शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भटकायची 3 सूत्रं

By admin | Updated: October 15, 2015 17:59 IST

जग पाहण्याची, रुटीन तोडण्याची, प्रवास करायची इच्छा तर आहे, पण कसं जाणार? एकतर जायचं कसं हे माहिती नाही, त्यात पैसे नाही. ट्रॅव्हल कंपन्या दारात उभं करणार नाही. मग प्रवास करणार कसा? आणि तो नाहीच केला तर अनुभवाची पोतडी भरणार कशी?

 
जग पाहण्याची, रुटीन तोडण्याची, प्रवास करायची इच्छा तर आहे, पण कसं जाणार?
एकतर जायचं कसं हे माहिती नाही, त्यात पैसे नाही. ट्रॅव्हल कंपन्या दारात उभं करणार नाही.
मग प्रवास करणार कसा? आणि तो नाहीच केला तर अनुभवाची पोतडी भरणार कशी?
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तरुणपणी प्रवास करून मनमुक्त भटकंती नाही केली, तर म्हातारपणी देवदर्शनाच्या तीर्थयात्र करून तरी काय उपयोग?
त्यामुळे नवीन जग, नवीन माणसं, भाषा, संस्कृती याचं शिक्षण घ्यायचं तर हिंमत करून घराबाहेर पडायला हवं.
एकटय़ानं जायची हिंमत नसेल तर दोघातिघांनी मिळून जावं.
पण घ्यावाच हा अनुभव एकदा.
 
पण कसा? त्यासाठीच ही तीन अगदी सोपी सूत्र.
 
1) प्रवास करायला पैसे नाही तर हिंमत लागते. थोडं डेअरिंग करावं लागतं.
दोन वेळच्या जेवणापुरते आणि  साधं एसटीचं तिकिटं काढता येईल एवढे पैसे हवेत.
फार जग पहायला नाही जाता आलं तरी आपलं शहर, आपल्या जिल्ह्यातली, आसपासची खास गावं तरी पहायला हवीत.
मिळेल ते खायचं, मिळेल तिथे रहायचं. त्यातल्या त्यात काळजी घ्यायची ती आपल्या सुरक्षेची. त्यामुळे मुक्काम करायचा असेल तर सुरुवातीला तरी जागा आणि माणसं माहितीची हवी. एवढी तयार केली तरी प्रवासाला निघता येतं.
2) आपण पर्यटक नाही. त्यामुळे जास्त सामान नको. खरेदी नको. मिनरल वॉटर नको, हॉटेलात रहायची सोय नको. त्यापेक्षा आपण जाऊ तिथलं लोकल फूड खावं. मंदिरं, दर्गा, इथले प्रसाद पोटभर खायचे आणि हवंतसं शक्यतो पायी भटकायचं. हा नियम. पायी भटकूनच माणसं भेटतात. ओळखी होतात.
3) सगळ्यात महत्त्वाचं. प्रवास आपल्याला शिकवतो, अनुभव देतो. चांगले अनुभव येतात तसे वाईटही येऊ शकतात. पण माणसं आणि जग समजून घ्यायच्या या कार्यशाळेत आपण पुन्हा पुन्हा जात रहायचं. 
होमवर्क म्हणून निदान तुमचं शहर तरी पाहून या. ते तरी पुरतं पायाखालचं आहे का, आपल्या विचारा स्वत:ला!