शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

भटकायची 3 सूत्रं

By admin | Updated: October 15, 2015 17:59 IST

जग पाहण्याची, रुटीन तोडण्याची, प्रवास करायची इच्छा तर आहे, पण कसं जाणार? एकतर जायचं कसं हे माहिती नाही, त्यात पैसे नाही. ट्रॅव्हल कंपन्या दारात उभं करणार नाही. मग प्रवास करणार कसा? आणि तो नाहीच केला तर अनुभवाची पोतडी भरणार कशी?

 
जग पाहण्याची, रुटीन तोडण्याची, प्रवास करायची इच्छा तर आहे, पण कसं जाणार?
एकतर जायचं कसं हे माहिती नाही, त्यात पैसे नाही. ट्रॅव्हल कंपन्या दारात उभं करणार नाही.
मग प्रवास करणार कसा? आणि तो नाहीच केला तर अनुभवाची पोतडी भरणार कशी?
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तरुणपणी प्रवास करून मनमुक्त भटकंती नाही केली, तर म्हातारपणी देवदर्शनाच्या तीर्थयात्र करून तरी काय उपयोग?
त्यामुळे नवीन जग, नवीन माणसं, भाषा, संस्कृती याचं शिक्षण घ्यायचं तर हिंमत करून घराबाहेर पडायला हवं.
एकटय़ानं जायची हिंमत नसेल तर दोघातिघांनी मिळून जावं.
पण घ्यावाच हा अनुभव एकदा.
 
पण कसा? त्यासाठीच ही तीन अगदी सोपी सूत्र.
 
1) प्रवास करायला पैसे नाही तर हिंमत लागते. थोडं डेअरिंग करावं लागतं.
दोन वेळच्या जेवणापुरते आणि  साधं एसटीचं तिकिटं काढता येईल एवढे पैसे हवेत.
फार जग पहायला नाही जाता आलं तरी आपलं शहर, आपल्या जिल्ह्यातली, आसपासची खास गावं तरी पहायला हवीत.
मिळेल ते खायचं, मिळेल तिथे रहायचं. त्यातल्या त्यात काळजी घ्यायची ती आपल्या सुरक्षेची. त्यामुळे मुक्काम करायचा असेल तर सुरुवातीला तरी जागा आणि माणसं माहितीची हवी. एवढी तयार केली तरी प्रवासाला निघता येतं.
2) आपण पर्यटक नाही. त्यामुळे जास्त सामान नको. खरेदी नको. मिनरल वॉटर नको, हॉटेलात रहायची सोय नको. त्यापेक्षा आपण जाऊ तिथलं लोकल फूड खावं. मंदिरं, दर्गा, इथले प्रसाद पोटभर खायचे आणि हवंतसं शक्यतो पायी भटकायचं. हा नियम. पायी भटकूनच माणसं भेटतात. ओळखी होतात.
3) सगळ्यात महत्त्वाचं. प्रवास आपल्याला शिकवतो, अनुभव देतो. चांगले अनुभव येतात तसे वाईटही येऊ शकतात. पण माणसं आणि जग समजून घ्यायच्या या कार्यशाळेत आपण पुन्हा पुन्हा जात रहायचं. 
होमवर्क म्हणून निदान तुमचं शहर तरी पाहून या. ते तरी पुरतं पायाखालचं आहे का, आपल्या विचारा स्वत:ला!