या या कार्यशाळेत आपण पुन्हा पुन्हा जात रहायचं. 
होमवर्क म्हणून निदान तुमचं शहर तरी पाहून या. ते तरी पुरतं पायाखालचं आहे का, आपल्या विचारा स्वत:ला!