शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

शुध्द पाण्याचं एटीएम

By admin | Updated: July 11, 2016 13:56 IST

शहरात राहणाऱ्यांना प्यायच्या पाण्यासाठी इतकं झगडावं लागत नाही जितकी तडफड ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना एक हंडाभर पाणी मिळवण्यासाठी करावी लागते.

 शहरात राहणाऱ्यांना प्यायच्या पाण्यासाठी इतकं झगडावं लागत नाही जितकी तडफड ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना एक हंडाभर पाणी मिळवण्यासाठी करावी लागते. तसं नाही म्हणायला पिण्याच्या पाण्याचं महत्त्वं महाराष्ट्रातल्या शहरी भागांनाही यंदाच्या दुष्काळानं पटवून दिलंच आहे. पण दुष्काळ असो नाहीतर सुकाळ पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करणं हे ग्रामीण भागातल्या लोकांच्या सवयीचंच झालं आहे. कधीमधी वर्तमानपत्रात याबद्दल वाचल्यावर, वृत्तवाहिन्यांवरील दृश्यांमध्ये पाण्याच्या हालाची दृश्य पाहिल्यानंतर तेवढ्यापुरती हळहळ वाटते. पण तो प्रश्न त्यांचा आहे या मानसिकतेनं अशा बातम्यांमधून चटकन पाहणारे, वाचणारे स्वत:ची सुटकाही करवून घेतात. पण मुंबईमधल्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकरावीत शिकणारी दिया श्रॉफ नावाची विद्यार्थिनी याला अपवादच म्हणावी लागेल. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागातले हाल पाहून दिया अस्वस्थ झाली. तिची अस्वस्थता तेवढ्यापुरतीच मर्यादित राहिली नाही. तिच्या संशोधक बुध्दीनं यावर उपाय शोधायचं ठरवलं.ग्रामीण भागात किमान पिण्याचं काही लिटर शुध्द पाणी तरी प्रत्येक कुटुंबाला हमखास मिळालं तर त्यांचे कष्ट कितीतरी हलके होतील. दीयानं आपल्या या कल्पनेबाबतची चर्चा युरेका फोर्बस कंपनीशी केली. त्यांच्यात झालेल्या विचारविनिमयातून शुध्द पाण्याच्या एटीएमची कल्पना सुचली. पैशाच्य एटीएम मशीनसारखं पाण्याचं एटीएम मशीन बसवण्याचा हा जलजीवन प्रकल्प आहे. संपूर्ण भारतातल्या ग्रामीण भागात हे पाण्याचे एटीएम बसवले तर ग्रामीण भागातल्या लोकांचा पिण्याचा प्रश्न सुटू शकतो असं दीयाला वाटतं. दीयाच्या कल्पनेतून साकार झालेला जलजीवन हा पाण्याचा एटीएम प्रकल्प सोलापूरमधल्या प्रभाग क्रमांक 30 मधल्या रेवणसिध्देश्वर झोपडवस्तीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. अर्थातच तिनं शोधलं आणि ते लगेच साकारालं असं झालं नाही. तिनं वैयक्तिक पातळीवर, सरकारी कार्यालयातून आणि नगर परिषदेकडून देणग्या गोळा केल्या. त्यातून जमलेल्या पैशातून सोलापूरमध्ये हा प्रकल्प आकारास आला. पाण्याचे एटीएम मशीन त्या त्या भागातल्या बोरवेल, विहिर या पाण्याच्या स्त्रोतांशी जोडलेल्या शुध्दीकरण प्रकल्पाशी जोडलेलं असतं. पाणी शुध्दीकरण प्रकल्प विहीर, बोरवेल मधल्या पाण्याचं शुध्दीकरण करतं. या प्रकल्पातलं पाणी मग त्याला जोडलेल्या टाकीत साठवलं जातं. आणि हे साठवलेलं पाणी या टाकीला जोडलेल्या एटीएमद्वारे प्रत्यक्ष लोकांमध्ये वितरित केलं जातं. एटीएमद्वारे लोकांना पाणी मिळण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला एक एटीएम कार्ड दिलं जातं. जे त्या मशीनवर स्क्रॅच केलं की स्क्रॅच करणाऱ्यांना वीस लीटर शुध्द पाणी मिळतं. दीयाला पाण्याच्या एटीएम प्रकल्प संशोधनासाठी राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कारही मिळाला आहे. -माधुरी पेठकर