शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

उताण्या घागरीतले प्रश्न

By admin | Updated: August 20, 2015 15:16 IST

गोविंदा पथकातल्या मुलांच्या हितासाठी सगळेच वाद घालताहेत; पण या मुलांना गोविंदात काय सिद्ध करायचं असतं, हे कुठं कुणाला कळतं?

- स्नेहा मोरे
 
दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचं महाराष्ट्र शासनानं जाहीर केलं! गोविंदाकडे एक खेळ म्हणून पाहिलं जावं, त्याला ‘खेळा’च्या सुविधा मिळाव्यात असा त्यामागचा मानस!
मात्र त्यामुळे तरुण गोविंदा सुखावले का?
जे स्वत:च्या खांद्याचा पहाड करत थरावर थर लावतात, त्या गोविंदांना यातून काय मिळेल?
खरंतर दहीहंडीतील वाढत्या थरांच्या उंचीला आणि त्यातील अल्पवयीन मुलांच्या सहभागाला अनेक नागरिकांसह सामाजिक संस्थांचा विरोध आहे. 
हे गोविंदा पैशासाठी आपला जीव धोक्यात घालतात असा आक्षेपही आहे. 
आणि त्यावरून राजकीय पक्षांनी तापवलेलं राजकारणही आहे.
मात्र ज्यांच्या जिवासाठी आणि हितासाठी हा सारा वाद ऐन पावसात भडकला आहे,
त्या गोविंदांना या वादाविषयी काय वाटतं?
ते का गोविंदा पथकात जातात?
घरची गरिबी, कष्ट आणि जीवतोड मेहनत
या सा:यातून त्यांना काय मिळतं?
की निव्वळ थरथराटातून त्यांची घागर उताणीच राहते?
मुंबईतल्या गोविंदा पथकांच्या सरावात सहभागी होत केलेला हा एक ग्राउण्ड रिपोर्ट.. पण गोविंदांना प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी, यासंदर्भातला वाद नेमका काय आहे, हे सांगणा:या या दोन बाजू. आणि आतल्या पानात, गोविंदातल्या पोरांशी गप्पा..
 
 
विरोध कशाला?
 
मला तुमची काळजी का वाटावी?
दहीहंडीत फक्त पाच थरांर्पयतच परवानगी असावी आणि अल्पवयीन मुलांना त्यात सहभागी करू नये, या मागणीसाठी चेंबूरच्या स्वाती पाटील यांनी हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका दाखल केली होती. तेव्हापासून दहीहंडी हा उत्सव वादाच्या भोव:यात अडकला आहे. याचिकेला एक वर्ष उलटूनही अजूनही या उत्सवाबाबत राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. 
याबाबत प्रत्येक निकषावर अभ्यास करून याचिकाकत्र्या राज्य शासनाला आव्हान देत आहेत. शिवाय, अखेरीस गोविंदांच्या सुरक्षेपोटी पाटील यांनी सर्व पथकांना लेखी निवेदनही देण्याचा निश्चय केला आहे. ‘मला तुमची काळजी का वाटावी?’ या मथळ्याखाली त्यांनी पथकांना एक निवेदन केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, ‘प्रत्येक जीव हा अनमोल आहे, त्यामुळे थरांच्या जीवघेण्या स्पर्धेत सहभागी होताना आपल्या आई-वडिलांचा विचार करा!’
या आवाहनात त्यांनी पथकांना सांगितलंय की, या उत्सवाचं बाजारीकरण होतंय आणि तुमच्यातील स्पर्धा वाढविण्यामागे आयोजक कारणीभूत आहेत. दहीहंडी उत्सवादरम्यान आयोजक गोविंदांच्या सुरक्षेची कोणतीच जबाबदारी घेत नाहीत. 
या दहीहंडीच्या ‘इव्हेंटीकरणा’ला उत्सवाचे रूप देण्यासाठी गोविंदा पथकांच्या सहकार्याची गरज असून, गंभीर दुखापत झालेल्या किंवा मृत्यू पावलेल्या गोविंदाच्या आई-वडिलांच्या जागी स्वत:ला उभे करा आणि विचार करा, असंही त्यांनी निवेदनात नमूद केलं आहे.  एकंदर उत्सवाला विरोध नाही असं त्या स्पष्ट सांगतात. केवळ यातील स्पर्धेला आळा घाला, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 
 
हित कुणाचं?
 
हंडीतल्या ‘लोण्या’चे राजकारण!
ठाण्याच्या संघर्ष प्रतिष्ठानचे जितेंद्र आव्हाड यांनी उंचच उंच थराची मागणी लावून धरली आहे. उत्सवावरच आक्रमण होत असल्याचं एक वातावरण तयार केलं जात आहे. युक्तिवाद असाही आहे की, अनेक साहसी खेळांत खेळाडूंना प्राण गमवावे लागतात मग ते खेळ कुणी बंद करतं का?
त्यासाठी मग मोर्चेबांधणी, लढाया सुरू आहेत.
गोविंदा पथकांनाही त्यात सामील करून घेतलं जात आहे.
**
गोविंदांचं राजकारण एकीकडे, तर दुसरीकडे त्याला आलेलं इव्हेण्टी स्वरूप.
त्यातून फिरणारा पैसा, होणारी उलाढाल, बडे बडे प्रायोजक, टीव्हीवर लाइव्ह दिसणारे  कार्यक्रम आणि होणारी पथकांसह सा:यांचीच कमाई.
या आर्थिक हितसंबंधांमुळेही हंडय़ांची वाढती उंची, लहान मुलांचा सहभाग, त्यात होणारे अपघात हे विषय डोळ्याआड केले जात आहेत का, असा प्रश्न आहेच!
***
मुंबईतला गोविंदा ठाण्यात जास्त मोठा झाला.
आता तो तिथूनही बाहेर पडत नाशिक-नागपूर-पुण्याच्या दिशेनं जात आहे.
प्रश्न तिथेही तेच आहेत, कारण गोविंदांचा इव्हेण्ट तिथंही होतोच आहे!