शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

नेटपॅक मारा यार.

By admin | Updated: December 11, 2014 20:46 IST

या देशात ना म्हणे आता तरुण मुलांचे सरळ दोन भाग पडतात. एक- ज्यांनी आपल्या मोबाइलवर नेट पॅक मारलेले आहेत असा वर्ग.

या देशात ना म्हणे आता तरुण मुलांचे सरळ दोन भाग पडतात.
एक- ज्यांनी आपल्या मोबाइलवर नेट पॅक मारलेले आहेत असा वर्ग.
दोन- ज्यांनी आजवर आपला मोबाइल गाणी ऐकण्यापलीकडे कशासाठीही वापरलेला नाही असा दुसरा वर्ग. या वर्गातले बहुतेकजण मोबाइलचा वापर गाणी ऐकण्यासाठीच करतात, 
मेमरी कार्ड भरून आणायचं आणि ऐकत सुटायची गाणी.
तसे वरवर पाहता, हे दोनच गट दिसत असले तरी एक मधला तिसरा वर्गही आहे. ज्यांनी आजवर कधी आपल्या फोनवर नेट पॅक मारलेलं नाही. पण व्हॉट्स अँप हा शब्द ऐकून ऐकून त्यांना आता प्रचंड न्यूनगंड छळू लागला आहे.
‘तू व्हॉट्स अँपवर ये ना यार, ’ अशा मित्रमैत्रिणींच्या सूचना आणि तिथल्या ग्रुपवर पडीक राहून तिथं ते करत असलेली मजा ऐकून बाकीच्यांना आपण म्हणजे अगदीच जुनाट आहोत असं वाटायला लागतं.
शंभर रुपयाचं का होईना कधी एकदा आपण नेटपॅक मारतो असं होऊन, चायनामेड का होईना फोन घेऊन व्हॉट्सअँपतो असं त्यांना होऊन जातंय.
 
नेमकी अशी काय जादू आहे ही?
नेटपॅक मारल्यानं आणि ‘कनेक्ट’ झाल्यानं लाइफ बदलूनच जातं असं खरंच वाटतं का तुम्हाला?
 
तुमचा अनुभव काय सांगतो,
आठवून आठवून खरं खरं सांगा. आपल्या मोबाइलवर नेटपॅक मारलाच पाहिजे असं का वाटलं होतं तुम्हाला?
तसं जेव्हा वाटलं, त्यासाठी काही निमित्त घडलं का?
ते निमित्त, कुणाचा एखादा टोमणा, किंवा कुणीतरी पटवून दिलं महत्त्व मोबाइलनेटचं, ते सारं आजही आठवतं का तुम्हाला?
आपल्या हातात मोबाइल आहे, त्याच्यावर नेट आहे आणि जगात कायपण घडलं तरी आपल्याला लगेच कळतं, आता आपण कुणावर डिपेण्ड नाही असं वाटायला लागलं का?
एकदम मित्रमैत्रिणींमधे भाव वधारला, एकमेकांच्या ‘टच’मधे पूर्वीपेक्षा जास्त राहता येऊ लागलं, असं काही वाटायला लागलं का?
 
नेमकं काय होतं हे 
‘टच’वालं फिलिंग?
१) नेटपॅक मारलं आणि यार आपलं लाइफच बदलून गेलं, असं खरंच वाटतं का तुम्हाला?
२) ते बदललं म्हणजे काय बदललं?
आपण एकदम फॉरवर्ड आहोत, जगात काय पण चाललं तरी कळतं, असा कॉन्फिडन्स आला?
३) आपण कुठं राहतो, गावात की खेड्यात याला काही महत्त्व उरलं नाही, आपल्या हातातला फोन आपल्याला नव्या जगाशी जोडतोच, असं वाटतं का?
४) या नेटपॅकमुळे, कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याला खूप फायदा झाला असा एखादा तुमचा अनुभव आहे का?
 
असतील तर नक्की लिहा.
नेटपॅक मारल्यानं एकदम पॉवरपॅक झालेल्या तुमच्या आयुष्याची.
तुमच्या अनुभवाची, त्यासाठी आईबाबांशी भांडून मिळवलेल्या परवानगीची आणि पैशांचीही.
नेटपूर्वीचं जगणं आणि आताचं जगणं यातल्या फरकाची.
 
लिहा बिंधास्त, करा मन मोकळं.
आणि नक्की सांगा,
एक नेट पॅक मारल्यानं
लाइफ बदलल्याची तुमची गोष्ट.
अंतिम मुदत- १९ डिसेंबर २0१४
पत्ता - शेवटच्या पानावर तळाशी
पाकिटावर ‘नेटपॅक मारा यार.’ 
असा उल्लेख करायला विसरू नका.