शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उताण्या घागरीतले प्रश्न

By admin | Updated: August 20, 2015 15:16 IST

गोविंदा पथकातल्या मुलांच्या हितासाठी सगळेच वाद घालताहेत; पण या मुलांना गोविंदात काय सिद्ध करायचं असतं, हे कुठं कुणाला कळतं?

- स्नेहा मोरे
 
दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचं महाराष्ट्र शासनानं जाहीर केलं! गोविंदाकडे एक खेळ म्हणून पाहिलं जावं, त्याला ‘खेळा’च्या सुविधा मिळाव्यात असा त्यामागचा मानस!
मात्र त्यामुळे तरुण गोविंदा सुखावले का?
जे स्वत:च्या खांद्याचा पहाड करत थरावर थर लावतात, त्या गोविंदांना यातून काय मिळेल?
खरंतर दहीहंडीतील वाढत्या थरांच्या उंचीला आणि त्यातील अल्पवयीन मुलांच्या सहभागाला अनेक नागरिकांसह सामाजिक संस्थांचा विरोध आहे. 
हे गोविंदा पैशासाठी आपला जीव धोक्यात घालतात असा आक्षेपही आहे. 
आणि त्यावरून राजकीय पक्षांनी तापवलेलं राजकारणही आहे.
मात्र ज्यांच्या जिवासाठी आणि हितासाठी हा सारा वाद ऐन पावसात भडकला आहे,
त्या गोविंदांना या वादाविषयी काय वाटतं?
ते का गोविंदा पथकात जातात?
घरची गरिबी, कष्ट आणि जीवतोड मेहनत
या सा:यातून त्यांना काय मिळतं?
की निव्वळ थरथराटातून त्यांची घागर उताणीच राहते?
मुंबईतल्या गोविंदा पथकांच्या सरावात सहभागी होत केलेला हा एक ग्राउण्ड रिपोर्ट.. पण गोविंदांना प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी, यासंदर्भातला वाद नेमका काय आहे, हे सांगणा:या या दोन बाजू. आणि आतल्या पानात, गोविंदातल्या पोरांशी गप्पा..
 
 
विरोध कशाला?
 
मला तुमची काळजी का वाटावी?
दहीहंडीत फक्त पाच थरांर्पयतच परवानगी असावी आणि अल्पवयीन मुलांना त्यात सहभागी करू नये, या मागणीसाठी चेंबूरच्या स्वाती पाटील यांनी हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका दाखल केली होती. तेव्हापासून दहीहंडी हा उत्सव वादाच्या भोव:यात अडकला आहे. याचिकेला एक वर्ष उलटूनही अजूनही या उत्सवाबाबत राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. 
याबाबत प्रत्येक निकषावर अभ्यास करून याचिकाकत्र्या राज्य शासनाला आव्हान देत आहेत. शिवाय, अखेरीस गोविंदांच्या सुरक्षेपोटी पाटील यांनी सर्व पथकांना लेखी निवेदनही देण्याचा निश्चय केला आहे. ‘मला तुमची काळजी का वाटावी?’ या मथळ्याखाली त्यांनी पथकांना एक निवेदन केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, ‘प्रत्येक जीव हा अनमोल आहे, त्यामुळे थरांच्या जीवघेण्या स्पर्धेत सहभागी होताना आपल्या आई-वडिलांचा विचार करा!’
या आवाहनात त्यांनी पथकांना सांगितलंय की, या उत्सवाचं बाजारीकरण होतंय आणि तुमच्यातील स्पर्धा वाढविण्यामागे आयोजक कारणीभूत आहेत. दहीहंडी उत्सवादरम्यान आयोजक गोविंदांच्या सुरक्षेची कोणतीच जबाबदारी घेत नाहीत. 
या दहीहंडीच्या ‘इव्हेंटीकरणा’ला उत्सवाचे रूप देण्यासाठी गोविंदा पथकांच्या सहकार्याची गरज असून, गंभीर दुखापत झालेल्या किंवा मृत्यू पावलेल्या गोविंदाच्या आई-वडिलांच्या जागी स्वत:ला उभे करा आणि विचार करा, असंही त्यांनी निवेदनात नमूद केलं आहे.  एकंदर उत्सवाला विरोध नाही असं त्या स्पष्ट सांगतात. केवळ यातील स्पर्धेला आळा घाला, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 
 
हित कुणाचं?
 
हंडीतल्या ‘लोण्या’चे राजकारण!
ठाण्याच्या संघर्ष प्रतिष्ठानचे जितेंद्र आव्हाड यांनी उंचच उंच थराची मागणी लावून धरली आहे. उत्सवावरच आक्रमण होत असल्याचं एक वातावरण तयार केलं जात आहे. युक्तिवाद असाही आहे की, अनेक साहसी खेळांत खेळाडूंना प्राण गमवावे लागतात मग ते खेळ कुणी बंद करतं का?
त्यासाठी मग मोर्चेबांधणी, लढाया सुरू आहेत.
गोविंदा पथकांनाही त्यात सामील करून घेतलं जात आहे.
**
गोविंदांचं राजकारण एकीकडे, तर दुसरीकडे त्याला आलेलं इव्हेण्टी स्वरूप.
त्यातून फिरणारा पैसा, होणारी उलाढाल, बडे बडे प्रायोजक, टीव्हीवर लाइव्ह दिसणारे  कार्यक्रम आणि होणारी पथकांसह सा:यांचीच कमाई.
या आर्थिक हितसंबंधांमुळेही हंडय़ांची वाढती उंची, लहान मुलांचा सहभाग, त्यात होणारे अपघात हे विषय डोळ्याआड केले जात आहेत का, असा प्रश्न आहेच!
***
मुंबईतला गोविंदा ठाण्यात जास्त मोठा झाला.
आता तो तिथूनही बाहेर पडत नाशिक-नागपूर-पुण्याच्या दिशेनं जात आहे.
प्रश्न तिथेही तेच आहेत, कारण गोविंदांचा इव्हेण्ट तिथंही होतोच आहे!